शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

महेंद्र गिरींना अभिवादन व प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:43 IST

रोमन कॅथलिक पंथाच्या अनेक पुरोहितांनी चर्चच्या पवित्र आवारात केलेल्या व्यभिचारासाठी याआधीचे पोप बेनेडिक्ट (सोळावे) यांनी आपल्या सा-या धर्मबांधवांसह जगाची क्षमा मागण्याचे जे धारिष्ट्य दाखविले तेच आता हिंदू धर्माबाबत अ.भा. आखाडा परिषदेने दाखविण्याची सिद्धता केली आहे.

रोमन कॅथलिक पंथाच्या अनेक पुरोहितांनी चर्चच्या पवित्र आवारात केलेल्या व्यभिचारासाठी याआधीचे पोप बेनेडिक्ट (सोळावे) यांनी आपल्या सा-या धर्मबांधवांसह जगाची क्षमा मागण्याचे जे धारिष्ट्य दाखविले तेच आता हिंदू धर्माबाबत अ.भा. आखाडा परिषदेने दाखविण्याची सिद्धता केली आहे. रामरहीम, आसाराम, राधे मां आणि रामपाल या बाबांसह अन्य १४ बाबांची नावे त्यांच्या माहितीनिशी जाहीर करण्याची तयारी या आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत महेंद्र गिरी यांनी केली आहे. अशा बाबांची नावे केंद्र व राज्य सरकारांसह विरोधी पक्षांकडे सोपविण्याची घोषणा करून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या नकली बाबांची जी वैशिष्ट्ये त्यांनी यावेळी जाहीर केली ती भल्याभल्यांचे व अनेक थोरामोठ्यांचे डोळे पांढरे करणारी आहे. त्यातले महत्त्वाचे गुणवैशिष्ट्य, धर्मगुरू म्हणविणाºया कोणत्याही बाबाजवळ खासगी म्हणावी अशी संपत्ती नसणे, हे आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक अन्वेषण विभागाने केलेल्या पाहणीनुसार एकट्या आसाराम बापूची खासगी मालमत्ता २७ हजार कोटींच्या घरात जाणारी आहे. त्यांच्या एकेकाळच्या शिष्य परिवारात तेव्हा व आज सरकारात असलेली काही मोठी माणसेही आहेत. अशाच एका दुस-या बाबाने आपल्या वेगवेगळ्या राज्यांतील इस्टेटी सांभाळण्यासाठी लष्करातील अनेक वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकाºयांना ‘मॅनेजर’ म्हणून नेमले आहे. याआधी एक असेच महंत देवाघरी गेले तेव्हा त्यांच्या आश्रमातून फार मोठा खजिना अनेक मालमोटारीतून रातोरात अन्यत्र हलविला गेल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या. त्या महंताच्या पायाशी राष्ट्रपती, पंतप्रधान व अनेक राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री बसत आणि त्याने दिलेल्या हिरव्या खड्याच्या अंगठ्या त्याचा आशीर्वाद म्हणून सन्मानाने बोटात घालून मिरवत. ती राधे मां तर जेव्हा नाच करते तेव्हा तो धार्मिक असतो की लैंगिक असाच प्रश्न पाहणाºयांना पडतो. पण अनेक वरिष्ठ अधिकारी व नेते तिच्या श्रद्धेत असल्याचे तिच्या छायाचित्रातून दिसते. कोणत्याही धर्माची सुधारणा त्याच धर्मातील लोकांनी पुढे होऊन केली तरच ती परिणामकारक होते. ती करण्याचे धाडस एकेकाळी आगरकरांनी केले. तेच धारिष्ट्य आता महंत महेंद्र गिरी करीत असतील तर त्यांच्या धाडसाचे निव्वळ कौतुक करून चालणार नाही. धर्म सुधारणेतील त्यांच्या अभिक्रमाला साºयांनी साथही दिली पाहिजे. पोप बेनेडिक्ट यांना अशी साथ सा-या युरोपात मिळाली. असा प्रयत्न मुस्लीम धर्मात मौलाना अबुल कलम आझाद यांनी केला. मात्र त्यांना साथ देणारे त्या धर्मात फारसे कुणी पुढे आले नाही. साधे लहानसहान बुवाबाबा जे गंडेदोरे विकून पोट भरतात त्यांचे पापही वीतभरच असते. पण जे समाजाला भुरळ घालून अब्जावधींची माया जमवितात त्यांचे पाप आकाश व्यापणारे असते. ते समाजाएवढेच धर्मालाही बदनाम करीत असतात. त्यांचे लक्षही संपत्ती, स्त्री आणि आपल्या धर्मसामर्थ्याची जाहिरात यावर असते. या बड्या बाबांना शरण जाणारे व त्यांच्यासमोर बसून त्यांचीच भजने आरती केल्यासारखे म्हणणारे त्यांचे भक्त अडाणी, अशिक्षित वा ग्रामीण नसतात. त्या भक्तांच्या रांगेत गरिबांना प्रवेशही नसतो. ही माणसे पदवीधर, धनवंत व चांगली प्रतिष्ठित म्हणविणारी असतात. आपली सारी अक्कल गहाण ठेवल्यासारखी ती बाबांचे गोडवे गातात आणि त्यांची वक्तव्ये अवतरणासारखी आपल्या संभाषणात आणतात. अशा बाबांना दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीत करोडो रुपयांची उधळपट्टी करून आपले सोहळे साजरे करता येतात आणि देशाचे नेतृत्व करणारी माणसे त्या सोहळ्यात त्यांची हजेरी लावतात. अशी बाबा माणसे या आखाडा परिषदेने जगासमोर आणली तर शोषणमुक्तीच्या व स्त्रीमुक्तीच्या चळवळींना त्यातून बळही मिळेल. महंत महेंद्र गिरी यांना त्यांच्या या धाडसाचा मोबदला खुनाच्या धमक्यांंमधून आताच मिळू लागला आहे. ‘आमच्या बाबाचे नाव घ्याल तर ठार मारू’ असे त्यांना ऐकविले जात आहे. आतापर्यंत दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी यांच्या वाट्याला अशा धमक्या आल्या व त्या खºयाही झाल्या. आता त्या यादीत महेंद्र गिरी सामील होत असतील तर त्यांच्याभोवती सा-यांनी संरक्षणाचे कडे उभारले पाहिजे व त्यांच्या धाडसाला सर्वांनी साथ दिली पाहिजे. साºया चिकित्सांची सुरुवात धर्मचिकित्सेपासून झाली पाहिजे असे मार्क्स म्हणाला. मात्र ज्यांनी अशी चिकित्सा केली व त्यातले दोष दाखविले त्यांच्या वाट्याला फारसे चांगले दिवस आले नाहीत. मराठीतील संतांपासून थेट आंबेडकरांपर्यंतच्या साºयांच्या वाट्याला अवहेलना आणि तिरस्कारच अधिक आला. धर्माविषयी आंधळेपण बाळगणारे लोक गांधींसारख्यांचीही हत्या करताना आपण पाहिले. या स्थितीत आखाडा परिषद हीच या बुवाबाजीविरुद्ध उभी राहात असेल तर तो धर्मातील दोषांना आजवरचा लागलेला सर्वात मोठा सुरुंग समजला पाहिजे. जाता जाता एक गोष्ट या महेंद्र महाराजांनाही सांगायची. धर्माच्या नावावर येथे केवळ संपत्तीच लाटली जात नाही. त्याच्या नावावर येथे सत्ताही लाटता येते. शिवाय सत्तेची लूट संपत्तीच्या लुटीहून मोठीही असते. महेंद्र महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या लुटारूंकडेही कधीतरी लक्ष द्यावे ही त्यांना आमची नम्र प्रार्थना.

टॅग्स :Indiaभारत