शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

गोव्याला गरज राजकीय स्थैर्याची

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 06:44 IST

चाळीस सदस्यांच्या विधानसभागृहात दोन आमदारांचे राजीनामे आणि दोघांचे देहावसान यामुळे सदस्यसंख्या छत्तीसवर पोहोचली आहे. अठरा आमदार ज्याच्याकडे असतील, तो मुख्यमंत्री बनू शकतो, हे झाले साधे गणित, पण प्रत्यक्षातले राजकारण गुंतागुंतीचे झाले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून निघणार नाही हे स्पष्ट असले, तरी त्यामुळे राज्यात निर्नायकी निर्माण व्हायचेही काहीच कारण नाही. सद्यस्थितीत अनेकांच्या राजकीय आकांक्षांना नवे धुमारे फुटलेले आहेत आणि जेमतेम आपल्या मतदारसंघापुरता वकुब असलेले काही जण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आपले घोडे दामटविण्याच्या प्रयत्नात आहेत. राजकारणात असे धाडस क्षम्य असते; खुद्द पर्रीकरांनीही ती धमक कोणे एकेकाळी दाखविली होती, पण त्या वेळी त्यांच्यामागे तसे संख्याबळ होते. आज मुख्यमंत्रिपदी दावा करणाऱ्या काहींचा तंबू एकखांबीच असल्याचे दिसते. निव्वळ उपद्रवमूल्यावर नेतृत्व खेचून आणता येत नाही, याची कल्पना त्यांना आलेली नाही, असे दिसते.राज्याला आज स्थैर्याची आवश्यकता असून, राजकीय स्थैर्यासाठी राजकीय पक्ष आणि नेत्यांना काही गोष्टींवर पाणी सोडावेच लागेल. आडमुठेपणातून सत्ता मिळविता येत नसते आणि मिळाली, तरी ती फार काळ राखून ठेवता येत नसते, याची जाणीव मुख्यमंत्रिपदाच्या सर्वच दावेदारांनी ठेवायला हवी. इनमीन चाळीस सदस्यांच्या विधानसभागृहात दोन आमदारांचे राजीनामे आणि दोघांचे देहावसान, यामुळे सदस्यसंख्या छत्तीसवर पोहोचली आहे. अठरा आमदार ज्याच्याकडे असतील, तो मुख्यमंत्री बनू शकतो, हे झाले साधे गणित, पण प्रत्यक्षातले राजकारण गुंतागुंतीचे झाले आहे. त्याला अर्थातच महिनाभरावर येऊन पोहोचलेल्या लोकसभा निवडणुकीची किनार आहे. या निवडणुकीत भाजपाचे पारडे किती जड असेल, याचा स्पष्ट अंदाज अजून तरी स्थानिक राजकीय क्षेत्राला आलेला नाही. त्यामुळे नवे सरकार घडविण्याच्या निमित्ताने आपल्या पदरात अधिकाधिक लाभ पाडून घेण्याची अहमहमिका स्थानिक पक्षांत लागली आहे. त्याचबरोबर, काँग्रेससोबतची संपर्करेखा शाबूत राहील, याचीही काळजी त्यांना घ्यावी लागते आहे. १४ आमदार असलेला कॉँग्रेस आजमितीस ३६ सदस्यांच्या विधानसभेतला सर्वाधिक आमदार असलेला पक्ष आहे, यांत शंका नाही, पण त्या पक्षाकडे आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले अठराचे संख्याबळ असल्याचे दिसत नाही. सरकार स्थापनेसाठी आपल्याला पाचारण करावे, असे तो पक्ष प्रसारमाध्यमांसमोर आपली कैफियत मांडताना म्हणतो खरा, पण अठराचा जादुई आकडा आपण कसा गाठू, हे काही सांगत नाही.सत्तेवर मांड बसली की, मग कशीही मांडवली करता येते; प्रसंगी ‘गाजराची पुंगी- वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली’ असे म्हणत माघारही घेता येते, याच धारणेतून त्या पक्षाचे राजकारण पुढे रेटले जात आहे. या राजकारणाला राज्यपालांकडून प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाही. अशा प्रकरणांत राज्यपालांची भूमिका काय असावी, याचा वस्तुपाठ कॉँग्रेसने केंद्रात आपली सत्ता असताना घालून दिलेला आहे. भाजपाशी निष्ठा असलेल्या राज्यपाल तोच कित्ता गिरवतील, याबाबत शंका नको. अशा परिस्थितीत राज्याला काम करणारे स्थिर सरकार कसे देता येईल, यावर विचारमंथन करण्याची जबाबदारी आमदारांवर आणि राजकीय पक्षांवर येते. पर्रीकरांची अत्यंत गडद अशी पडछाया असलेल्या या परिस्थितीत त्यांच्या समावेशक राजकारणाला पुढे नेणारा नेताच गोव्याला न्याय देऊ शकेल. पर्रीकरांचा पिंड उजव्या राजकारण्याचा होता, तरी परिस्थितीवश त्यांनी इथल्या अल्पसंख्याकांचा विश्वास संपादन करून सत्ता गाठली होती. गोव्याच्या बहुचर्चित धार्मिक सलोख्याची परिटघडी आपल्या पक्षाच्या वा मातृसंघटनेच्या उजव्या धारणांमुळे विस्कटली जाऊ नये, याची काळजी त्यांनी घेताना अनेक स्वकियांचाही रोष पत्करला होता. अशा प्रकारचे जुळवून घेणारे, पण परिस्थितीसमोर लोटांगण न घालणारे नेतृत्व आज हवे आहे. राज्यासमोरच्या बिकट अशा समस्यांचे आकलन असलेले आणि त्यावरील तोडगा काढताना सार्वजनिक हितालाच प्राधान्य देणारे नेतृत्व आपल्याला देता येईल का आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे, असे नेतृत्व विधानसभेत बहुमताच्या कसोटीला उतरेल का, याची ग्वाही सर्वच इच्छुकांना आणि पक्षांना आधी द्यावी लागेल. तसे न झाल्यास विधानसभा संस्थगित करून पोटनिवडणुकांच्या निकालाची वाट पाहाण्याचा पर्याय राज्यपालांना खुला राहील.

टॅग्स :goaगोवा