शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साई इतना दे दे

By admin | Updated: June 11, 2016 04:45 IST

कुठलेही घर सोडताना मनाला फार यातना होतात. मी आजपर्यंत कधी घर कधी मोजले नाही.

कुठलेही घर सोडताना मनाला फार यातना होतात. मी आजपर्यंत कधी घर कधी मोजले नाही. मुंबईला येण्यापूर्वी घर मोजत असतात हेच माहिती नव्हते. फूटपट्टी कधी लागायचीच नाही. तिचे दोनच उपयोग, एक भूमितीसाठी आणि दुसरा मास्तरांकडून मार खाण्यासाठी. वडिलांची बदलीची नोकरी होती. वडील आधी जाऊन घर बघत. आम्ही मागून समानसुमान घेऊन जायचो. बैठकीची खोली, लांब ओसरी आणि स्वयंपाकघर की झाले घर ! कधीकधी सामानाची किंवा बाळंतिणीची अंधारी खोली असायची. त्यामध्ये दुपारी लपाछपी खेळायला मजा यायची. इथेच अडगळही असायची. आणि प्रशस्त अंगण. औरंगाबादला आल्यावर वडिलांनी स्वत:चे घर बांधले. स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील या आमच्या घराशी मात्र खूप आठवणी जोडल्या गेल्या. पुढे लग्न झाल्यानंतरही बदलीच्या निमित्ताने अनेक गावे आणि घरे बदलली. नवे घर आधी परके वाटते. मग थोड्या सोईसवलती करून घेतल्या, सामान लावले की त्याला घरपण येते. बाहेर वावरताना यश मिळाले किंवा अपयशाला सामोरे जावे लागले तरी घर एका मायेने तुम्हाला स्वत:त सामावून घेत असते. मग कधी अचानक ‘प्रशासकीय कारणास्तव आणि जनहितार्थ’ बदलीचा आदेश येतो आणि पुन्हा बांधाबांध करत आपण नव्या घराच्या शोधात निघतो. सुरुवातीला अनोळखी वाटलेले घर सोडताना आता मात्र डोळे भरून येतात. ओक्याबोक्या भिंती आणि त्यांचे रितेपण घराला केविलवाणे करून टाकते. मी डोळ्यातले पाणी निकराने आवरून, हसत घराला नमस्कार करते. ‘येईन तुला परत भेटायला’ असे मनाशी पुटपुटते आणि बांध फुटायच्या आत चुपचाप खाली मान घालून चालायला लागते. मुंबईत मात्र घराच्या नव्या व्याख्या कानावर आल्या. ‘मी ३४० स्क्वेअर फूटमध्ये राहातो’. ‘माझे घर ७०० स्क्वेअर फूटचे आहे’. तर कधी केवळ ‘वन बी.एच.के’ ‘टूबी.एच.के’ असे ऐकू येऊ लागले. घराचा मोठा आकार असणाऱ्यांचा चेहरा कर्तबगारीने फुललेला तर लहान घरवाल्यांच्या चेहऱ्यावर ‘चाललयं कसबसं’ असे भाव. मला मात्र घराचे मोजमाप करायची कल्पना रु चत नाही. आईच्या प्रेमाची किंमत कुणी पैशात किंवा आकड्यात करू शकते का? डोक्यावरच्या छताची सावली महत्वाची, तिचे मोजमाप कशाला काढायचे? मला आजही माझ्या घराचे क्षेत्रफळ माहित नाही, कधी ते मोजलेच नाही व मोजणारही नाही. संत कबीरांनी म्हटले नाही का, ङ्क्त ‘साई इतना दे दे,जामे कुटूम समाय,मै भी भुखा न रहू,साधु भी भुखा न जाय !’ -श्रद्धा बेलसरे-खारकर