शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

गौरीवर लादली ‘खुनी सेन्सॉरशिप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:10 IST

खून ही सर्वाधिक परिणामकारक आणि अखेरची सेन्सॉरशिप आहे. ती टीकाकाराची भाषा बंद पाडते, त्याची लेखणी हिरावून घेते आणि त्याचे प्राण घेऊन त्याचा भविष्यकालीन बंदोबस्तही करून टाकते.

खून ही सर्वाधिक परिणामकारक आणि अखेरची सेन्सॉरशिप आहे. ती टीकाकाराची भाषा बंद पाडते, त्याची लेखणी हिरावून घेते आणि त्याचे प्राण घेऊन त्याचा भविष्यकालीन बंदोबस्तही करून टाकते. खून करून सेन्सॉरशिप लादणे ही बाब देशात आणीबाणी लावण्याहून व ती अमलात आणण्याहून सोपी आहे. घटनेची कलमे शोधा, राष्ट्रपतींचा वटहुकूम काढा आणि पोलिसांसह तुरुंगाच्या सगळ्या यंत्रणा सज्ज करा, एवढे सारे करण्यापेक्षा आपल्या विश्वासातल्या चारदोन माणसांना सुपारी आणि त्यांनी मागितलेली किंमत एवढे दिले की ही सेन्सॉरशिप कोणावरही व कधीही लादता येते. शिवाय खुनाचे परिणाम मोठे व साºयांना कायमची दहशत बसविणारेही असतात. गौरी लंकेश या ५० वर्षे वयाच्या महिला पत्रकाराची तिच्या राहत्या घरी काही मोटारसायकलस्वारांनी गोळ्या घालून केलेली हत्या हा अशा सोप्या व घटनाबाह्य सेन्सॉरशिपचा ताजा नमुना आहे. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंदराव पानसरे या दोन मराठी विचारवंतांच्या पाठोपाठ एम.एम. कलबुर्गी या कानडी विचारवंताची याच सेन्सॉरवाल्यांनी हत्या केल्याची प्रकरणे पोलीस तपासात रखडत असतानाच त्यात गौरी लंकेश या दुसºया कानडी पत्रकाराच्या खुनाच्या तपासाची भर पडली आहे. या सेन्सॉरशिपचे महत्त्वाचे वैशिष्ट्य हे की ती लादणारे व त्यांच्या पाठीशी असणारे लोक पोलिसांना व सरकारला कधी सापडत नाहीत. मरणारे मरतात, त्यांचा आवाज तात्पुरता थांबतो, त्यांची लेखणीही स्थिरावते. मग त्यांना मारणारे सरकारच्या कृपेने आनंदात जगतात व सुरक्षित होतात. गौरीचा अपराध कोणता? ती सरकारवर टीका करते, नोटाबंदी, परराष्ट्र व्यवहारातील अपयश, वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या साºयांवर ती आपल्या साप्ताहिकातून कोरडे ओढते आणि त्यासाठी होणाºया आंदोलनात आपल्या लोकशाही अधिकारांचा वापर करून ती भागही घेते. (त्यातून या गौरीवर भाजपचे एक खासदार प्रल्हाद जोशी यांनी काही काळापूर्वी बदनामीचा खटलाही दाखल केला होता) मात्र लोकशाही हाच ज्या समाजात टवाळीचा विषय होतो, घटना आणि कायदे जेथे कागदावर राहतात आणि झालाच तर त्यांचा वापर सरकारच्या विरोधकांविरुद्ध, टीकाकारांविरुद्ध आणि सत्ताधाºयांच्या राजकारणाला गैरसोयीचे ठरणाºयांविरुद्धच जेथे होतो तेथे असे खून व अशी मरणे काही काळ चर्चेत राहून विस्मरणात जातात. त्यांचे समर्थन करायलाही काही नामवंत निर्लज्जपणे पुढे येतात. सरकारने दिलेली दोन अभियांत्रिकी