शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

देवांना साथीचे आजार...!

By अतुल कुलकर्णी | Updated: June 21, 2018 00:51 IST

सगळे देव एकत्र जमले आणि त्यांनी देवांचे देव इंद्रदेवाच्या दरबारावर शिष्टमंडळ नेण्याचे ठरवले.

सगळे देव एकत्र जमले आणि त्यांनी देवांचे देव इंद्रदेवाच्या दरबारावर शिष्टमंडळ नेण्याचे ठरवले. काहीकरून देवलोकात आलेल्या साथीच्या आजाराला रोखण्यासाठी तातडीची बैठक घ्या, असे निवेदनही तयार करण्यात आले. दरबार भरला, सगळे एकत्र आलेले पाहून इंद्रदेवही चिंतेत पडले. आपल्या आसनाला तर धोका नाही ना, याची खात्री करण्याचे काम त्यांनी देवलोकांचे आयबी प्रमुख नारदांवर सोपावून ते सभागृहात दाखल झाले. दरबारावर एक नजर टाकली आणि इंद्रदेवांना आर्श्चय वाटले, अरेच्च्या हे काय पाहतोय आपण...? कुणी डोक्याला मफलर गुंडाळलेला तर कुणी स्वेटर घालून आलाय. कुणी कपाळाला बाम लावलाय, तर कुणी व्हिक्स वेपोरब नाकाला लावून बसलेला. मध्येच कुणी शिंकतोय, कुणी खोकलतोय... इंद्रदेव हे दृश्य पाहून काळजीत पडले. असे कसे सगळे देव एकदम आजारी पडले...? त्यांनी काही देवांकडे जाऊन त्यांची आस्थेने चौकशी केली. तेवढ्यात नारदही सभागृहात हजर झाले...नारायण... नारायण... म्हणत त्यांनी इंद्रदेवांना इशारा केला. त्याबरोबर इंद्रदेव दरबाराला लागूनच असणाऱ्या अ‍ॅन्टी चेंबरमध्ये आले आणि एका पाठोपाठ एक त्यांनी नारदावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. बोला, काय खबर आणलीय. ही काय अवस्था झालीय माझ्या दरबाराची...? कुणी केलंय हे सगळं, यामागे घातपात तर नाही ना... की परग्रहावरून कुणी अज्ञात शक्ती काम करते आहे... मला सगळा अहवाल तातडीने द्या... मी काळजीत पडलोय...देवा, देवा, जरा धीर धरा... इतकेही काही गंभीर प्रकरण नाही. विषय जरा वेगळा आहे. त्याचा संबंध थेट भूलोकाशी आहे.इंद्रदेव भडकले, भूलोकी आपले राज्य असताना त्यांच्यामुळे आपला सगळा दरबार कसा काय आजारी पडू शकतो...?महाराज, तेथे आता इंद्रदेवाची फारशी चालत नाही. सध्या तेथे दोन नवीन देव आले आहेत... तेच काय ते ठरवतात. कुणाला काय करायचे, त्यांच्याच हाती सध्या अनेकांचे भविष्य आहे. ते काय लिहितील ते प्रत्यक्ष ब्रह्मदेवही सांगू शकत नाही असा दावा आता भूलोकीचे लोक करू लागले आहेत.वैतागून इंद्रदेव म्हणतात, हा काय प्रकार आहे. कोण आहेत तरी कोण हे लोक...?देवा, एकाचे नाव नरेंद्र आणि दुसºयाचे नाव देवेंद्र. अवघे भूलोक त्यांना घाबरते. कुणाला उगाच झोपेत असतानाच आपली चौकशी सुरू झाल्याचे भास होऊ लागतात तर कुणाला मंत्रिपद मिळणार की नाही याचा घोर लागलेला...त्याचा आपल्या दरबाराशी काय संबंध?देवा, अहो, कुणाला चौकशी नकोय, कुणाला स्वत:चे मंत्रिपद टिकवायचे आहे तर कुणाला नव्याने मंत्रिपद हवे आहे, कुणाला महामंडळ हवे आहे तर कुणाला साधेच पण विशेष कार्यकारी अधिकारी पदाचा शिक्का हवायं. त्यामुळे अशा सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या श्रध्दा असणारे देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. पण हे नरेंद्र, देवेंद्र कुणाला बधतच नाहीत. इकडे देव पाण्यातून बाहेर पडेनात म्हणून त्यांना सर्दी, खोकला, पडसे, ताप असे आजार झाले आहेत. जोपर्यंत भूलोकीचे देव पाण्याबाहेर येणार नाहीत तोपर्यंत आपल्याकडची आजाराची साथ दूर होणार नाही... नारायण... नारायण...