शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बरे झाले ! पायताण चोरी गेले, शनि गेला !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:42 IST

औरंगाबादेत सारेकाही आहे. जायकवाडीचे भरपूर पाणी आहे. इतिहासाचा भला मोठा वारसा आहे. इंडस्ट्रीजसाठी भरपूर जागा आहे. हुशार राजकारणी आहेत. चांगल्या प्रशासकीय अधिकाºयांचीही आम्हाला अजिबात वानवा नाही. साºयाच बाबतीत इतके गडगंज वातावरण असताना शहर ‘स्मार्ट’ का होऊ शकले नाही?

 आमचा श्रद्धेवर गाढ विश्वास आहे. पण, म्हणून आम्ही अंधश्रद्धेत जगतो, असे अजिबात नाही. पायताण चोरी जाणे हा शुभसंकेत आम्ही मानतो. ते चोरी जाणे म्हणजे आपली इडा-पीडा गेली. शनि गेला असे आम्ही मानतो. अस्सल मराठवाड्याच्याच भाषेत म्हणायचे तर दलिंदरी गेली असे आम्ही समजतो. औरंगाबादला स्मार्ट कसे करायचे, याचे महापालिकेत चिंतन सुरू असताना संशोधन केंद्राच्या बाहेर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोडलेले पायताण कोणीतरी चोरले. पायताण जिल्हाधिकाºयांचे असले तरी या चोरीतून अनेक वर्षांपासून शहराच्या विकासात अडसर ठरणारा शनि गेला, असे आम्ही मानतो. ही अंधश्रद्धा समजणाºयांनी ‘सारे काही असूनही औरंगाबाद ‘स्मार्ट’ का होऊ शकले नाही’ या प्रश्नाचे उत्तर आम्हाला द्यावे. औरंगाबादेत सारेकाही आहे. जायकवाडीचे भरपूर पाणी आहे. इतिहासाचा भला मोठा वारसा आहे. इंडस्ट्रीजसाठी भरपूर जागा आहे. हुशार राजकारणी आहेत. विधानसभा अध्यक्षांपासून मंत्र्यांपर्यंत मोठमोठी पदे आम्हाला यापूर्वी मिळाली आहेत, सध्याही मिळत आहेत. चांगल्या प्रशासकीय अधिकाºयांचीही आम्हाला अजिबात वानवा नाही. साºयाच बाबतीत इतके गडगंज वातावरण असताना शहर ‘स्मार्ट’ का होऊ शकले नाही? का बरे होत असावे असे? अनेक प्रकारची दलिंदरी या शहराला लागली असावी, असे आम्हाला वाटते. तुम्हाला ही अंधक्षद्धा वाटेलही कदाचित. पण, आमची तीच श्रद्धा आहे. बरे झाले, ही दलिंदरीच आता चोरीला गेली. त्यामुळे औरंगाबाद शहराचा ‘स्मार्ट’ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हाधिकाºयांचे पायताण चोरी जाण्याच्या आधी झालेल्या बैठकीत स्मार्ट सिटीबाबत जे काही चिंतन झाले, विकासाभिमुख निर्णय घेण्यात आले त्याच्या भीतीनेच हा शनि पळून गेला असावा कदाचित. स्मार्टसिटीसाठी पूर्णवेळ सीईओंची नियुक्ती करण्याचे ठरले. शहरातील एलईडी पथदिव्यांबाबत आणि कायम डोकेदुखी ठरत असलेल्या घनकचरा प्रकल्पाबाबत अभ्यास करण्याचा निर्णय झाला. घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्पही उभारण्याचे ठरले. क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन हा स्मार्ट रोड म्हणून घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. भविष्यात या स्मार्ट रोडच्या दोन्ही बाजंूनी झाडे लावली जातील. वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक तयार केला जाईल. दुभाजकाची रचनादेखील वैशिष्ट्यपूर्ण असेल. शहरात पहिल्या टप्प्यात पुढील महिन्यात म्हणजे जानेवारीत पाच बस खरेदी करून एस.टी. महामंडळाला दिल्या जातील आणि त्या शहर बस म्हणून रस्त्यावर धावतील. बेंगळुरूच्या धर्तीवर या शहरबसचे नियोजन केले जाईल. सोलर सिटीसाठी ५३ लाखांच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली. शहराचा कुठलाच प्रश्न बाजूला राहिला नाही. मग अशा स्थितीत शहरात ‘शनि’चे काय ते काम? हे सारे निर्णय पाहून शनिला स्वत:च्या अस्तित्वाचाच प्रश्न पडाला असावा. त्यामुळे पायताणाच्या माध्यमातून त्याने शहरातून काढता पाय घेतला असवा. बरे झाले, पोलिसांत कुणी तक्रार नोंदविली नाही. नाहीतर गेलेल्या शनिला पोलिसांनी पकडून पुन्हा शहरात आणले असते. ते आम्हाला थोडेच परवडले असते !

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaharashtraमहाराष्ट्र