शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय ‘अ‍ॅनिमल फार्म’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:19 IST

​​​​​​​जॉर्ज आॅर्वेल या प्रख्यात इंग्लिश लेखकाने विसाव्या शतकात लिहिलेली ‘अ‍ॅनिमल फार्म’ ही कादंबरी बहुदा भारतातील वर्तमान राजकीय परिस्थितीचे पूर्वाकलन करूनच लिहिली असावी, अशी शंका घेण्यास पुरेपूर वाव आहे.

- नंदकिशोर पाटीलजॉर्ज आॅर्वेल या प्रख्यात इंग्लिश लेखकाने विसाव्या शतकात लिहिलेली ‘अ‍ॅनिमल फार्म’ ही कादंबरी बहुदा भारतातील वर्तमान राजकीय परिस्थितीचे पूर्वाकलन करूनच लिहिली असावी, अशी शंका घेण्यास पुरेपूर वाव आहे. किंबहुना, या कादंबरीतील पात्रं आणि आशय बघता तशी खात्रीच पटते. रामराज्याची स्वप्नं दाखवून एखाद्याने आपणास चक्क कीर्र जंगलात सोडावे आणि अवतीभवतीची श्वापदं, वन्यप्राणी बघून आपली घाबरगुंडी उडावी, अशी आपली गत हल्ली राजकीय नेत्यांची भाषणं ऐकताना होते. आपापल्या समर्थकांना ‘पंचतंत्रा’तील गोष्टी ऐकवून जे काही राजकीय मंथन घडविले जाऊ पाहात आहे, ते ऐकून समर्थकांची नव्हे, तर श्वापदांचीच पाचावर धारण बसण्याची वेळ आली आहे. विरोधकांना साप, मुंगूस, उंदीर आणि श्वानाची उपमा देऊन स्वत:ला सिंह म्हणवता येत असेलही; पण इवलासा ससाही सिंहाला कधीकधी भारी ठरू शकतो. इसापनीतीची ही गोष्ट सिंहानी (शहांनी नव्हे!) वाचवी अशी-एका जंगलातील सिंहाचे पोट भरलेले असतानाही तो केवळ शक्तिप्रदर्शन करण्यासाठी दररोज अनेक प्राण्यांना ठार मारत असे. एके दिवशी कोल्ह्याच्या नेतृत्वाखाली प्राण्यांचे एक शिष्टमंडळ सिंहाकडे गेले. कोल्हा म्हणाला, ‘महाराज, आपणास शिकार करण्याचे कष्ट पडू नयेत, म्हणून आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं आहे की दररोज आमच्यापैकी एक प्राणी आपल्याकडे येईल आणि आपले भोजन बनेल.’ कोल्ह्याचा हा प्रस्ताव ऐकून सिंह मनोमन आनंदीत झाला. त्याने प्रस्ताव मान्य केला. सर्व प्राणी निर्भय होऊन परतले. ठरल्याप्रमाणे पाळीपाळीने रोज एक प्राणी सिंहाकडे जाऊ लागला. एके दिवशी सशाची पाळी आली. सशाची घाबरगुंडी उडाली. रोज मनसोक्त बागडणारा ससा सिंहाचे भक्ष्य होण्यास सहजी तयार नव्हता. त्याच्या मनात विचार आला. खरंच! सिंहाला मारण्याचा काही उपाय मिळाला तर? वाटेत सशाला एक विहीर दिसली. त्याने विहिरीत डोकावून पहिले असता त्याला स्वत:चे प्रतिबिंब दिसले. सशाला शक्कल सापडल्याने तो वाटेमध्ये मुद्दामहून थोडा वेळ बसून राहिला. एकडे सिंहाला सपाटून भूक लागलेली. आपल्या भक्ष्याची वाट पाहत बसलेला असताना समोरून ससा येत असताना त्याला दिसला. चवताळेल्या सिंहाने विचारले, ‘काय रे सशा, तू एवढा वेळ का लावलास?’ अत्यंत विनयशील होत ससा उत्तरला, ‘महाराज, यात माझा मुळीच दोष नाही. आपण मला परवानगी दिलीत, तर मला उशीर होण्याचं कारण मी आपणास सांगू शकेन’ ‘जे सांगायचे असेल, ते लवकर सांग’ सिंह गरजला. ससा म्हणाला, ‘महाराज, रस्त्यात अचानक एक दुसरा सिंह भेटला. तो म्हणाला, जंगलाचा राजा तर मी आहे. तू कुठे जात आहेस? जर दुसरा कुणी स्वत:ला राजा म्हणत असेल तर त्याने माझ्याशी आधी युद्ध करावं आणि मला हरवावं!’ सशाचे हे निवेदन ऐकून सिंहाचे पित्त खवळले. सशाने सिंहाला त्या विहिरीपाशी नेले. सिंहाने विहिरीत डोकावून पाहिले. त्याला वाटले, खरंच!आपला प्रतिस्पर्धी विहिरीत लपून बसला आहे. लागलीच तो स्वत:च्या प्रतिबिंबावर झेपावला आणि विहिरीत बुडून मेला! सर्व प्राण्यांना खूप आनंद झाला. त्यांनी सशाचे आभार मानले अन् सर्वांनी मिळून आनंदोत्सव साजरा केला!(तात्पर्य: तुम्हीच काढा!)