शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

इंडोनेशियात नदीच्या तळात ‘सोन्याचं’ बेट; एके काळी व्यापारी मार्गावर होता दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 08:24 IST

जुन्या वस्तूंच्या उत्खननाचे कायदे आहेत आणि त्यातून जो खरा इतिहास हाती लागतो त्याची पाठराखण करणारा छोटासा का असेना जागृत दबावगट आहे.

भारतात म्हणे पूर्वी सोन्याचा धूर निघायचा. इतकी सुबत्ता होती की बाहेर देशीचे लोक व्यापार करायला इथे यायचे. इथून रेशीम, अत्तर, हस्तिदंत आणि इतर कलाकुसरीच्या वस्तू जगभर जायच्या. त्यातला सोन्याचा धूर जरी सोडून दिला, तरी युरोप आज आहे त्या अवस्थेला उदयाला येण्यापूर्वी भारतातून बराच व्यापार चालत असे असं दाखवणाऱ्या खुणा पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मधून मधून सापडत असतात. भारतातल्या प्राचीन मानवी वसाहती, वस्त्या, नगरं याचा अभ्यास पुरातत्त्वविभागाच्या वतीने सतत चालू असतो. कोणालातरी कुठेतरी शेतात विहीर खणताना काहीतरी जुनी गाडगी-मडकी हाती लागतात. ते सरकार दरबारी कळवलं जातं. कारण आपल्याकडे पुरातत्त्वविभाग आहे.

जुन्या वस्तूंच्या उत्खननाचे कायदे आहेत आणि त्यातून जो खरा इतिहास हाती लागतो त्याची पाठराखण करणारा छोटासा का असेना जागृत दबावगट आहे. पण समजा, आपल्याकडे एखाद्या नदीत कोळ्यांना मासेमारी करताना किंवा वाळूचा उपसा करताना नदीच्या तळात गाडल्या गेलेल्या सोन्याच्या वस्तू सापडल्या तर? किती दिवस ते गुपित राहील? किती दिवस लोक हळूच त्यातल्या वस्तू काढून विकतील? कधीतरी तर त्याची बातमी होईल की नाही? सरकार दरबारी त्याची नोंद होईल की नाही? त्या वस्तूंचा अभ्यास होईल की नाही? कल्पनेतली वाटणारी ही परिस्थिती इंडोनेशियामधल्या पालेमबांग शहराजवळच्या मुसी नदीत खरी खरी निर्माण झाली आहे. तिथे बांधकामासाठी वाळू उपसा करणाऱ्या मजुरांना सोन्याच्या अंगठ्या, मणी, मातीची भांडी असं काय काय सापडायला सुरुवात झाली आणि मुसी नदीचा तळ लोकांनी अक्षरशः ढवळून काढला.

पाण्याखाली गेल्यावर श्वास घेता यावा यासाठी मोठे पाईप्स घेऊन त्यातून श्वास घेऊन जास्त वेळ तळाशी थांबायचं आणि जमेल तेवढी वाळू उकरायची. त्यातून एखादा सोन्याचा मणी हाती लागला तरी सगळे कष्ट वसूल होतील, अशा विचारांनी कोणीही उठून सोनं काढायला जायला लागलं. त्या उकराउकरीत अर्थातच सोनं सोडून इतर नाजूक वस्तूंचं नुकसान झालं. कारण सोनं तेवढं किमती; त्याबरोबर सापडलेल्या छोट्या मूर्ती, मातीची भांडी, आरसे, इतर रोजच्या वापरातल्या वस्तू याची कोणाला किंमत असणार? 

जगभरातल्या पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि वस्तुसंग्रहालयवाल्यांनी आरडाओरडा करूनही इंडोनेशियन सरकार त्यात लक्ष घालायला तयार नाही. त्यांनी फक्त अशा वस्तू खणण्यावर बंदी घातली. त्यामुळे तर या वस्तूंचं ब्लॅक मार्केट अजूनच फोफावलं. त्यामुळे त्या सगळ्या वस्तू मिळून जी गोष्ट सांगू पाहतायत त्यातले अनेक दुवे निसटून चालले आहेत. हे दुवे एकमेकांशी जोडून इंडोनेशियातील एका अत्यंत संपन्न शहराच्या इतिहास जगासमोर येऊ शकतो. ते शहर म्हणजे इ.स. ६०० ते १०२५ या काळात पूर्व आणि पश्चिमेकडच्या जगांना जोडणारं समृद्ध व्यापारी शहर, श्रीविजय!

सोन्याचं बेट याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शहराचा कोणे एके काळी व्यापारी मार्गावर दबदबा होता. पण भारतातील चोला साम्राज्याशी झालेल्या लढाईत श्रीविजयच्या राजाचा पराभव झाला नि तिथपासून या राज्याच्या समृद्धीला उतरती कळा लागली. परमेश्वर नावाच्या श्रीविजयच्या शेवटच्या राजाने १३९० सालच्या आसपास या शहराला त्याचं पूर्वीचं वैभव परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण शेजारच्या जावा बेटांच्या राजाकडून तो पराभूत झाल्याच्या नंतर उरलंसुरलं साम्राज्यही लयाला गेलं. त्यानंतर हे शहर हा चिनी चाच्यांचा अड्डा बनून राहिलं.  हे शहर वैभवाच्या शिखरावर असताना तिथे येऊन गेलेले पर्यटक आणि व्यापारी यांनी त्याबद्दल लिहिलेलं वर्णन अत्यंत समृद्धी आणि सामर्थ्याचं आहे.

शस्त्रसज्ज जहाजं, हिंदी आणि अरबी बोलू शकणारे पोपट, मध्येच जागृत होणारे ज्वालामुखी अशी त्यावेळी केलेली श्रीविजयची अद्भुतरम्य वर्णनं आहेत. पण ती बहुतेक वेळा अतिरंजित असतात. त्यातून श्रीविजयची माणसं नेमकी कशी राहत होती, काय खात होती, कोणते कपडे घालत होती अशी माहिती मिळत नाही. ती माहिती मिळते शास्त्रीय पद्धतीने केलेल्या उत्खननातून. कारण त्या उत्खननात सापडलेली प्रत्येक वस्तू त्या काळाचा एक इतिहास सांगते. आज मुसी नदीत सहज तळ उकरून सोनं काढणाऱ्या लोकांना मुठींना माणकं जडवलेल्या सोन्याच्या तलवारी, मोराच्या आकाराचे पेले अशा अनेक वस्तू आजही सापडतायत. त्यावरून त्यावेळच्या श्रीमंतीची सहज कल्पना येऊ शकते. पण या श्रीमंतीपेक्षाही त्यावेळची संपन्न संस्कृती समजून घेणं जास्त गरजेचं आहे. 

सोन्याचं बेट तळाशी कसं गेलं?

इतकं समृद्ध असणारं श्रीविजय शहर नदीच्या तळाशी कसं गेलं? असा प्रश्न साहजिकच पडतो. त्याची शक्यता अशी सांगितली जाते, की हे संपूर्ण शहर पाण्यावर बांधलेलं असावं. आज अजूनही अतिपूर्वेकडील देशांमध्ये काही ठिकाणी तराफे एकमेकांना बांधून त्यावर घरं आणि वस्त्या बांधण्याची पद्धत दिसून येते. श्रीविजय जोवर समृद्ध होतं तोवर असं पाण्यावरचं घर त्यांना नीट सांभाळता आलं असेल आणि मग मात्र ते अक्षरशः कुजून नष्ट झालं असेल आणि मग बुडालं असेल असा पुरातत्त्वशास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय