शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
3
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
4
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
7
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
8
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
9
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
10
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
11
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
13
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
14
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
15
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
16
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
17
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
18
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
19
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
20
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धी दे, विवेक दे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 05:27 IST

गणपती हा विघ्नहर्ता आहे. विघ्ने दूर करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, कारण तो बुद्धीचा देव आहे.

मंगलमूर्ती गजाननाचे आगमन आज होत आहे. हा देवच असा आहे की त्याचे आगमन प्रसन्नतेचा शिडकावा करीत येते. बाप्पाकडे पाहिल्यावर प्रसन्नतेची जाणीव न होणारा माणूस विरळा. नास्तिकाच्या चेहऱ्यावरही कौतुकाचे स्मित उमटविणारा हा देव आहे. हौसेने घरात येणारा व कुटुंबीयांकडून कौतुक करून घेणारा असा हा देव आहे. त्याचा धाक वाटत नाही. त्याच्या पूजेत काही कमी-जास्त झाले तर तो रागावेल, कोपेल अशी धास्ती वाटत नाही. दीड दिवस असो वा दहा दिवस, तो आपला घरातला असतो. त्याला आणताना जितका आनंद होतो, तसाच त्याला निरोप देताना डोळे पाणावतात. पुढील वर्षी लवकर या, अशा प्रेमळ अधिकारवाणीने त्याला निरोप दिला जातो.

गणपती हा विघ्नहर्ता आहे. विघ्ने दूर करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, कारण तो बुद्धीचा देव आहे. केवळ शक्तीने नव्हे तर बुद्धीने तो विघ्नांचे हरण करतो. विवेकी आणि सूक्ष्म बुद्धीचा तो स्वामी आहे. त्याचे रुंद कान आणि मोडलेला एक दात हे उत्तम श्रवणशक्ती आणि विवेकशक्ती यांचे द्योतक आहे. श्रवण उत्तम असले तरच ज्ञान वाढते. श्रवणाची कला साधली की विचारात चौफेरता येते. यातून विवेकशक्तीची वाढ होते. विवेक जागृत असला की योग्य निर्णय घेता येतो. गजाननाकडे हे सर्व गुण असल्याने सर्वारंभी पूजनीय असा तो देव आहे. त्याच्या घरगुती वास्तव्यात आपल्यालाही याच गुणांची जोपासना करायची असते. आज देशालाही याच गुणांची गरज आहे. गणरायाचे उत्साहाने स्वागत होत असले तरी देशातील वातावरण उत्साहाचे नाही. पावसाने कागदावर सरासरी गाठली असली तरी तो विस्कळीत स्वरूपात पडला. पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला तर मराठवाडा बहुतांश कोरडा राहिला. काही राज्यांमध्ये पूर आले तर काही ठिकाणी पाऊस अत्यल्प झाला. पावसाचा लहरीपणा हा भारताला नवीन नाही. मात्र त्याच्या लहरीपणावर मात करणे शक्य आहे. त्यासाठी बुद्धीची व विवेकाची गरज असते. सरकारी अधिकाऱ्यांनी बुद्धी व विवेक वापरला असता तरी पश्चिम महाराष्ट्रातील नुकसान बरेच कमी झाले असते. अधिकाºयांनी आपली बुद्धी पूररेषा डावलण्यासाठी वापरली. यातून झालेला विध्वंस पाहून आता तरी संबंधितांना विवेकाने वागण्याची सुबुद्धी यावी. अर्थव्यवस्थेमधील मरगळ ही आणखी एक चिंतेची बाब आहे. गेली काही वर्षे देशाची आर्थिक प्रकृती खालावत चालली आहे. याची काही कारणे आंतरराष्ट्रीय असली तरी बरीच कारणे सध्याच्या राज्यकर्त्यांच्या कारभारात लपलेली आहेत.

योग्य धोरण असते तर यावर आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निदान प्रयत्न तरी झाले असते. संपत्ती निर्माण करणारे उद्योजक व सरकार यांच्यात संवाद राहिलेला नाही. परस्परांबद्दल अविश्वास आहे. देशातील गुंतवणूक वाढत नाही, कारण सरकार कधी काय निर्णय घेईल याचा भरवसा उद्योग क्षेत्राला राहिलेला नाही. अनिश्चिततेचे वारे असले की त्याचा आर्थिक क्षेत्रावर दुष्परिणाम होतो. करचक्राचे शुक्लकाष्ठ मागे लागण्याची भीती आहेच. देशाचे भले चिंतणाºया अनेक उद्योजकांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत सरकार नाही. चार जाणकारांचे विचार ऐकावेत, त्यांचा सल्ला घ्यावा, जगातील वेगवेगळ्या प्रवाहांची व त्यांच्या परिणामांची माहिती करून घ्यावी, त्यातून येणाºया शहाणपणानुसार कारभार करावा ही परंपरा सध्याच्या सरकारला मान्य नाही. उलट लोकसभेत बहुमत मिळाल्यामुळे बाहेरील शहाणपणाची गरज काय, अशा गुर्मीत सरकार आहे. ही एकप्रकारे मनमानीच म्हटली पाहिजे. ही सरकारची मानसिकता बदलली जावो. अचानक झटका देणारे निर्णय घेण्याची वा आधी घेतलेले निर्णय फिरविण्याची हौस या सरकारला आहे. सरकारच्या अशा स्वभावामुळे आर्थिक मरगळ ही आर्थिक मंदीच्या दिशेने जाण्याची धास्ती वाटते. योग्य निर्णय घेण्याची सुबुद्धी मिळाली तर आर्थिक मंदीची झळ काही प्रमाणात तरी कमी होऊ शकते. बुद्धी आणि विवेकाचा कारभार ही मरगळ दूर करू शकतो. म्हणून गणरायाकडे प्रार्थना करावीशी वाटते की बाबा, शहाण्यांचे ऐकण्याची आणि आर्थिक निर्णय विवेकाने घेण्याची बुद्धी, आमच्या राज्यकर्त्यांना दे. पुढील वर्षी तुझे स्वागत अधिक उत्साहाने करण्यासाठी हा वर गरजेचा आहे.

अर्थव्यवस्थेमधील मरगळ ही एक चिंतेची बाब आहे. गेली काही वर्षे देशाची आर्थिक प्रकृती खालावत आहे. याची काही कारणे आंतरराष्ट्रीय असली तरी बरीच कारणे सध्याच्या राज्यकर्त्यांच्या कारभारात आहेत.

टॅग्स :MumbaiमुंबईGanpati Festivalगणेशोत्सवGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019