शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

काळाचा महिमा, तीन वर्षापूर्वी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले एकनाथराव खडसे, सव्वा वर्षांपासून मंत्रिमंडळाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 03:47 IST

तीन वर्षापूर्वी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले एकनाथराव खडसे, सव्वा वर्षांपासून मंत्रिमंडळाबाहेर आहेत. विधिमंडळ, पक्षाच्या बैठका, प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे यातून त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी वेळोवेळी नाराजी आणि अन्यायाचा सूर लावला.

तीन वर्षापूर्वी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले एकनाथराव खडसे, सव्वा वर्षांपासून मंत्रिमंडळाबाहेर आहेत. विधिमंडळ, पक्षाच्या बैठका, प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे यातून त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी वेळोवेळी नाराजी आणि अन्यायाचा सूर लावला. परंतु पक्षश्रेष्ठी ‘योग्य वेळे’चे पालुपद सोडायला तयार नाहीत. त्यांचे पुनर्वसन करा आणि त्यांना मंत्रिमंडळात स्थान द्या, असा ठराव त्यांच्या समर्थकांनी जळगावच्या पक्ष बैठकीत केला. या बैठकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी खडसे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. ही समर्थकांची भावना अस्थानी असल्याचे खडसे जाणून आहेत आणि त्यांनी ते बैठकीत बोलूनही दाखविले. माझ्या मंत्रिमंडळ प्रवेशाचा निर्णय जिल्हा वा राज्य पातळीवर होणारा नसून तो केंद्रीय पातळीवर होणार आहे, हे कार्यकर्त्यांना समजावून सांगत असताना खडसे भावनेच्या भरात पक्षश्रेष्ठींविषयी कठोरपणे बोलले. पक्षात नवीन लोक येत आहेत, जबाबदारी घेत आहेत. आम्ही आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहोत. अडवाणींची काय स्थिती आहे, असे खडसे म्हणाले. हे भाजपामधील वास्तव असले तरी ती पक्षश्रेष्ठींवर थेट टीका आहे. वाजपेयी-अडवाणींच्या काळातील भाजपा आता राहिलेला नाही. मोदी-शहांचा भाजपा वेगळा आहे, याचा अनुभव स्वत: खडसे घेत असतानाही अशी वक्तव्ये नैराश्यातून येत आहेत, असेच म्हणावे लागेल. पक्ष उभारणीत त्यांचे योगदान आहेच, ते नाकारता येणार नाही. परंतु इतरांनीही पक्षाचा व्यापक विस्तार केला, हे नजरेआड करून कसे चालेल. अगदी खडसे यांच्या जळगाव जिल्ह्याचा विचार केला तरी या सव्वा वर्षात खडसे नाराज असतानाही गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील या मंत्रिद्वयांनी विधान परिषद, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळवून दिलेच ना! काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मातब्बरांना भाजपामध्ये आणून ‘शतप्रतिशत’चा संकल्प ही जोडगोळी पूर्ण करीत आहे. पूर्वी खडसे जी कामगिरी जळगाव जिल्ह्यात करून दाखवायचे ती किंवा त्यापेक्षा अधिक आता होत आहे. बहुदा खडसे यांच्या उद्वेगाचे हे देखील एक कारण असावे. पण हा काळाचा महिमा आहे. काळ कुणासाठी थांबत नसतो. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची संस्कृती असल्याने खडसे नसले तर महाजन-पाटील आहेत, हे कार्यकर्ते जाणतात. पक्षात ‘इनकमिंग’ इतके वाढले आहे की, पक्षश्रेष्ठी जुन्यांची सशर्त जबाबदारी स्वीकारण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे खडसे आणि त्यांच्या समर्थकांनी ‘श्रध्दा आणि सबुरी’ हे तत्त्व अंगिकारणे आवश्यक आहेत. परंतु सत्तासुंदरीचा मोह भल्याभल्यांना सोडवत नाही, तिथे खडसे तरी कसे अपवाद ठरतील? त्यामुळे गोंधळ, ठरावासारखे प्रकार घडत असावेत. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार