शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

‘कुणा’चे अच्छे दिन, समाजातील धनवंतांच्या गरजा व इच्छा पूर्ण करण्यासाठी सरकारची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:54 IST

चलनबदलाच्या नावाने प्रथम जनतेला तिचा पांढरा पैसा सरकारी अधिकोषात जमा करायला लावला. परिणामी खेळते चलन थांबले. मग जनधन योजनेत सा-यांना बँकांमध्ये खाती उघडायला भाग पाडले.

चलनबदलाच्या नावाने प्रथम जनतेला तिचा पांढरा पैसा सरकारी अधिकोषात जमा करायला लावला. परिणामी खेळते चलन थांबले. मग जनधन योजनेत सा-यांना बँकांमध्ये खाती उघडायला भाग पाडले. त्यात सरकारकडून ‘काळा पैसा’ जमा व्हायचा होता. तो झाला नाही. उलट बँकेत किमान पाच हजार रुपये रक्कम जमा नसेल तर तो अपराध दंडनीय ठरविला गेला. (हाती पैसा नसलेल्यांनी तो कुठून आणायचा हा प्रश्न सरकारचा नाही. सामान्य माणसांचा आहे.) या काळात चलनबदलाचा परिणाम होऊन महागाईने आसमान गाठले. अनेक जीवनावयक वस्तूंच्या किमती अडीचशे टक्क्यांनी वाढल्याचे आढळले. पेट्रोलच्या किमती लिटरमागे १३ रुपयांनी तर डिझेलच्या ७ रुपयांनी वाढविण्यात आल्या. गॅसच्या किमती, त्यावरील सबसिडी थांबवून दुप्पट करण्यात आल्या. याच काळात महाराष्ट्र सरकारने स्वस्त धान्य दुकानातून दिले जाणारे साखर व केरोसिन थांबविले. त्याचा फटका राज्यातील ४५ लक्ष कुटुंबांना बसला. शिवाय रेशनकार्डावर दरमहा एक किलो एवढीच साखर गरीब कुटुंबांना दिली जाईल हे त्यांना ऐन सणासुदीच्या काळात सांगितले गेले. हातचा पैसा निघून गेला, वर बँकेत जमा करायला पैसा आणणे आणि त्यासाठी वणवण करणे साºया गरिबांच्या वाट्याला आले. शिवाय त्यांच्या हातून बाजारही दूर गेला. घरबांधणीची कामे थांबल्याने मजुरांच्या वाट्याला मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आली. देशात रोजगार वाढला नाही आणि बेरोजगारांच्या संख्येत वाढ होणे थांबले नाही. सामान्य माणसांच्या जीवनात ‘अच्छे दिन’ येतील हे आश्वासन देऊन आलेल्या मोदी सरकारची गेल्या तीन वर्षातली ही खरी उपलब्धी आहे. नाही म्हणायला समाजातील धनवंतांच्या गरजा व इच्छा पूर्ण करण्यासाठी हे सरकार धडपडले. त्याने अहमदाबादहून मुंबईपर्यंत दोन तासात येता येईल अशी बुलेट ट्रेन आणण्याचा घाट घातला. मुंबईसह नागपूरसारख्या शहरात मेट्रो रेल्वे उभी करण्याचा ध्यास धरला. मिहानसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडले आणि त्यात रामदेवबाबाच्या फूड पार्कसह काही एक आले नाही. परिणामी कोट्यवधींची मालमत्ता नुसतीच जमिनीवर राहिली. दरवर्षी पाच लक्ष अभियंत्यांना नोकºया देण्याचे केंद्राचे आश्वासनही उड्डाण घेताना दिसले नाही. छोट्या उद्योगांना प्रोत्साहन नाही. गृहोद्योगांना उठाव नाही आणि खादीला दिली जाणारी सबसिडी यापुढे मिळायची नाही. सरकारी दवाखान्यात औषधे नाहीत आणि ग्रामीण इस्पितळात डॉक्टर्स उपलब्ध नाहीत. या दवाखान्यांना दिला जाणारा आस्थापना खर्च थांबविण्यात आला आहे. एका बाजूला सामान्य माणसांची सरकारकडून अशी होरपळ होत असताना दुसºया बाजूला धनवंतांचे आयुष्य केवळ सुरक्षितच नव्हे तर दिवसेंदिवस जास्तीचे वैभवशाली होत असलेले आढळले. सारे उद्योगपती सरकारवर प्रसन्न आहेत आणि सगळी बडी माध्यमे आपल्या ताब्यात राहतील अशी व्यवस्थाही सरकारने केली आहे. जे विरोधात बोलतात वा लिहितात ते मारले जातात आणि त्यांचे मारेकरी कधी पकडले जात नाहीत. उलट खून, खंडणीखोरी, सामूहिक हत्याकांडे आणि अतिरेकी कारवाया यांचे आरोप ज्यांच्या शिरावर आहेत अशी संघ परिवाराशी निगडीत माणसे न्यायालयात सुटतील अशा तºहेचा सैल कारभार तपास यंत्रणांकडून चालविला गेलेला अलीकडे दिसला. असे अनेक आरोपी आता सरकारात व प्रशासनासह लष्करात सुप्रतिष्ठित झालेले देशाला दिसले. काही माणसांचे वैभव हा समाजात आलेल्या ‘अच्छे दिना’चा निकष असेल तर मोदी सरकार यशस्वी झाले असे म्हटले पाहिजे. मात्र समाजाची अवस्था मनात आणली की आपण फार वेगळ्या निकषावर जातो.