शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बोनस मिळाला तर आनंदच, पण नोकरी त्याहून महत्त्वाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 05:38 IST

एक काळ असा होता की दिवाळीच्या तोंडावर कामगारांना बोनस मिळावा, यासाठी त्यांच्या संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात असायच्या.

- संजीव साबडे।एक काळ असा होता की दिवाळीच्या तोंडावर कामगारांना बोनस मिळावा, यासाठी त्यांच्या संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात असायच्या. प्रत्येक उद्योगात कामगारांना किती बोनस मिळाला, याकडे सर्वांचे लक्ष असायचे. तसा बोनस आपल्यालाही मिळायला हवा, असा प्रयत्न कामगार व त्यांच्या संघटना करायच्या. बोनस मिळताच घरी मुलाबाळांसाठी कपड्यांची खरेदी, फटाके, फराळाचे पदार्थ करणे हे सुरू व्हायचे. दिवाळी व बोनस यांचे हे नाते अतूट होते. केवळ कामगार व कर्मचारी यांचेच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांचेही बोनस किती मिळणार, याकडे लक्ष असायचे.अनेकांना तर पगार म्हणजे महिनाभर केलेल्या कामाचा मेहनताना आणि बोनस म्हणजे वरची कमाईच वाटायची. अशा कमाईचे महत्त्व दिवाळीत अधिक, कारण मेहनतीचा पगार घरचा खर्च भागवण्यातच संपायचा. या अधिकच्या कमाईतून त्यातल्या त्यात थोडीशी चैन करणे शक्य व्हायचे. त्यामुळे नेमक्या दिवाळीआधी आंदोलने, निदर्शने व प्रसंगी संपाचे पाऊल उचलले जात असे. एखाद वर्षी बोनस कमी मिळाला वा मिळालाच नाही, की त्याचा परिणाम बाजारपेठेवर हमखास दिसायचा.

कापड गिरण्यांमधील हा तिढा तर सहज सुटायचा नाही आणि मुख्यमंत्र्यांकडे हे प्रकरण जायचे. तिथे मालक व कामगारांचे प्रतिनिधी यांना बोलावून मुख्यमंत्री तोडगा काढायचे. त्याच्या मोठमोठ्या बातम्याही छापून यायच्या. केवळ मुंबईच नव्हे, तर कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे, तर उत्तर प्रदेशातील गिरणी कामगारांच्या नातेवाइकांचे बोनसकडे लक्ष असायचे. इथून गावाला मनिआॅर्डरी जायच्या. याच बोनसवर गावाकडील दिवाळीही ठरायची.सार्वजनिक क्षेत्रांतील तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा वा देऊ नये यावरून नेहमीच वाद व्हायचा. सरकार, महापालिका, नगरपालिका या नफा कमावणाºया संस्था नसल्याने त्यांनी करदात्यांकडून मिळणाºया महसुलातून बोनस का द्यावा, असा वाद ठरलेला असायचा. अखेर सरकार व महापालिकांनीही सानुग्रह अनुदान, अग्रिम रक्कम (फेस्टिवल अलाउन्स) या नावाने दिवाळीत ठरावीक रक्कम द्यायला सुरुवात केली.
याची आठवण होण्याचे कारण म्हणजे सध्या बोनससाठी कुठेही आंदोलन झाल्याच्या बातम्या नाहीत. खरे तर कामगार संघटनाही अस्तंगत झाल्यात जमा आहेत. तरीही रेल्वेतील ११ लाख ५२ हजार कामगार व कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या पगाराइतका बोनस देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. पूर्वी रेल्वेत जॉर्ज फर्नांडिस यांंची मोठी संघटना होती आणि ते बोनससाठी आंदोलन करीत. आता ते हयात नाहीत. पण रेल्वेने स्वत:हून उत्पादकतेशी निगडित बोनसची घोषणा केली आहे. मुंबई महापालिकेनेही १५ हजार सानुग्रह अनुदान देण्याचे स्वत:हून घोषित केले. या कामगारांचे नेतृत्वही जॉर्जकडेच होते आणि दरवर्षी त्यांची म्युनिसिपल मजदूर युनियन बोनससाठी आंदोलन करायची.आर्थिक उदारीकरणानंतर चित्र काहीसे बदलत गेले. कामगार व कर्मचाºयांचे पगार बºयापैकी वाढू लागले. काही कंपन्या, कार्यालये, उद्योग स्वत:हून दिवाळीआधी कर्मचाºयांना बोनस देऊ लागले. याच काळात कामगार कायदे व उद्योगांशी संबंधित कायदे यांत झालेल्या बदलांमुळे कामगार संघटना निष्प्रभ होत गेल्या होत्या. अर्थात त्याला संघटनांच्या नावाने दुकानदारी करणारे कामगार नेतेही कारणीभूत होतेच.सध्या देशातील बहुसंख्य उद्योगांवर आर्थिक मंदीचे सावट आहे. अनेक उद्योगांतील लोकांच्या नोकºया गेल्या आहेत. काहींच्या जाण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी दिवाळीत फारशी खरेदी होण्याची शक्यता नसल्याचे व्यापारी व उद्योजकांनाच वाटत आहे. मोटारी, फ्रीज, एसी तर सोडाच, पण नियमित वापराच्या वस्तूंच्या खरेदीवरही आताच परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे. नाही म्हणायला मोठे सेल आता सुरू होतील, ग्राहकांनी खरेदी करावी, यासाठी फेस्टिव्हल आयोजित करण्यात येतील. त्यांना किती प्रतिसाद मिळतो, हे पाहायला हवे. बोनस मिळण्यापेक्षा असलेली नोकरी टिकवणे, हेच अधिक महत्त्वाचे झाले आहे. बहुधा म्हणूनच दिवाळीला एक महिना शिल्लक राहिला असूनही कुठेही बोनसची चर्चा होताना दिसत नाही.महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका दिवाळीच्या आधी पार पडतील, हे जवळपास स्पष्ट आहे. या निवडणुकांच्या आचारसंहिता लागण्याआधी आपल्या हाती काही रक्कम पडणार, की निवडणुका आटोपल्यानंतर त्या रकमेची घोषणा होणार, याकडे सरकारी कर्मचाºयांचेही लक्ष लागले आहे.(समूह वृत्त समन्वयक)