शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

‘जीएम सीड’, सरकार आणि न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 06:25 IST

बारामती कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘शेतीत मोठ्या प्रमाणात उत्पादनवाढीमागे प्रगत तंत्रज्ञान आहे.

- सुनील एम. चरपे (शेती विषयाचे अभ्यासक)बारामती कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘शेतीत मोठ्या प्रमाणात उत्पादनवाढीमागे प्रगत तंत्रज्ञान आहे. ते शेतकऱ्यांना घरपोच दिले पाहिजे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने जीएम पिकांवर बंदी घातली आहे. हे न्यायालयाचे काम नाही. न्यायाधीशांनी अशा गोष्टींत लक्ष न घातलेलं बरं. शेतकऱ्यांना उपयुक्त असेल, ते थांबविणे योग्य नाही,’ असेही त्यांनी सांगितले. मुळात प्रश्न आहे, शेतकºयांना अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचे स्वातंत्र्य अप्रत्यक्षरीत्या नाकारण्याचा!जगात शेतीक्षेत्रात आणि विशेषत: बियाण्यांच्या संदर्भातील तंत्रज्ञान बºयाच प्रमाणात विकसित झाले आहे. ‘जीएम सीड’ हे त्यातील एक होय. भारतात मात्र ‘जीएम सीड’कडे आजही नकारात्मक दृष्टीने बघितले जाते. शासनाने परवानगी नाकारल्याने भारतीय शेतकरी फौजदारी गुन्हे टाळण्यासाठी चोरून का होईना ‘जीएम सीड’चा वापर करीत आहेत. भारतात ‘जीएम सीड’च्या वापरावर उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली नाही. शेतकरी आणि ‘जीएम सीड’ यात केवळ सरकार आड आले आहे. आधी केलेल्या चुकांची दुरुस्ती करण्याची तसदी सध्याचे सरकार घेत नाही.१९९२-९३ पासून अमेरिकेत कापसाच्या ‘बीटी’ वाणाच्या चाचण्या (टेस्ट) सुरू झाल्या. ‘बीटी कॉटन’चे ‘पेटंट’ मोन्सेटो या अमेरिकन कंपनीकडे आहे. २००२ मध्ये महिको सीड या भारतीय कंपनीने मोन्सेटोसोबत ‘बीटी कॉटन’ बियाण्यांबाबत करार केला. या बियाण्याला तेव्हा देशात विरोध झाला. पण ‘बीटी कॉटन सीड’ हे बोंडअळी प्रतिबंधक असल्याने कापसाचा उत्पादनखर्च कमी होऊन उत्पादन वाढले होते. तत्कालीन केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी ‘जीएम सीड’ तंत्रज्ञान पर्यावरण व मानवी आरोग्यास हानिकारक असल्याचा हवाला देत त्याच्या चाचण्यांवर बंदी घातली. आयात केलेला बहुतांश शेतमाल हा ‘जीएम’ आहे. भारतीय त्याचा वापर खुलेआम करतात. आयात केलेला ‘जीएम’ शेतमाल मानवी आरोग्यास पोषक ठरतो का? असो!भारतात ‘जीएम सीड’ची चाचणी ‘जेनेटिक इंजिनिअरिंग अ‍ॅप्रुव्हल कमिटी’ या केंद्र सरकारच्या संस्थेमार्फत केली जाते. तिने ‘बीटी कॉटन सीड’ मंजूर केले होते. या संस्थेचा बियाण्यांबाबतचा कोणताही निर्णय हा सरकारला बंधनकारक असायचा. ही बाब अडचणीची ठरत असल्याने रमेश यांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करीत या कमिटीचे ‘अप्रायझल कमिटी’ असे नामकरण केले. तिने पास केलेले बियाणे वापरण्याचा अधिकार केंद्र सरकारला मिळाला. त्याचा वापर करीत तत्कालीन केंद्र सरकारने ‘बीटी कॉटन सीड’च्या चाचण्यांवर (ट्रायल), तसेच जयराम रमेश यांनी ‘बीटी’ वांग्याच्या बियाण्यांची चाचणी व त्याच्या वापरावर १० वर्षांची स्थगिती दिली.रमेश यांच्या फेरबदलामुळे बियाण्यांच्या रॉयल्टीचे अधिकार केंद्राला प्राप्त झाले. शेतकºयांना कमी किमतीत बियाणे उपलब्ध व्हावे, असा युक्तिवादही रमेश यांनी त्या वेळी केला होता. वास्तवात, बियाण्यांचा खर्च हा त्या पिकाच्या उत्पादनखर्चाच्या पाच टक्क्यांपेक्षा कमी असतो. त्याचा उत्पादनखर्चावर फार परिणाम होत नाही. याच काळात भारतात ‘बीटी’ वांग्यांच्या बियाण्यांचे उत्पादन करण्यात आले. केंद्र सरकार आड आल्याने त्या कंपन्यांनी ते बियाणे बांगलादेशला विकले. सध्या भारतीय शेतकरी बांगलादेशातून ‘बीटी’ वांग्यांचे बियाणे विकत आणून ते चोरून वापरत आहेत.भारत सरकार ‘जीएम सीड’च्या चाचण्यांबाबत आग्रही असले, तरी त्यासाठी आवश्यक अत्याधुनिक साधने आपल्याकडे नाहीत, हे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत स्पष्ट केले आहे. अरुणा रॉड्रीग्ज यांनी मोहरीच्या ‘जीएम सीड’बाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका वगळता न्यायालयाने ‘जीएम सीड’च्या वापराबाबत आजवर हस्तक्षेप केला नाही. मग, त्यावर बंदी घालणे दूरच. या प्रकरणात न्यायालयाने समिती स्थापण्याचे निर्देश दिले होते. त्यात सरकारच्या एका विभागाला प्रतिनिधित्व मिळाले नाही म्हणून ती समिती अपूर्ण असल्याचा युक्तिवादही न्यायालयात करण्यात आला. त्यामुळे या कमिटीचे काम पुढे जाऊ शकले नाही.मोहरी हे १०० टक्के देशी पीक आहे. त्याचे ‘जीएम सीड’ वाण संशोधनदेखील भारतीय आहे. त्याचा व मोन्सेटोचा काहीही संबंध नाही. तरीही त्याला विरोध केला जात आहे. का? भारतासह जगभरातील पर्यावरणवादी व समाजवादी मंडळी तसेच कीटकनाशके उत्पादक कंपन्या ‘जीएम सीड’ला विरोध करीत आहेत. त्यांच्या ‘लॉबी’च्या दबावाला बळी पडून सरकार आणखी किती दिवस शेतकºयांना आधुनिक तंत्रज्ञान नाकारणार आहे?

टॅग्स :agricultureशेती