शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

उदार की संधीसाधू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 05:54 IST

इम्रान खान यांच्या उदार धोरणामुळे अभिनंदनची सुटका होणार असली तरी त्यानंतर दहशतवाद्यांना बळ पुरविण्याचे पाकिस्तान थांबविणार आहे काय, हा मुख्य प्रश्न आहे. तसे तोंडी आश्वासन पाकिस्तानने अनेक वेळा दिले असले तरी कारवाई कधीच केलेली नाही.

हवाई चकमकीत अनपेक्षितपणे पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेले भारताचे वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना भारतात परत पाठविले जाईल, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी केली. अभिनंदन यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणारी परराष्ट्र खात्याची यंत्रणा आणि अभिनंदनसाठी प्रार्थना करणारे कोट्यवधी भारतीय नागरिक यांना समाधान वाटावे अशी ही घोषणा आहे.

अभिनंदन यांची सुटका पाकिस्तानला करावी लागणार हे कालपासूनच लक्षात येत असले तरी सुटकेची घोषणा इतक्या तातडीने होणे अनपेक्षित आहे. कारण युद्धकैद्यांबाबत पाकिस्तानबरोबरचा अनुभव चांगला नाही. अनेक दिवस अतीव छळ सोसल्यानंतर यापूर्वीचे युद्धकैदी सुटले आहेत. अभिनंदन यांची सुटकाही काही दिवसांनंतर होईल असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री म्हणत होते. नंतर निर्णय फिरला व उद्याच सुटका होणार अशी घोषणा झाली. इम्रान खान यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत चालला होता. अमेरिका, चीनसारखी मित्रराष्ट्रेही खडे बोल सुनावीत होती. मुस्लीमबहुल राष्ट्रांकडूनही प्रतिसाद मिळत नव्हता. जगाच्या पाठीवर एकटा पडलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांची ही दिखाऊ उदारता आहे. पाकिस्तानच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज मिळाले नाही, तर पाकिस्तान दिवाळखोरीत जाईल. केवळ द्वेषापोटी भारताच्या वैमानिकाला वाईट वागणूक दिली वा अडकवून ठेवले तर त्याचे घोर परिणाम होतील हे पाकिस्तानचे पंतप्रधान व या पंतप्रधानांना पडद्याआडून नाचविणारे तेथील लष्कर यांना पुरते माहीत आहे. पैसा उभा करण्यासाठी जगासमोर उजळ माथ्याने जायचे असेल तर भारतीय वैमानिकाला सोडणे सोईस्कर होईल हा संधीसाधू हिशेब त्यामागे आहे. अभिनंदनची सुटका ही भारतासाठी महत्त्वाची व समाधानाची असली तरी त्यामागचे संधीसाधू राजकारण दुर्लक्षित करता येणार नाही. आता पंचाईत मोदी सरकारची आहे.

मंगळवारच्या हवाई मुसंडीनंतर भारताची मान ताठ झाली होती. सर्व संकेतांना दूर सारून पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानच्या प्रचारसभेत गर्वाचे प्रदर्शन केले. भारतीय वायुदलाची कामगिरी अभिमान वाटावा अशीच होती यात शंका नाही. त्याबद्दल प्रत्येक देशवासी वायुदलाचे मनापासून कौतुकही करीत होता. पण एका कारवाईमुळे विजय मिळाला असे होत नाही. पाकिस्तान हा भारतद्वेषाने पछाडलेला प्रबळ शत्रू आहे. नव्या नव्या क्लृप्त्या शोधून भारताला जेरीस आणण्याचे मिशन त्या देशातील राज्यकर्त्यांनी घेतले आहे. एखाद-दुसऱ्या सर्जिकल स्ट्राइकने माघार घेणारा वा कारवाया थांबविणारा तो देश नाही. याचे प्रत्यंतर दुसऱ्याच दिवशी आले. बुधवारी पाकिस्तानने भारतीय लष्करी ठाण्यांवर उघड हल्ला केला. तो परतवून लावताना दुर्दैवाने अभिनंदन वर्धमानचे विमान कोसळले व तो पाकिस्तानच्या कैदेत पडला. विजयानंतर ठेच अशी भारताची अवस्था झाली. भारताच्या हवाई हल्ल्यामुळे नाचक्की झालेल्या पाकिस्तानी लष्कराला या एका दुर्दैवी घटनेमुळे जोम आला. भारताला कैचीत पकडण्यास एक कारण मिळाले. त्याच कारणाचा वापर करून भारताची आक्र मकता थांबविण्याची धडपड इम्रान खान करीत आहेत. तेव्हा अभिनंदनबाबतचे उदार धोरण व दहशतवाद्यांची सातत्याने होणारी घरभरणी या पाकिस्तानच्या दुटप्पी खेळाचा ताळमेळ कसा घालायचा, हा प्रश्न भारतापुढे आहे. यासाठी एकच मार्ग म्हणजे अभिनंदनची सुटका ही पाकिस्तानच्या उदारतेची कृती नसून भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विजय आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

युद्धाचे अनेक आयाम असतात व परराष्ट्र धोरण हे त्यातील एक मुख्य अस्त्र असते. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताने ते परिणामकारक रीतीने वापरले आणि म्हणून अभिनंदनची सुटका करण्याची वेळ पाकिस्तानवर आली हे लक्षात ठेवून जोपर्यंत दहशतवादी कारवाया बंद होत नाहीत आणि मसूद अजहरला ताब्यात देत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानसोबत शांततेचा व्यवहार होऊ शकत नाही अशी धोरणातील स्पष्टता भारताने ठेवली पाहिजे. मात्र वाटाघाटीचे दरवाजे बिलकूल बंद करूनही चालत नाही. सोयीनुसार ते किलकिले करावे लागतात. मोदी सरकारने याचेही भान ठेवायलाच हवे. तीच आजची गरज आहे.