शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
2
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
3
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
4
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
5
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
6
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
7
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
8
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
9
'हो, मी पुतीन यांच्यावर खूपच नाराज आहे, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांची रोखठोक भूमिका, काय सांगितले?
10
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का
11
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
12
सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत
13
लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!
14
देशातील 'ही' सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस
15
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
16
एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?
17
२० गुप्त तळघरे, दुबईच्या मौलानाकडून ट्रेनिंग, पुस्तकातून पसरवला द्वेष! छांगुर बाबाचा नेमका प्लान काय होता? 
18
Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
19
उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल 
20
पोलीस ठाण्यात काम करता करता होमगार्डसोबत पळून गेली तीन मुलांची आई! पोलिसांत धाव घेत पती म्हणाला... 

गोरक्षकांना समज

By admin | Updated: April 12, 2017 03:24 IST

गोरक्षणाच्या नावाखाली तथाकथित गोरक्षकांनी देशात आणि प्रामुख्याने भाजपाशासित राज्यांमध्ये जो धुमाकूळ घातला आहे त्याची दखल अखेर सरसंघचालकांना घ्यावीच लागली.

गोरक्षणाच्या नावाखाली तथाकथित गोरक्षकांनी देशात आणि प्रामुख्याने भाजपाशासित राज्यांमध्ये जो धुमाकूळ घातला आहे त्याची दखल अखेर सरसंघचालकांना घ्यावीच लागली. गोरक्षण करताना कुणाच्या भावना दुखावतील असे कृत्य अथवा हिंसाचार होता कामा नये. कायद्याचे पालन करूनच गोरक्षण झाले पाहिजे, अशी समज सरसंघचालकांनी या हैदोस घालणाऱ्या गोरक्षकांना दिली आहे. राजस्थानातील अलवरमध्ये गोरक्षकांच्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर गोरक्षकांच्या हैदोसाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केंद्रात मोदी सरकार आणि काही राज्यांमध्ये भाजपाचे शासन आल्यापासून या गोरक्षकांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. प्रथम उत्तर प्रदेशातील दादरीकांड झाले. त्यानंतर गुजरातेत उनामध्ये मृत गाईचे कातडे काढणाऱ्या दलितांना बेदम मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच त्यांची मजल थांबली नाही. कर्नाटकच्या उडिपीमध्ये गायी चोरट्या मार्गाने कत्तलखान्याकडे नेण्याचा ठपका ठेवत एका ग्राम स्थायी समितीच्या प्रमुखास त्याचा जीव जाईपर्यत मारहाण करण्याचा नृशंस प्रकार घडला. ताज्या घटनेत अलवरमध्ये काही लोक गायी घेऊन जात असताना त्यांच्यावर हल्लाबोल झाला. विशेष म्हणजे, त्यांनी गायी अधिकृतपणे खरेदी केल्याची पावती हिंसाखोरांना दाखविण्याचा प्रयत्नही केला. पण स्वत:ला गोरक्षणाचे ठेकेदार समजणाऱ्या या कथित गोरक्षकांची टाळकी एवढी भडकली होती की त्याची शहानिशा करण्याची गरजही त्यांना वाटली नाही. यातील सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे त्या राज्याच्या गृहमंत्र्यांनी गोरक्षकांनी काम चांगले केले पण कायदा मोडला, असे अत्यंत बेजबाबदार विधान केले. आणि राज्यसभेत विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा संसदीय कामकाज राज्यमंत्र्यांनी अलवरमध्ये असे काही घडलेच नाही असे सांगून जी दिशाभूल केली ती अशोभनीय आहे. आजवरच्या या घटना आणि त्यानंतर भाजपाच्या काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांचा विचार केल्यास प्रत्येक वेळी या हिंसक गोरक्षकांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न झाल्याचे निदर्शनास येते. आता खुद्द सरसंघचालकांनीच कान टोचले आहेत. त्यामुळे गोरक्षणाच्या आड होणाऱ्या या हिंसाचाराला आळा बसेल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा यापूर्वी गुजरातेतील घटनेनंतर हिंसाचार करणारे खरे गोरक्षक नाहीतच. त्यांना सच्चा गोसेवकांनी उघड पाडावे, असे आवाहन केले होते. पण त्यांच्या या आवाहनाचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. अलीकडच्या काळात गोरक्षण आणि इतर काही मुद्द्यांवरून भाजपा नेत्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे हा पक्ष बळजबरीने आपली विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असल्यास त्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. कारण भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात कुणीही आपली श्रद्धा किंवा आस्था दुसऱ्यावर लादणे योग्य ठरणार नाही, हे प्रत्येकानेच समजून घेतले पाहिजे.