शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

देवांना साथीचे आजार...!

By अतुल कुलकर्णी | Updated: June 21, 2018 00:51 IST

सगळे देव एकत्र जमले आणि त्यांनी देवांचे देव इंद्रदेवाच्या दरबारावर शिष्टमंडळ नेण्याचे ठरवले.

सगळे देव एकत्र जमले आणि त्यांनी देवांचे देव इंद्रदेवाच्या दरबारावर शिष्टमंडळ नेण्याचे ठरवले. काहीकरून देवलोकात आलेल्या साथीच्या आजाराला रोखण्यासाठी तातडीची बैठक घ्या, असे निवेदनही तयार करण्यात आले. दरबार भरला, सगळे एकत्र आलेले पाहून इंद्रदेवही चिंतेत पडले. आपल्या आसनाला तर धोका नाही ना, याची खात्री करण्याचे काम त्यांनी देवलोकांचे आयबी प्रमुख नारदांवर सोपावून ते सभागृहात दाखल झाले. दरबारावर एक नजर टाकली आणि इंद्रदेवांना आर्श्चय वाटले, अरेच्च्या हे काय पाहतोय आपण...? कुणी डोक्याला मफलर गुंडाळलेला तर कुणी स्वेटर घालून आलाय. कुणी कपाळाला बाम लावलाय, तर कुणी व्हिक्स वेपोरब नाकाला लावून बसलेला. मध्येच कुणी शिंकतोय, कुणी खोकलतोय... इंद्रदेव हे दृश्य पाहून काळजीत पडले. असे कसे सगळे देव एकदम आजारी पडले...? त्यांनी काही देवांकडे जाऊन त्यांची आस्थेने चौकशी केली. तेवढ्यात नारदही सभागृहात हजर झाले...नारायण... नारायण... म्हणत त्यांनी इंद्रदेवांना इशारा केला. त्याबरोबर इंद्रदेव दरबाराला लागूनच असणाऱ्या अ‍ॅन्टी चेंबरमध्ये आले आणि एका पाठोपाठ एक त्यांनी नारदावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. बोला, काय खबर आणलीय. ही काय अवस्था झालीय माझ्या दरबाराची...? कुणी केलंय हे सगळं, यामागे घातपात तर नाही ना... की परग्रहावरून कुणी अज्ञात शक्ती काम करते आहे... मला सगळा अहवाल तातडीने द्या... मी काळजीत पडलोय...देवा, देवा, जरा धीर धरा... इतकेही काही गंभीर प्रकरण नाही. विषय जरा वेगळा आहे. त्याचा संबंध थेट भूलोकाशी आहे.इंद्रदेव भडकले, भूलोकी आपले राज्य असताना त्यांच्यामुळे आपला सगळा दरबार कसा काय आजारी पडू शकतो...?महाराज, तेथे आता इंद्रदेवाची फारशी चालत नाही. सध्या तेथे दोन नवीन देव आले आहेत... तेच काय ते ठरवतात. कुणाला काय करायचे, त्यांच्याच हाती सध्या अनेकांचे भविष्य आहे. ते काय लिहितील ते प्रत्यक्ष ब्रह्मदेवही सांगू शकत नाही असा दावा आता भूलोकीचे लोक करू लागले आहेत.वैतागून इंद्रदेव म्हणतात, हा काय प्रकार आहे. कोण आहेत तरी कोण हे लोक...?देवा, एकाचे नाव नरेंद्र आणि दुसºयाचे नाव देवेंद्र. अवघे भूलोक त्यांना घाबरते. कुणाला उगाच झोपेत असतानाच आपली चौकशी सुरू झाल्याचे भास होऊ लागतात तर कुणाला मंत्रिपद मिळणार की नाही याचा घोर लागलेला...त्याचा आपल्या दरबाराशी काय संबंध?देवा, अहो, कुणाला चौकशी नकोय, कुणाला स्वत:चे मंत्रिपद टिकवायचे आहे तर कुणाला नव्याने मंत्रिपद हवे आहे, कुणाला महामंडळ हवे आहे तर कुणाला साधेच पण विशेष कार्यकारी अधिकारी पदाचा शिक्का हवायं. त्यामुळे अशा सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या श्रध्दा असणारे देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. पण हे नरेंद्र, देवेंद्र कुणाला बधतच नाहीत. इकडे देव पाण्यातून बाहेर पडेनात म्हणून त्यांना सर्दी, खोकला, पडसे, ताप असे आजार झाले आहेत. जोपर्यंत भूलोकीचे देव पाण्याबाहेर येणार नाहीत तोपर्यंत आपल्याकडची आजाराची साथ दूर होणार नाही... नारायण... नारायण...