शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षकांना समज

By admin | Updated: April 12, 2017 03:24 IST

गोरक्षणाच्या नावाखाली तथाकथित गोरक्षकांनी देशात आणि प्रामुख्याने भाजपाशासित राज्यांमध्ये जो धुमाकूळ घातला आहे त्याची दखल अखेर सरसंघचालकांना घ्यावीच लागली.

गोरक्षणाच्या नावाखाली तथाकथित गोरक्षकांनी देशात आणि प्रामुख्याने भाजपाशासित राज्यांमध्ये जो धुमाकूळ घातला आहे त्याची दखल अखेर सरसंघचालकांना घ्यावीच लागली. गोरक्षण करताना कुणाच्या भावना दुखावतील असे कृत्य अथवा हिंसाचार होता कामा नये. कायद्याचे पालन करूनच गोरक्षण झाले पाहिजे, अशी समज सरसंघचालकांनी या हैदोस घालणाऱ्या गोरक्षकांना दिली आहे. राजस्थानातील अलवरमध्ये गोरक्षकांच्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर गोरक्षकांच्या हैदोसाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केंद्रात मोदी सरकार आणि काही राज्यांमध्ये भाजपाचे शासन आल्यापासून या गोरक्षकांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. प्रथम उत्तर प्रदेशातील दादरीकांड झाले. त्यानंतर गुजरातेत उनामध्ये मृत गाईचे कातडे काढणाऱ्या दलितांना बेदम मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच त्यांची मजल थांबली नाही. कर्नाटकच्या उडिपीमध्ये गायी चोरट्या मार्गाने कत्तलखान्याकडे नेण्याचा ठपका ठेवत एका ग्राम स्थायी समितीच्या प्रमुखास त्याचा जीव जाईपर्यत मारहाण करण्याचा नृशंस प्रकार घडला. ताज्या घटनेत अलवरमध्ये काही लोक गायी घेऊन जात असताना त्यांच्यावर हल्लाबोल झाला. विशेष म्हणजे, त्यांनी गायी अधिकृतपणे खरेदी केल्याची पावती हिंसाखोरांना दाखविण्याचा प्रयत्नही केला. पण स्वत:ला गोरक्षणाचे ठेकेदार समजणाऱ्या या कथित गोरक्षकांची टाळकी एवढी भडकली होती की त्याची शहानिशा करण्याची गरजही त्यांना वाटली नाही. यातील सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे त्या राज्याच्या गृहमंत्र्यांनी गोरक्षकांनी काम चांगले केले पण कायदा मोडला, असे अत्यंत बेजबाबदार विधान केले. आणि राज्यसभेत विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा संसदीय कामकाज राज्यमंत्र्यांनी अलवरमध्ये असे काही घडलेच नाही असे सांगून जी दिशाभूल केली ती अशोभनीय आहे. आजवरच्या या घटना आणि त्यानंतर भाजपाच्या काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांचा विचार केल्यास प्रत्येक वेळी या हिंसक गोरक्षकांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न झाल्याचे निदर्शनास येते. आता खुद्द सरसंघचालकांनीच कान टोचले आहेत. त्यामुळे गोरक्षणाच्या आड होणाऱ्या या हिंसाचाराला आळा बसेल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा यापूर्वी गुजरातेतील घटनेनंतर हिंसाचार करणारे खरे गोरक्षक नाहीतच. त्यांना सच्चा गोसेवकांनी उघड पाडावे, असे आवाहन केले होते. पण त्यांच्या या आवाहनाचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. अलीकडच्या काळात गोरक्षण आणि इतर काही मुद्द्यांवरून भाजपा नेत्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे हा पक्ष बळजबरीने आपली विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असल्यास त्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. कारण भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात कुणीही आपली श्रद्धा किंवा आस्था दुसऱ्यावर लादणे योग्य ठरणार नाही, हे प्रत्येकानेच समजून घेतले पाहिजे.