शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
4
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
5
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
6
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
7
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
8
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
9
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
10
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
11
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
12
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
13
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
14
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
15
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
16
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
17
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
18
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
19
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
20
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली

गोरक्षकांना समज

By admin | Updated: April 12, 2017 03:24 IST

गोरक्षणाच्या नावाखाली तथाकथित गोरक्षकांनी देशात आणि प्रामुख्याने भाजपाशासित राज्यांमध्ये जो धुमाकूळ घातला आहे त्याची दखल अखेर सरसंघचालकांना घ्यावीच लागली.

गोरक्षणाच्या नावाखाली तथाकथित गोरक्षकांनी देशात आणि प्रामुख्याने भाजपाशासित राज्यांमध्ये जो धुमाकूळ घातला आहे त्याची दखल अखेर सरसंघचालकांना घ्यावीच लागली. गोरक्षण करताना कुणाच्या भावना दुखावतील असे कृत्य अथवा हिंसाचार होता कामा नये. कायद्याचे पालन करूनच गोरक्षण झाले पाहिजे, अशी समज सरसंघचालकांनी या हैदोस घालणाऱ्या गोरक्षकांना दिली आहे. राजस्थानातील अलवरमध्ये गोरक्षकांच्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर गोरक्षकांच्या हैदोसाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केंद्रात मोदी सरकार आणि काही राज्यांमध्ये भाजपाचे शासन आल्यापासून या गोरक्षकांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. प्रथम उत्तर प्रदेशातील दादरीकांड झाले. त्यानंतर गुजरातेत उनामध्ये मृत गाईचे कातडे काढणाऱ्या दलितांना बेदम मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच त्यांची मजल थांबली नाही. कर्नाटकच्या उडिपीमध्ये गायी चोरट्या मार्गाने कत्तलखान्याकडे नेण्याचा ठपका ठेवत एका ग्राम स्थायी समितीच्या प्रमुखास त्याचा जीव जाईपर्यत मारहाण करण्याचा नृशंस प्रकार घडला. ताज्या घटनेत अलवरमध्ये काही लोक गायी घेऊन जात असताना त्यांच्यावर हल्लाबोल झाला. विशेष म्हणजे, त्यांनी गायी अधिकृतपणे खरेदी केल्याची पावती हिंसाखोरांना दाखविण्याचा प्रयत्नही केला. पण स्वत:ला गोरक्षणाचे ठेकेदार समजणाऱ्या या कथित गोरक्षकांची टाळकी एवढी भडकली होती की त्याची शहानिशा करण्याची गरजही त्यांना वाटली नाही. यातील सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे त्या राज्याच्या गृहमंत्र्यांनी गोरक्षकांनी काम चांगले केले पण कायदा मोडला, असे अत्यंत बेजबाबदार विधान केले. आणि राज्यसभेत विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा संसदीय कामकाज राज्यमंत्र्यांनी अलवरमध्ये असे काही घडलेच नाही असे सांगून जी दिशाभूल केली ती अशोभनीय आहे. आजवरच्या या घटना आणि त्यानंतर भाजपाच्या काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांचा विचार केल्यास प्रत्येक वेळी या हिंसक गोरक्षकांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न झाल्याचे निदर्शनास येते. आता खुद्द सरसंघचालकांनीच कान टोचले आहेत. त्यामुळे गोरक्षणाच्या आड होणाऱ्या या हिंसाचाराला आळा बसेल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा यापूर्वी गुजरातेतील घटनेनंतर हिंसाचार करणारे खरे गोरक्षक नाहीतच. त्यांना सच्चा गोसेवकांनी उघड पाडावे, असे आवाहन केले होते. पण त्यांच्या या आवाहनाचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. अलीकडच्या काळात गोरक्षण आणि इतर काही मुद्द्यांवरून भाजपा नेत्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे हा पक्ष बळजबरीने आपली विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असल्यास त्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. कारण भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात कुणीही आपली श्रद्धा किंवा आस्था दुसऱ्यावर लादणे योग्य ठरणार नाही, हे प्रत्येकानेच समजून घेतले पाहिजे.