शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

गोरक्षकांना समज

By admin | Updated: April 12, 2017 03:24 IST

गोरक्षणाच्या नावाखाली तथाकथित गोरक्षकांनी देशात आणि प्रामुख्याने भाजपाशासित राज्यांमध्ये जो धुमाकूळ घातला आहे त्याची दखल अखेर सरसंघचालकांना घ्यावीच लागली.

गोरक्षणाच्या नावाखाली तथाकथित गोरक्षकांनी देशात आणि प्रामुख्याने भाजपाशासित राज्यांमध्ये जो धुमाकूळ घातला आहे त्याची दखल अखेर सरसंघचालकांना घ्यावीच लागली. गोरक्षण करताना कुणाच्या भावना दुखावतील असे कृत्य अथवा हिंसाचार होता कामा नये. कायद्याचे पालन करूनच गोरक्षण झाले पाहिजे, अशी समज सरसंघचालकांनी या हैदोस घालणाऱ्या गोरक्षकांना दिली आहे. राजस्थानातील अलवरमध्ये गोरक्षकांच्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर गोरक्षकांच्या हैदोसाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केंद्रात मोदी सरकार आणि काही राज्यांमध्ये भाजपाचे शासन आल्यापासून या गोरक्षकांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. प्रथम उत्तर प्रदेशातील दादरीकांड झाले. त्यानंतर गुजरातेत उनामध्ये मृत गाईचे कातडे काढणाऱ्या दलितांना बेदम मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच त्यांची मजल थांबली नाही. कर्नाटकच्या उडिपीमध्ये गायी चोरट्या मार्गाने कत्तलखान्याकडे नेण्याचा ठपका ठेवत एका ग्राम स्थायी समितीच्या प्रमुखास त्याचा जीव जाईपर्यत मारहाण करण्याचा नृशंस प्रकार घडला. ताज्या घटनेत अलवरमध्ये काही लोक गायी घेऊन जात असताना त्यांच्यावर हल्लाबोल झाला. विशेष म्हणजे, त्यांनी गायी अधिकृतपणे खरेदी केल्याची पावती हिंसाखोरांना दाखविण्याचा प्रयत्नही केला. पण स्वत:ला गोरक्षणाचे ठेकेदार समजणाऱ्या या कथित गोरक्षकांची टाळकी एवढी भडकली होती की त्याची शहानिशा करण्याची गरजही त्यांना वाटली नाही. यातील सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे त्या राज्याच्या गृहमंत्र्यांनी गोरक्षकांनी काम चांगले केले पण कायदा मोडला, असे अत्यंत बेजबाबदार विधान केले. आणि राज्यसभेत विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा संसदीय कामकाज राज्यमंत्र्यांनी अलवरमध्ये असे काही घडलेच नाही असे सांगून जी दिशाभूल केली ती अशोभनीय आहे. आजवरच्या या घटना आणि त्यानंतर भाजपाच्या काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांचा विचार केल्यास प्रत्येक वेळी या हिंसक गोरक्षकांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न झाल्याचे निदर्शनास येते. आता खुद्द सरसंघचालकांनीच कान टोचले आहेत. त्यामुळे गोरक्षणाच्या आड होणाऱ्या या हिंसाचाराला आळा बसेल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा यापूर्वी गुजरातेतील घटनेनंतर हिंसाचार करणारे खरे गोरक्षक नाहीतच. त्यांना सच्चा गोसेवकांनी उघड पाडावे, असे आवाहन केले होते. पण त्यांच्या या आवाहनाचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. अलीकडच्या काळात गोरक्षण आणि इतर काही मुद्द्यांवरून भाजपा नेत्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे हा पक्ष बळजबरीने आपली विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असल्यास त्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. कारण भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात कुणीही आपली श्रद्धा किंवा आस्था दुसऱ्यावर लादणे योग्य ठरणार नाही, हे प्रत्येकानेच समजून घेतले पाहिजे.