शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पालकत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 00:13 IST

आज समाजात मोठ्या प्रमाणात आपल्या मुलाबाळांचे लाड करताना पालक वर्ग दिसतो. मला आयुष्यात ज्या काही सुख सुविधा मिळाल्या नाही त्या सर्व त्यांना मिळवून देण्याचा अथक प्रयत्न करतात. आपल्या मुलांना सुख सुविधा देणे हे पालकांचे आद्य कर्तव्यच आहे मात्र कधीकधी तर पालक वर्ग अति प्रेमामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त गोष्टी मुलांना सहजतेने उपलब्ध करून देतात.

- प्रा. डॉ. संदीप ताटेवारआज समाजात मोठ्या प्रमाणात आपल्या मुलाबाळांचे लाड करताना पालक वर्ग दिसतो. मला आयुष्यात ज्या काही सुख सुविधा मिळाल्या नाही त्या सर्व त्यांना मिळवून देण्याचा अथक प्रयत्न करतात. आपल्या मुलांना सुख सुविधा देणे हे पालकांचे आद्य कर्तव्यच आहे मात्र कधीकधी तर पालक वर्ग अति प्रेमामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त गोष्टी मुलांना सहजतेने उपलब्ध करून देतात. काही पालक तर म्हणतात, आमच्या मुलांच्या नशिबात आहे तर कां बर त्यांनी खर्च करू नये? असाच विचार करणारे माझ्या माहितीतील गृहस्थ होते. त्यांचा मुलगा लहानपणापासून लाडात वाढलेला होता. मुलाची शैक्षणिक कुवत नसताना वडिलांनी भरपूर देणगी देऊन खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला. मुलाच्या तोंडून एखादी गोष्ट निघायला वेळ, ती तात्काळ उपलब्ध होत होती. सहज गोष्टी मिळत गेल्या की त्याची किंमत नसते त्याचप्रमाणे मुलाला पैशांची किंमत काही कळेना! मुलाच्या अनावश्यक मागण्या खूप वाढत गेल्या व वडील आनंदाने पूर्ण करू लागले. मुलाचे मन अभ्यासापेक्षा बाकी गोष्टीमध्ये रमू लागले व शेवटी त्याने शिक्षण पूर्ण न करताच सोडून दिले. वडिलांना वाटायचे मी पाच पिढ्याचे कमावले आहे तेव्हा काय फरक पडणार! काही दिवसातच वडिलांचे निधन झाले. पाच पिढ्याची कमावलेली संपत्ती १०-१५ वर्षाच्या काळात मुलांनी मोठेपणाचे प्रदर्शन करण्यात व वाईट व्यसनापायी विकून टाकली. आई मुलाचे कसे होईल या काळजीपोटी खचून गेली व तिचेही निधन झाले. आर्थिक परिस्थिती इतकी खालावलेली की सगळ्या नातेवाईकांनी पैसे गोळा करून तिचे अंत्यसंस्कार केले. म्हणूनच चाणक्य म्हणतातलालयेत पंच वर्षाणि दश ताडयेत।प्राप्ते तू षोडशे वर्ष पुत्र मित्रवदाचरेत ।।मुलगा अजाण असताना म्हणजे पाच वर्षाचा होईपर्यंत त्याचे लाड करावेत परंतु त्यानंतरचे दहा वर्षे त्याला चांगले वळण लागण्यासाठी वेळ पडल्यास दंडित करावे व १६ वे वर्ष लागले म्हणजे वयाचा मान ठेवून त्याच्याशी मित्राप्रमाणे वागावे. त्यामुळेच मुलांना पैशांची किमत, चांगले संस्कार, भविष्याची जाण निर्माण होते अन्यथा अतिलाडामुळे बरेचदा आपलेच पालकत्व आपल्या पिढीचा नाश करण्यासाठी कारणीभूत होते.

टॅग्स :Familyपरिवारnewsबातम्या