महाविद्यालये ताब्यात ठेवून त्यावर ऐश करणाºया एका मराठी पत्रकाराने ‘गौरीचा खून खासगी कारणावरूनही झाला असेल’ असे जे आपल्या पत्रकारितेच्या व्यवसायाचा द्रोह करणारे विधान केले त्याला नवे सरकार आणखी काही देईलही. परंतु तेवढ्याने दाभोलकर ते गौरी यांच्या बलिदानाची सर त्याच्या श्रीमंतीला गाठता येणार नाही. सरकारच्या बाजूने बोला, तसेच लिहा, त्यावर टीका नको, त्याची आरती हवी. ते तुम्ही करणार नसाल तर तुम्ही देशद्रोही किंवा पाकिस्तानी. तरी गौरी लंकेश ही हिंदू होती आणि सरकारवर टीका करण्याचा अधिकार साºयांसारखाच येथील हिंदूंनाही आहे. दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी हेही हिंदूच होते. गौरीही त्यातलीच. तिचा अपराध एवढाच की ती हिंदू असूनही हिंदुत्ववादी नव्हती. झालेच तर ती विश्व हिंदूही नव्हती. आपल्यासारखी साधी हिंदू होती आणि वादाचा चष्मा डोळ्यावर नसल्याने तिला सरकारचे दोष आणि जनतेच्या हालअपेष्टा दिसत होत्या. आपल्या साप्ताहिकातून ती त्यांनाच वाचा फोडत होती. पण सत्ताधारी मग्रूर असले की त्यांना टीका करणारी कविताही सहन होत नाही. त्यातून सरकारला असंख्य हात असतात. त्यातले बरेचसे दिसणारेही नसतात. लष्कर व पोलीस हे त्याचे दिसणारे हात तर पक्ष कार्यकर्ते, सहयोगी आणि अनुकूल असणाºया संघटनांमधील असंख्य अज्ञात माणसे यातले कोणीही अशा खुनात सत्तेचे हस्तक म्हणून भाग घेऊ शकतात. अशी माणसे संघटनांचे व सत्तेचे आश्वासन मिळाले आणि त्यांना हवे ते दिले गेले की मालेगावात बॉम्बस्फोट घडवतात आणि पंजाबातील रेल्वेगाड्यात हिंसाचार उभा करतात. गायीखातर शंभरावर माणसे ठार मारतात आणि सरकार सोडा पण न्यायालयेही त्यांना हात लावत नाहीत. पोलीस त्यांना भिऊन असतात. ते राजकीय व्यासपीठांवर वावरतात आणि त्यांना देशभक्तीचे सर्टिफिकेट दिले जाऊन त्यांचे यथाकाळ सन्मानपूर्वक पुनर्वसनही केले जाते. त्यामुळे गौरी लंकेश गेल्या तरी त्यांचे मारेकरी सरकारला सापडणार नाहीत. सरकार त्याविषयी दु:खही व्यक्त करणार नाही. सरकारचा पक्ष ती घटना कोरड्या डोळ्याने पाहील आणि न पाहिल्यासारखे करील. तशाही सरकारच्या अनेक टीकाकारांच्या अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हत्या आता दफ्तरजमा आहेत. त्यांचा पोलिसांसह तपास यंत्रणांनाही विसर पडला आहे. सरकार त्याविषयी बोलत नाही आणि विरोधकांच्या बोलण्याकडे ते फारसे लक्षही देत नाही. सबब, गौरीच्या हत्येमुळे सरकारवर टीका करणाºयांच्या हत्या थांबतील यावर कोणी विश्वास ठेवण्याचे कारण नाही. त्या यापुढेही चालू राहतील. वृत्तपत्रे काही काळ त्यांच्या बातम्या छापतील आणि त्याची सवय झालेले लोक पुढे ‘अरे, आता हे असे चालणारच’ असे म्हणून गप्प होतील. म्हणून आपणच गौरीला श्रद्धांजली वाहू या.

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणGauri Lankeshगौरी लंकेश