शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

गिरीश बापटांची भविष्यवाणी

By अतुल कुलकर्णी | Updated: January 10, 2018 07:32 IST

सप्रेम नमस्कार. आपल्या स्पष्टवक्तेपणाचे करावे तेवढे कौतुक थोडेच. आपण जे बोलता ते खरं बोलता, रोखठोक बोलून मोकळे होता. त्याच्या परिणामांची पर्वाही आपण करत नाही; हेच तर आपले वैशिष्ट्य. मात्र आपण पुण्यात जे काही बोललात, त्यामुळे देवेंद्रभाऊ चांगलेच हादरले आहेत.

प्रिय गिरीश बापटजी,सप्रेम नमस्कार. आपल्या स्पष्टवक्तेपणाचे करावे तेवढे कौतुक थोडेच. आपण जे बोलता ते खरं बोलता, रोखठोक बोलून मोकळे होता. त्याच्या परिणामांची पर्वाही आपण करत नाही; हेच तर आपले वैशिष्ट्य. मात्र आपण पुण्यात जे काही बोललात, त्यामुळे देवेंद्रभाऊ चांगलेच हादरले आहेत. पण काँग्रेस, राष्ट्रवादीवाल्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. ‘वर्षभरात सरकार बदलणार आहे... तेव्हा जे काय मागायचं ते आत्ताच मागून घ्या’, असं सांगून आपण विरोधकांना परमानंद तर स्वकीयांना प्रचंड दु:ख दिलंय. आपल्या या स्पष्ट बोलण्यामुळे आपण भाजपातच राहावे की पुन्हा एकदा अजितदादांशी पार्टनरशिप जुळवून घेत राष्ट्रवादीत जावे असा प्रश्न खा. संजय काकडे यांनाही पडल्याचे अंकुश काकडे सॅटरडे क्लबमध्ये सांगत होते. तिकडे रावसाहेब दानवेंना प्रश्न पडलाय की, भाजपामधले काँग्रेसी नेते अशी आपली स्वत:ची ओळख असताना त्यात बापटांची भर कशी काय पडली... अहो नवीन सरकार येणार आहे याचा अर्थ आपलं सरकार येणार नाही असा होतो... आपल्या सरकारने एकापेक्षा एक चांगली कामं केलेली असताना हे असं बोलणं म्हणजे जरा अतीच झालं असं नाही का वाटत तुम्हाला...? आपल्या सरकारने काय नाही केलं...? पृथ्वीराज चव्हाणांनी पुण्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना सगळ्या राज्यभर नेली. त्यांच्याच काळात कोस्टल रोडची घोषणा झाली तीही आपण पुढे नेली. मेट्रो, मोनोची मुहूर्तमेढ पृथ्वीराजांनी रोवली, त्या योजनेला आपण गती दिली. अजितदादांनी पुण्यातल्या मेट्रोची फक्त घोषणा केली होती, आपण ती कृतीत आणली. विविध महामंडळं, समित्या, कमिट्यांच्या सदस्यत्वाची गाजरं दाखवत काँग्रेसवाल्यांनी रिकाम्या ठेवल्या होत्या तसेच आपल्या सरकारनेही केलंय. त्यांनीही या कमिट्या रिकाम्याच ठेवल्यात. नारायण राणेंना गूळ खोबरं देऊन ठेवलंय... खडसेंना देतो म्हणून सांगितलंय. एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपदाचं मोठ्ठं गाजर दिलेलं आहे... आणखी काय करायला पाहिजे सांगा बरं... राहता राहिला त्या शेतक-यांना पारदर्शकपणे कर्जमाफी देण्याचा विषय. तो फक्त मागच्या सरकारपेक्षा वेगळा विषय आपल्या देवेनभाऊंनी केला. त्याचा एवढा का राग यावा...? अहो, मागेही तुम्ही असेच एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला होता, ‘‘तुम्ही रात्री कोणत्या क्लिप व्हिडीओवर पाहता हे मला माहितीयं. कारण तुम्ही काय बघता ते मी पण बघतो... असं समजू नका, की आम्ही म्हातारे कोतारे झालो, आम्ही पण अजून तरुण आहोत...’’ आणि त्यावरून राज्यभर देवेनभाऊंना पण लोक विचारत होते, तुम्ही पण तसल्या क्लिप बघता का म्हणून... कुणी म्हणाले की रात्री बेरात्री बीकेसीमधे असणाºया सोफीटेलला आपल्यातले अनेक प्रमुख मंत्री जातात म्हणे... पण असं असलं म्हणून काय झालं. त्यासाठी आपलं सरकार पुन्हा येणार नाही असं म्हणणं काही बरोबर नाही साहेब... असं तर नाही ना, की तुम्हीच आता राज्यात कंटाळून खासदारकीचं तिकीट मागून दिल्लीत जाताय आणि म्हणून इथं कुणाचं सरकार आलं काय आणि गेलं काय? आपल्याला काय त्याचं... असं तर नाही ना... तुम्ही पुण्याचे म्हणून विचारले..!

टॅग्स :girish bapatगिरीष बापट