शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
2
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
3
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
4
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
5
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
6
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
7
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
8
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
9
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
10
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
11
नोकरीचं राहुद्या आता अमेरिकेत फिरायला जाणेही कठीण! ट्रम्प म्हणाले 'या' हेतूने येणाऱ्यांना पर्यटन व्हिसा नाही
12
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
13
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
14
Astro Tips: तिन्ही सांजेला 'या' ५ चुका करणे म्हणजे घरी आलेली लक्ष्मी परतावून लावणे!
15
इंडिगो संकटाची मोठी किंमत! DGCAची कठोर कारवाई, निष्काळजीपणा आढळताच ४ अधिकारी निलंबित
16
Vaibhav Suryavanshi : षटकार-चौकारांची 'बरसात'! वादळी शतकासह वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
17
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
18
ब्रह्मोसपेक्षा वेगवान; भारताला मिळणार 300 रशियन R-37M क्षेपणास्त्रे, सुखोई विमानात बसवले जाणार
19
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
20
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
Daily Top 2Weekly Top 5

‘मिशन शक्ती’बद्दल वैज्ञानिकांना सलाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 07:53 IST

जमिनीवरून एक क्षेपणास्त्र सोडून भारताने अंतराळातील स्वत:च्याच एका उपग्रहाचा अचूक वेध घेऊन तो नष्ट करण्याची ‘मिशन शक्ती’ मोहीम यशस्वी केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात केली

विजय दर्डा

जमिनीवरून एक क्षेपणास्त्र सोडून भारताने अंतराळातील स्वत:च्याच एका उपग्रहाचा अचूक वेध घेऊन तो नष्ट करण्याची ‘मिशन शक्ती’ मोहीम यशस्वी केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात केली आणि भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या (इस्रो) व संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) वैज्ञानिकांनी आपल्या कर्तृत्वातून प्रत्येक भारतीयाची मान गर्वाने पुन्हा एकदा ताठ केली. सध्या लोकसभा निवडणुकीचा हंगाम असल्याने मोदींनी नाट्यमयरीत्या ही घोषणा करून वैज्ञानिकांच्या यशाचे राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही स्वाभाविकपणे झाला. ज्यांनी ही कामगिरी फत्ते केली त्यांनीच त्याची घोषणा करायला हवी होती, असे हा आक्षेप घेणाऱ्यांचे म्हणणे होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उपग्रहाचा हा लक्ष्यभेद करण्याची काही गरज होती का, असाही प्रश्न उपस्थित केला गेला. ही कामगिरी भाजपाचे सरकार येण्याआधी चार वर्षांपूर्वीही करता आली असती, असेही म्हटले गेले. त्यासाठी त्या वेळच्या निर्णयाचे दाखलेही दिले गेले.

