शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राजकीय ‘अ‍ॅनिमल फार्म’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:19 IST

​​​​​​​जॉर्ज आॅर्वेल या प्रख्यात इंग्लिश लेखकाने विसाव्या शतकात लिहिलेली ‘अ‍ॅनिमल फार्म’ ही कादंबरी बहुदा भारतातील वर्तमान राजकीय परिस्थितीचे पूर्वाकलन करूनच लिहिली असावी, अशी शंका घेण्यास पुरेपूर वाव आहे.

- नंदकिशोर पाटीलजॉर्ज आॅर्वेल या प्रख्यात इंग्लिश लेखकाने विसाव्या शतकात लिहिलेली ‘अ‍ॅनिमल फार्म’ ही कादंबरी बहुदा भारतातील वर्तमान राजकीय परिस्थितीचे पूर्वाकलन करूनच लिहिली असावी, अशी शंका घेण्यास पुरेपूर वाव आहे. किंबहुना, या कादंबरीतील पात्रं आणि आशय बघता तशी खात्रीच पटते. रामराज्याची स्वप्नं दाखवून एखाद्याने आपणास चक्क कीर्र जंगलात सोडावे आणि अवतीभवतीची श्वापदं, वन्यप्राणी बघून आपली घाबरगुंडी उडावी, अशी आपली गत हल्ली राजकीय नेत्यांची भाषणं ऐकताना होते. आपापल्या समर्थकांना ‘पंचतंत्रा’तील गोष्टी ऐकवून जे काही राजकीय मंथन घडविले जाऊ पाहात आहे, ते ऐकून समर्थकांची नव्हे, तर श्वापदांचीच पाचावर धारण बसण्याची वेळ आली आहे. विरोधकांना साप, मुंगूस, उंदीर आणि श्वानाची उपमा देऊन स्वत:ला सिंह म्हणवता येत असेलही; पण इवलासा ससाही सिंहाला कधीकधी भारी ठरू शकतो. इसापनीतीची ही गोष्ट सिंहानी (शहांनी नव्हे!) वाचवी अशी-एका जंगलातील सिंहाचे पोट भरलेले असतानाही तो केवळ शक्तिप्रदर्शन करण्यासाठी दररोज अनेक प्राण्यांना ठार मारत असे. एके दिवशी कोल्ह्याच्या नेतृत्वाखाली प्राण्यांचे एक शिष्टमंडळ सिंहाकडे गेले. कोल्हा म्हणाला, ‘महाराज, आपणास शिकार करण्याचे कष्ट पडू नयेत, म्हणून आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं आहे की दररोज आमच्यापैकी एक प्राणी आपल्याकडे येईल आणि आपले भोजन बनेल.’ कोल्ह्याचा हा प्रस्ताव ऐकून सिंह मनोमन आनंदीत झाला. त्याने प्रस्ताव मान्य केला. सर्व प्राणी निर्भय होऊन परतले. ठरल्याप्रमाणे पाळीपाळीने रोज एक प्राणी सिंहाकडे जाऊ लागला. एके दिवशी सशाची पाळी आली. सशाची घाबरगुंडी उडाली. रोज मनसोक्त बागडणारा ससा सिंहाचे भक्ष्य होण्यास सहजी तयार नव्हता. त्याच्या मनात विचार आला. खरंच! सिंहाला मारण्याचा काही उपाय मिळाला तर? वाटेत सशाला एक विहीर दिसली. त्याने विहिरीत डोकावून पहिले असता त्याला स्वत:चे प्रतिबिंब दिसले. सशाला शक्कल सापडल्याने तो वाटेमध्ये मुद्दामहून थोडा वेळ बसून राहिला. एकडे सिंहाला सपाटून भूक लागलेली. आपल्या भक्ष्याची वाट पाहत बसलेला असताना समोरून ससा येत असताना त्याला दिसला. चवताळेल्या सिंहाने विचारले, ‘काय रे सशा, तू एवढा वेळ का लावलास?’ अत्यंत विनयशील होत ससा उत्तरला, ‘महाराज, यात माझा मुळीच दोष नाही. आपण मला परवानगी दिलीत, तर मला उशीर होण्याचं कारण मी आपणास सांगू शकेन’ ‘जे सांगायचे असेल, ते लवकर सांग’ सिंह गरजला. ससा म्हणाला, ‘महाराज, रस्त्यात अचानक एक दुसरा सिंह भेटला. तो म्हणाला, जंगलाचा राजा तर मी आहे. तू कुठे जात आहेस? जर दुसरा कुणी स्वत:ला राजा म्हणत असेल तर त्याने माझ्याशी आधी युद्ध करावं आणि मला हरवावं!’ सशाचे हे निवेदन ऐकून सिंहाचे पित्त खवळले. सशाने सिंहाला त्या विहिरीपाशी नेले. सिंहाने विहिरीत डोकावून पाहिले. त्याला वाटले, खरंच!आपला प्रतिस्पर्धी विहिरीत लपून बसला आहे. लागलीच तो स्वत:च्या प्रतिबिंबावर झेपावला आणि विहिरीत बुडून मेला! सर्व प्राण्यांना खूप आनंद झाला. त्यांनी सशाचे आभार मानले अन् सर्वांनी मिळून आनंदोत्सव साजरा केला!(तात्पर्य: तुम्हीच काढा!)