शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2016 04:20 IST

राजा बोले आणि दल हाले असा प्रकार केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही कल्पना मांडायची आणि राज्य सरकारसह लोकप्रतिनिधींनी उत्साहात तिची

राजा बोले आणि दल हाले असा प्रकार केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही कल्पना मांडायची आणि राज्य सरकारसह लोकप्रतिनिधींनी उत्साहात तिची अंमलबजावणी करायची, हा प्रघात पडला आहे. स्वच्छ भारत अभियानाचा गाजावाजा झाला. नंतर दोन वर्षात कुणाला या अभियानाची आठवणदेखील राहिली नाही. जनतेच्या माथी मात्र स्वच्छता कराचा अर्धा टक्क््याचा भुर्दंड बसला. हीच स्थिती राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारची आहे. दोन कोटी वृक्ष लागवड योजनेचे अधिकृत फोटोसेशन लोकप्रतिनिधी व अधिकारी वर्गाने अमाप उत्साहात उरकले. आता त्या रोपट्यांची अवस्था बघायला वन विभागासह कोणत्याही शासकीय विभागांना वेळ नाही. अलीकडे संसद व विधिमंडळाची पावसाळी अधिवेशने आटोपली. भाजपाने आपल्या सदस्यांच्या बैठका घेऊन त्यांना मतदारसंघात जाऊन करावयाच्या कामांच्या सूचना दिल्या. खासदारांनी तातडीने जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा घेतली. ही सभा घेण्याची सूचना म्हणे, खुद्द पंतप्रधानांनी केली होती. ही सभा घेऊन केंद्र शासनाच्या विविध २८ योजनांचा आढावा घेऊन त्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाला पाठवायचे बंधन खासदारांना होते. परंतु जळगावात झालेल्या या समितीच्या बैठकीला बीएसएनएल, वीज कंपनी व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारली. अन्य काही प्रमुख विभागांचे अधिकारी अनुपस्थित होते, त्यांनी आपले प्रतिनिधी पाठविले. बैठकीत प्रमुख विभागांविषयी चर्चा झाली नाही. खासदारांनी त्रागा केला. पण त्याचा प्रशासनावर काहीही परिणाम झाला नाही. सभेच्या इतिवृत्तात नोंद होण्यापलीकडे दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने असे प्रकार वारंवार घडत असतात. हीच स्थिती स्वातंत्र्यदिनी प्रत्येक गावात आयोजित विशेष ग्रामसभेच्याबाबतही आढळून आली. शासकीय उपचार म्हणून या ग्रामसभा अनेक ठिकाणी कागदावर उरकल्या. १४ व्या वित्त आयोगाच्या पाच वर्षांचा आराखडा आणि चालू वर्षाच्या निधीचे नियोजन या ग्रामसभेत अपेक्षित होते. परंतु सरपंच आणि ग्रामसेवकांनी नेहमीप्रमाणे ग्रामस्थांना अंधारात ठेवून सभा ‘खेळीमेळीत आणि उत्साहात’ पार पडली, असे इतिवृत्त लिहून दिवस साजरा केला. शासनाच्या प्रत्येक निर्णयात, योजनेत जनतेचा सहभाग असावा हा धोरणकर्त्यांचा उद्देश कितीही चांगला असला तरी गाव पातळीवर तसे घडत नाही हे वास्तव आहे. ही स्थिती बदलण्याची इच्छा शासकीय यंत्रणा, गाव पुढारी किंवा जनता अशा कोणत्याही घटकाला नाही. त्यामुळे शासनातर्फे आयोजित अशा सभा, उपक्रम हे केवळ अर्थहीन उपचार ठरत आहेत.