यावरून नंतर आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरू झाली. भाजपाचे नेते म्हणू लागले की, वैज्ञानिकांची ही चाचणी घेण्याची आधीपासूनच तयारी होती, पण त्या वेळच्या काँग्रेस सरकारने त्यांना त्यासाठी परवानगी दिली नाही. याला उत्तर देताना काँग्रेसने स्पष्ट केले की, या योजनेवर सन २०१२ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारच्या काळातच काम सुरू झाले होते. परंतु या पद्धतीची महान वैज्ञानिक उपलब्धी असलेल्या बाबींचे कधीही कोणी राजकारण करू नये, असे माझे स्पष्ट मत आहे. आपले वैज्ञानिक किती मेहनतीने आणि समर्पणाच्या भावनेने काम करत असतात याची आपल्याला बाहेर बसून कल्पनाही येणार नाही. संयुक्त संसदीय समितीचा सदस्य या नात्याने सुमारे पाच वर्षांपूर्वी मी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ प्रक्षेपण केंद्रात गेलो होतो. तेथील वैज्ञानिकांची निष्ठा व कामात झोकून देण्याची वृत्ती मी स्वत: अनुभवली आहे. तेथील वातानुकूलित खोल्यांमध्येही त्यांच्या कपाळावर येणारा घाम मी पाहिला आहे. तेथील वैज्ञानिकांनी मला सांगितले की, नव्या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याआधी त्याची प्रतिकृती भगवान बालाजीला अर्पण करण्यासाठी आम्ही घेऊन गेलो तेव्हा आमच्यावर वैज्ञानिक धर्माच्या आहारी गेल्याची टीका झाली. अशा प्रकारच्या राजकारणाने या वैज्ञानिकांना नक्कीच मानसिक क्लेष होतात. वैज्ञानिक असले तरी एक व्यक्ती म्हणून त्यांनाही धर्म व श्रद्धा आहेतच की! ते आपली कामगिरी वैज्ञानिक उपलब्धी म्हणून पाहतात, राजकारणाच्या नजरेतून नव्हे!तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटेल की, पाकिस्तानच्या नंतर एक वर्षाने म्हणजे सन १९६२ मध्ये भारताने अंतराळ संशोधन कार्यक्रम सुरू केला. आज या क्षेत्रात आपण पाकिस्तानच्या कितीतरी पुढे आहोत. याचे कारण एकच की, आपल्याकडे केंद्रात कोणत्याही पक्षाची सत्ता असली तरी अंतराळ संशोधनाच्या कार्यक्रमाला नेहमीच प्रोत्साहन दिले गेले.अंतराळ विज्ञानाच्या बाबतीत भारताने प्रगती करत यशाचे शिखर गाठावे, हे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे स्वप्न होते. त्यांचे विश्वासू सहकारी व थोर वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई यांनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. सन १९६२ मध्ये भारतीय अंतराळ संशोधन समितीची स्थापना झाली. त्यानंतरची यशोगाथा देदीप्यमान आहे. ती पाहता केवळ नेहरूच नव्हे, तर सर्वच पंतप्रधानांनी या कार्यक्रमास प्रोत्साहन दिले हे उघड आहे. मला हे सांगावेसे वाटते की, ३० डिसेंबर १९७१ रोजी डॉ. साराभाई यांचे अचानक निधन झाले तेव्हा ‘इस्रो’ची धुरा कोणाकडे सोपवायची, असा मोठा प्रश्न निर्माण झाला. सर्वांचे लक्ष अमेरिकेत काम करणाऱ्या प्रा. सतीश धवन यांच्याकडे होते. त्यांच्याशी संपर्क साधला गेला, पण डॉ. धवन यांनी लगेच भारतात परत येण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात प्रा. एम.जी.के. मेनन यांना अध्यक्ष केले गेले. प्रा. धवन यांना भारतात येण्यास उद्योगपती जे.आर.डी. टाटा यांनी राजी करावे, असा आग्रह तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी धरला. तेव्हा त्याचे महत्त्व लक्षात घेत टाटांनी शब्द टाकला आणि प्रा. धवन तयार झाले! ही पार्श्वभूमी समजून घेतली, तर आज आपण ‘इस्रो’च्या यशाबद्दल बोलतो तेव्हा इंदिराजींचे योगदान विसरता कसे येईल? इंदिराजींनी १९७२ मध्ये अंतरिक्ष आयोगाची स्थापना केली. त्याच आयोगाच्या कक्षेत ‘इस्रो’ काम करते.त्यामुळे आधीच्या सरकारने काहीच केले नाही, जे केले ते फक्त आम्हीच, असे कोणी म्हणणे पूर्णपणे अयोग्य आहे. वास्तव असे आहे की, चीनने सन २००७ मध्ये जेव्हा क्षेपणास्त्राने उपग्रह नष्ट करण्याची क्षमता विकसित केली तेव्हाच भारतानेही या दिशेने काम सुरू केले होते. याचे कारण देशाच्या सर्वांगीण संरक्षणासाठी ही क्षमता विकसित करणे नितांत गरजेचे होते. आता बॅलेस्टिक क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण सज्जतेत भारत वेगाने प्रगती करेल. भारत आपली धोरणे वेगाने बदलत आहे, याचेही हे द्योतक आहे. खरोखरच युद्धाची वेळ आली, तर शत्रूची अण्वस्त्रेही हवेतल्या हवेत नष्ट करण्याची क्षमता भारत आत्मसात करू शकेल. या अभिमानास्पद कामगिरीबद्दल वैज्ञानिकांना माझा सलाम!(लेखक लोकमत समुहात एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन आहेत)

टॅग्स :Mission Shaktiमिशन शक्तीNarendra Modiनरेंद्र मोदी