शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गिरीश महाजनांची अज्ञानाची डरकाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:19 IST

वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार बिबट्या हा संरक्षित वन्यजीव आहे. मानवी जीव वा पिकांना धोका निर्माण झाला तर असे वन्यजीव अपवादात्मक परिस्थितीत ठार मारण्याची तरतूद कायद्यात जरूर आहे. पण असे आदेश देण्याचे अधिकार वनमंत्री किंवा त्या खात्याच्या प्रधान सचिवांना बिलकूल नाहीत.

जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यात एका बिबट्याने सहा जणांचा बळी घेतल्याने सुमारे १२ गावांत भीतीचे वातावरण आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना सोमवारी यावरून लोकांच्या संतापाचा अनुभव आला. महाजन याच जिल्ह्यातील असल्याने लोकांना शांत करण्यासाठी त्यांना चमकेशगिरी करणे भाग होते. त्यानुसार त्यांनी विश्रामगृहात घेतलेल्या बैठकीत, या बिबट्याला दिसताक्षणी ठार मारण्याचे आदेश वनमंत्र्यांनी दिले असल्याचे सांगितले. एवढेच करून ते थांबले नाहीत. या बिबट्याचा जंगलात शोध घेण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाºयांसोबत महाजनही हातात पिस्तूल घेऊन बाहेर पडले. या बिबट्याचा बंदोबस्त केल्याशिवाय जिल्ह्याबाहेर जाणार नाही, असेही महाजन यांनी जाहीर केले. बिबट्याने बळी घेतलेल्या महिलेचा मृतदेह पोलीस स्टेशनमध्ये आणल्यावर आमदार उन्मेश पाटील यांनीही नातेवाईंकांना शांत करण्यासाठी महाजन यांच्याप्रमाणेच चमकेशगिरी केली. मंत्रालयात फोन करून या बिबट्याला ठार मारण्याचे तोंडी आदेश वन विभागाच्या प्रधान सचिवांकडून आपण घेतल्याचे आमदार पाटील यांनी सांगून टाकले. महाजन किंवा पाटील हे लोकप्रतिनिधी असल्याने त्यांनी जनतेच्या भावनांची कदर करणे समजण्यासारखे आहे. परंतु हे करत असताना आपण लोकांना चक्क उल्लू बनवत आहोत, याची कदाचित या दोघांनाही जाणीव नसावी. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार बिबट्या हा संरक्षित वन्यजीव आहे. मानवी जीव वा पिकांना धोका निर्माण झाला तर असे वन्यजीव अपवादात्मक परिस्थितीत ठार मारण्याची तरतूद कायद्यात जरूर आहे. पण असे आदेश देण्याचे अधिकार वनमंत्री किंवा त्या खात्याच्या प्रधान सचिवांना बिलकूल नाहीत. हे अधिकार फक्त मुख्य वन्यजीव संरक्षकांना आहेत. त्यासाठीही ठराविक प्रक्रिया आहे. संबंधित धोकादायक वन्यजीवाला जिवंत पकडण्याचे किंवा दुसरीकडे नेऊन सोडण्याचे सर्व पर्याय व्यर्थ आहेत याची पूर्ण खात्री झाल्याची सविस्तर नोंद करणारा लेखी आदेश त्यासाठी द्यावा लागतो. गेल्या जूनमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी वनक्षेत्रात धुमाकूळ घालणाºया नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचा असा रीतसर आदेश वन्यजीव संरक्षकांनी काढला. पण तोही नियमबाह्य ठरवून उच्च न्यायालयाने रद्द केला. यावरून नरभक्षक वाघ किंवा बिबट्याला कायदेशीरपणे मारणे वाटते तेवढे सोपे नाही. चाळीसगावच्या या प्रकरणात बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश वनमंत्र्यांनी किंवा त्यांच्या खात्याच्या प्रधान सचिवांनी खरंच दिले असावेत असे वाटत नाही. महाजन व पाटील यांनी वेळ मारून नेण्यासाठी असे आदेश त्यांच्या खाती टाकले आहेत. पण वनमंत्री व प्रधान सचिवांनी खरंच असे आदेश दिले असतील तर मात्र ते फार गंभीर आहे. नरभक्षक बिबट्या कितीही धोकादायक असला तरी त्याला कायद्याने दिलेले संरक्षण असे मंत्री व आमदारच मनमानी पद्धतीने हिरावून घेणार असतील तर त्यांच्या हाती पिस्तुलाऐवजी बेड्याच शोभून दिसतील.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार