शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

पालकत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 00:13 IST

आज समाजात मोठ्या प्रमाणात आपल्या मुलाबाळांचे लाड करताना पालक वर्ग दिसतो. मला आयुष्यात ज्या काही सुख सुविधा मिळाल्या नाही त्या सर्व त्यांना मिळवून देण्याचा अथक प्रयत्न करतात. आपल्या मुलांना सुख सुविधा देणे हे पालकांचे आद्य कर्तव्यच आहे मात्र कधीकधी तर पालक वर्ग अति प्रेमामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त गोष्टी मुलांना सहजतेने उपलब्ध करून देतात.

- प्रा. डॉ. संदीप ताटेवारआज समाजात मोठ्या प्रमाणात आपल्या मुलाबाळांचे लाड करताना पालक वर्ग दिसतो. मला आयुष्यात ज्या काही सुख सुविधा मिळाल्या नाही त्या सर्व त्यांना मिळवून देण्याचा अथक प्रयत्न करतात. आपल्या मुलांना सुख सुविधा देणे हे पालकांचे आद्य कर्तव्यच आहे मात्र कधीकधी तर पालक वर्ग अति प्रेमामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त गोष्टी मुलांना सहजतेने उपलब्ध करून देतात. काही पालक तर म्हणतात, आमच्या मुलांच्या नशिबात आहे तर कां बर त्यांनी खर्च करू नये? असाच विचार करणारे माझ्या माहितीतील गृहस्थ होते. त्यांचा मुलगा लहानपणापासून लाडात वाढलेला होता. मुलाची शैक्षणिक कुवत नसताना वडिलांनी भरपूर देणगी देऊन खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला. मुलाच्या तोंडून एखादी गोष्ट निघायला वेळ, ती तात्काळ उपलब्ध होत होती. सहज गोष्टी मिळत गेल्या की त्याची किंमत नसते त्याचप्रमाणे मुलाला पैशांची किंमत काही कळेना! मुलाच्या अनावश्यक मागण्या खूप वाढत गेल्या व वडील आनंदाने पूर्ण करू लागले. मुलाचे मन अभ्यासापेक्षा बाकी गोष्टीमध्ये रमू लागले व शेवटी त्याने शिक्षण पूर्ण न करताच सोडून दिले. वडिलांना वाटायचे मी पाच पिढ्याचे कमावले आहे तेव्हा काय फरक पडणार! काही दिवसातच वडिलांचे निधन झाले. पाच पिढ्याची कमावलेली संपत्ती १०-१५ वर्षाच्या काळात मुलांनी मोठेपणाचे प्रदर्शन करण्यात व वाईट व्यसनापायी विकून टाकली. आई मुलाचे कसे होईल या काळजीपोटी खचून गेली व तिचेही निधन झाले. आर्थिक परिस्थिती इतकी खालावलेली की सगळ्या नातेवाईकांनी पैसे गोळा करून तिचे अंत्यसंस्कार केले. म्हणूनच चाणक्य म्हणतातलालयेत पंच वर्षाणि दश ताडयेत।प्राप्ते तू षोडशे वर्ष पुत्र मित्रवदाचरेत ।।मुलगा अजाण असताना म्हणजे पाच वर्षाचा होईपर्यंत त्याचे लाड करावेत परंतु त्यानंतरचे दहा वर्षे त्याला चांगले वळण लागण्यासाठी वेळ पडल्यास दंडित करावे व १६ वे वर्ष लागले म्हणजे वयाचा मान ठेवून त्याच्याशी मित्राप्रमाणे वागावे. त्यामुळेच मुलांना पैशांची किमत, चांगले संस्कार, भविष्याची जाण निर्माण होते अन्यथा अतिलाडामुळे बरेचदा आपलेच पालकत्व आपल्या पिढीचा नाश करण्यासाठी कारणीभूत होते.

टॅग्स :Familyपरिवारnewsबातम्या