शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

शासकीय कार्यालयांतील टॉयलेट एक ‘व्यथा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 04:16 IST

टॉयलेट एक पे्रमकथा नावाचा चित्रपट २०१७ मध्ये येऊन गेला. अक्षयकुमार अभिनित हा चित्रपट स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारा होता. ‘स्वच्छ भारत अभियान’च्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट बेतलेला होता

टॉयलेट एक पे्रमकथा नावाचा चित्रपट २०१७ मध्ये येऊन गेला. अक्षयकुमार अभिनित हा चित्रपट स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारा होता. ‘स्वच्छ भारत अभियान’च्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट बेतलेला होता. त्याला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला. यापासून प्रेरणा घेऊन शासकीय जनजागरण आणि अनुदानाच्या माध्यमातून अनेक गावे, शहरे हागणदारीमुक्त झाली. परंतु, सरकार किंवा शासनव्यवस्था चालविणाऱ्या शासकीय कार्यालयांतील टॉयलेटची म्हणजेच स्वच्छतागृहांची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने कोल्हापुरातील प्रमुख शासकीय कार्यालयांच्या टॉयलेटचे स्टिंग आॅपरेशन गेल्या आठवड्यात केले. त्यातून काय दिसले. नागरिकांना स्वच्छतेची शिकवण देणाºया सरकारच्या कार्यालयांतील स्वच्छतागृहेच अस्वच्छ आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मध्यवती बसस्थानक आदींचा समावेश आहे. जिल्हा परिषद, न्याय संकुल, पोलीस मुख्यालय, रेल्वे स्थानक यासारख्या काही कार्यालयांतील स्वच्छतागृहे मात्र स्वच्छ होती. त्यांची दैनंदिन स्वच्छता केली जात असल्याचे आढळून आले. ज्या ठिकाणी अस्वच्छता होती तिथे दुर्गंधीचे साम्राज्य होते. पान, मावा, तंबाखू खाऊन मारलेल्या पिचकाºयांचे व्रण जिथे-तिथे दिसत होते. नागरिकांना त्या स्वच्छतागृहात जाताना नाक मुठीत धरूनच जावे लागत होते.हे केवळ कोल्हापुरातील चित्र असले तरी राज्यातील शासकीय कार्यालयांतील ते यापेक्षा वेगळे नसावे. याला काही अपवाद असतात; परंतु शासकीय अनास्था स्वच्छतागृहांच्या बाबतीत सर्रास दिसून येते. केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत अनेक गावे, शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत. शासनदप्तरी ती हागणदारीमुक्त असली तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणांची वस्तुस्थिती काहीशी वेगळी असते. ते कुणीही नाकारणार नाही. याच अभियानांतर्गत केंद्र सरकार स्वच्छ शहरांचे मानांकनही जाहीर करते. त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रातील एक ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सातारा १६ व्या व सांगली-मिरज-कुपवाड २६ व्या, तर कोल्हापूर ३४ व्या क्रमांकावर आजघडीला आहेत. सध्या अनेक नगरपालिका स्वच्छतेच्या जाहिराती प्रसिद्ध करून या कार्यक्रमातील आपला सहभाग नोंदवीत आहेत. पण, हे केवळ जाहिराती किंवा काही दिवसांचे प्रबोधन एवढ्यानेच होणार नाही. यासाठी नागरिकांची मानसिकता तयार करणे व स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यावे लागेल. स्वच्छतेमुळे रोगराई, साथीचे आजार कसे कमी होतात हे सोदाहरण सांगावे लागेल तरच लोक स्वत:हून या अभियानात सहभागी होऊ लागतील. अन्यथा, केवळ एक शासकीय कार्यक्रम असेच त्याचे स्वरूप राहील.शासकीय कार्यालयांत फेरफटका मारला असता अनेक फाईल्सवर धूळ साचलेली दिसते. डिजिटलच्या जमान्यात फाईल्स इतिहासजमा होत असल्या तरी अद्याप अनेक कार्यालयांमध्ये त्यांचे अस्तित्व आहे. कार्यालयीन कामात डिजिटलमुळे बदल घडले, आधुनिकता आली तरी स्वच्छतागृहांबाबत अजूनही सुधारणा झालेली दिसत नाही. ती होण्यासाठी सरकारने कडक धोरण स्वीकारायला हवे. पडझड झालेली स्वच्छतागृहे तातडीने दुरुस्त करावीत. तसेच अधिकारी, कर्मचाºयांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. कामचुकारपणा करणाºयांवर थेट कारवाईचा बडगा उगारायला हवा. असे झाले तरच शासकीय कार्यालयांतील ही स्वच्छतागृहे ‘टॉयलेट एक व्यथा’ न राहता ‘प्रेमकथा’ बनतील.- चंद्रकांत कित्तुरे

(chandrakant.kitture@gmail.com)