शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राजकीय ‘अ‍ॅनिमल फार्म’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:19 IST

​​​​​​​जॉर्ज आॅर्वेल या प्रख्यात इंग्लिश लेखकाने विसाव्या शतकात लिहिलेली ‘अ‍ॅनिमल फार्म’ ही कादंबरी बहुदा भारतातील वर्तमान राजकीय परिस्थितीचे पूर्वाकलन करूनच लिहिली असावी, अशी शंका घेण्यास पुरेपूर वाव आहे.

- नंदकिशोर पाटीलजॉर्ज आॅर्वेल या प्रख्यात इंग्लिश लेखकाने विसाव्या शतकात लिहिलेली ‘अ‍ॅनिमल फार्म’ ही कादंबरी बहुदा भारतातील वर्तमान राजकीय परिस्थितीचे पूर्वाकलन करूनच लिहिली असावी, अशी शंका घेण्यास पुरेपूर वाव आहे. किंबहुना, या कादंबरीतील पात्रं आणि आशय बघता तशी खात्रीच पटते. रामराज्याची स्वप्नं दाखवून एखाद्याने आपणास चक्क कीर्र जंगलात सोडावे आणि अवतीभवतीची श्वापदं, वन्यप्राणी बघून आपली घाबरगुंडी उडावी, अशी आपली गत हल्ली राजकीय नेत्यांची भाषणं ऐकताना होते. आपापल्या समर्थकांना ‘पंचतंत्रा’तील गोष्टी ऐकवून जे काही राजकीय मंथन घडविले जाऊ पाहात आहे, ते ऐकून समर्थकांची नव्हे, तर श्वापदांचीच पाचावर धारण बसण्याची वेळ आली आहे. विरोधकांना साप, मुंगूस, उंदीर आणि श्वानाची उपमा देऊन स्वत:ला सिंह म्हणवता येत असेलही; पण इवलासा ससाही सिंहाला कधीकधी भारी ठरू शकतो. इसापनीतीची ही गोष्ट सिंहानी (शहांनी नव्हे!) वाचवी अशी-एका जंगलातील सिंहाचे पोट भरलेले असतानाही तो केवळ शक्तिप्रदर्शन करण्यासाठी दररोज अनेक प्राण्यांना ठार मारत असे. एके दिवशी कोल्ह्याच्या नेतृत्वाखाली प्राण्यांचे एक शिष्टमंडळ सिंहाकडे गेले. कोल्हा म्हणाला, ‘महाराज, आपणास शिकार करण्याचे कष्ट पडू नयेत, म्हणून आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं आहे की दररोज आमच्यापैकी एक प्राणी आपल्याकडे येईल आणि आपले भोजन बनेल.’ कोल्ह्याचा हा प्रस्ताव ऐकून सिंह मनोमन आनंदीत झाला. त्याने प्रस्ताव मान्य केला. सर्व प्राणी निर्भय होऊन परतले. ठरल्याप्रमाणे पाळीपाळीने रोज एक प्राणी सिंहाकडे जाऊ लागला. एके दिवशी सशाची पाळी आली. सशाची घाबरगुंडी उडाली. रोज मनसोक्त बागडणारा ससा सिंहाचे भक्ष्य होण्यास सहजी तयार नव्हता. त्याच्या मनात विचार आला. खरंच! सिंहाला मारण्याचा काही उपाय मिळाला तर? वाटेत सशाला एक विहीर दिसली. त्याने विहिरीत डोकावून पहिले असता त्याला स्वत:चे प्रतिबिंब दिसले. सशाला शक्कल सापडल्याने तो वाटेमध्ये मुद्दामहून थोडा वेळ बसून राहिला. एकडे सिंहाला सपाटून भूक लागलेली. आपल्या भक्ष्याची वाट पाहत बसलेला असताना समोरून ससा येत असताना त्याला दिसला. चवताळेल्या सिंहाने विचारले, ‘काय रे सशा, तू एवढा वेळ का लावलास?’ अत्यंत विनयशील होत ससा उत्तरला, ‘महाराज, यात माझा मुळीच दोष नाही. आपण मला परवानगी दिलीत, तर मला उशीर होण्याचं कारण मी आपणास सांगू शकेन’ ‘जे सांगायचे असेल, ते लवकर सांग’ सिंह गरजला. ससा म्हणाला, ‘महाराज, रस्त्यात अचानक एक दुसरा सिंह भेटला. तो म्हणाला, जंगलाचा राजा तर मी आहे. तू कुठे जात आहेस? जर दुसरा कुणी स्वत:ला राजा म्हणत असेल तर त्याने माझ्याशी आधी युद्ध करावं आणि मला हरवावं!’ सशाचे हे निवेदन ऐकून सिंहाचे पित्त खवळले. सशाने सिंहाला त्या विहिरीपाशी नेले. सिंहाने विहिरीत डोकावून पाहिले. त्याला वाटले, खरंच!आपला प्रतिस्पर्धी विहिरीत लपून बसला आहे. लागलीच तो स्वत:च्या प्रतिबिंबावर झेपावला आणि विहिरीत बुडून मेला! सर्व प्राण्यांना खूप आनंद झाला. त्यांनी सशाचे आभार मानले अन् सर्वांनी मिळून आनंदोत्सव साजरा केला!(तात्पर्य: तुम्हीच काढा!)