शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

गौरीवर लादली ‘खुनी सेन्सॉरशिप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:10 IST

खून ही सर्वाधिक परिणामकारक आणि अखेरची सेन्सॉरशिप आहे. ती टीकाकाराची भाषा बंद पाडते, त्याची लेखणी हिरावून घेते आणि त्याचे प्राण घेऊन त्याचा भविष्यकालीन बंदोबस्तही करून टाकते.

खून ही सर्वाधिक परिणामकारक आणि अखेरची सेन्सॉरशिप आहे. ती टीकाकाराची भाषा बंद पाडते, त्याची लेखणी हिरावून घेते आणि त्याचे प्राण घेऊन त्याचा भविष्यकालीन बंदोबस्तही करून टाकते. खून करून सेन्सॉरशिप लादणे ही बाब देशात आणीबाणी लावण्याहून व ती अमलात आणण्याहून सोपी आहे. घटनेची कलमे शोधा, राष्ट्रपतींचा वटहुकूम काढा आणि पोलिसांसह तुरुंगाच्या सगळ्या यंत्रणा सज्ज करा, एवढे सारे करण्यापेक्षा आपल्या विश्वासातल्या चारदोन माणसांना सुपारी आणि त्यांनी मागितलेली किंमत एवढे दिले की ही सेन्सॉरशिप कोणावरही व कधीही लादता येते. शिवाय खुनाचे परिणाम मोठे व साºयांना कायमची दहशत बसविणारेही असतात. गौरी लंकेश या ५० वर्षे वयाच्या महिला पत्रकाराची तिच्या राहत्या घरी काही मोटारसायकलस्वारांनी गोळ्या घालून केलेली हत्या हा अशा सोप्या व घटनाबाह्य सेन्सॉरशिपचा ताजा नमुना आहे. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंदराव पानसरे या दोन मराठी विचारवंतांच्या पाठोपाठ एम.एम. कलबुर्गी या कानडी विचारवंताची याच सेन्सॉरवाल्यांनी हत्या केल्याची प्रकरणे पोलीस तपासात रखडत असतानाच त्यात गौरी लंकेश या दुसºया कानडी पत्रकाराच्या खुनाच्या तपासाची भर पडली आहे. या सेन्सॉरशिपचे महत्त्वाचे वैशिष्ट्य हे की ती लादणारे व त्यांच्या पाठीशी असणारे लोक पोलिसांना व सरकारला कधी सापडत नाहीत. मरणारे मरतात, त्यांचा आवाज तात्पुरता थांबतो, त्यांची लेखणीही स्थिरावते. मग त्यांना मारणारे सरकारच्या कृपेने आनंदात जगतात व सुरक्षित होतात. गौरीचा अपराध कोणता? ती सरकारवर टीका करते, नोटाबंदी, परराष्ट्र व्यवहारातील अपयश, वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या साºयांवर ती आपल्या साप्ताहिकातून कोरडे ओढते आणि त्यासाठी होणाºया आंदोलनात आपल्या लोकशाही अधिकारांचा वापर करून ती भागही घेते. (त्यातून या गौरीवर भाजपचे एक खासदार प्रल्हाद जोशी यांनी काही काळापूर्वी बदनामीचा खटलाही दाखल केला होता) मात्र लोकशाही हाच ज्या समाजात टवाळीचा विषय होतो, घटना आणि कायदे जेथे कागदावर राहतात आणि झालाच तर त्यांचा वापर सरकारच्या विरोधकांविरुद्ध, टीकाकारांविरुद्ध आणि सत्ताधाºयांच्या राजकारणाला गैरसोयीचे ठरणाºयांविरुद्धच जेथे होतो तेथे असे खून व अशी मरणे काही काळ चर्चेत राहून विस्मरणात जातात. त्यांचे समर्थन करायलाही काही नामवंत निर्लज्जपणे पुढे येतात. सरकारने दिलेली दोन अभियांत्रिकी महाविद्यालये ताब्यात ठेवून त्यावर ऐश करणाºया एका मराठी पत्रकाराने ‘गौरीचा खून खासगी कारणावरूनही झाला असेल’ असे जे आपल्या पत्रकारितेच्या व्यवसायाचा द्रोह करणारे विधान केले त्याला नवे सरकार आणखी काही देईलही. परंतु तेवढ्याने दाभोलकर ते गौरी यांच्या बलिदानाची सर त्याच्या श्रीमंतीला गाठता येणार नाही. सरकारच्या बाजूने बोला, तसेच लिहा, त्यावर टीका नको, त्याची आरती हवी. ते तुम्ही करणार नसाल तर तुम्ही देशद्रोही किंवा पाकिस्तानी. तरी गौरी लंकेश ही हिंदू होती आणि सरकारवर टीका करण्याचा अधिकार साºयांसारखाच येथील हिंदूंनाही आहे. दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी हेही हिंदूच होते. गौरीही त्यातलीच. तिचा अपराध एवढाच की ती हिंदू असूनही हिंदुत्ववादी नव्हती. झालेच तर ती विश्व हिंदूही नव्हती. आपल्यासारखी साधी हिंदू होती आणि वादाचा चष्मा डोळ्यावर नसल्याने तिला सरकारचे दोष आणि जनतेच्या हालअपेष्टा दिसत होत्या. आपल्या साप्ताहिकातून ती त्यांनाच वाचा फोडत होती. पण सत्ताधारी मग्रूर असले की त्यांना टीका करणारी कविताही सहन होत नाही. त्यातून सरकारला असंख्य हात असतात. त्यातले बरेचसे दिसणारेही नसतात. लष्कर व पोलीस हे त्याचे दिसणारे हात तर पक्ष कार्यकर्ते, सहयोगी आणि अनुकूल असणाºया संघटनांमधील असंख्य अज्ञात माणसे यातले कोणीही अशा खुनात सत्तेचे हस्तक म्हणून भाग घेऊ शकतात. अशी माणसे संघटनांचे व सत्तेचे आश्वासन मिळाले आणि त्यांना हवे ते दिले गेले की मालेगावात बॉम्बस्फोट घडवतात आणि पंजाबातील रेल्वेगाड्यात हिंसाचार उभा करतात. गायीखातर शंभरावर माणसे ठार मारतात आणि सरकार सोडा पण न्यायालयेही त्यांना हात लावत नाहीत. पोलीस त्यांना भिऊन असतात. ते राजकीय व्यासपीठांवर वावरतात आणि त्यांना देशभक्तीचे सर्टिफिकेट दिले जाऊन त्यांचे यथाकाळ सन्मानपूर्वक पुनर्वसनही केले जाते. त्यामुळे गौरी लंकेश गेल्या तरी त्यांचे मारेकरी सरकारला सापडणार नाहीत. सरकार त्याविषयी दु:खही व्यक्त करणार नाही. सरकारचा पक्ष ती घटना कोरड्या डोळ्याने पाहील आणि न पाहिल्यासारखे करील. तशाही सरकारच्या अनेक टीकाकारांच्या अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हत्या आता दफ्तरजमा आहेत. त्यांचा पोलिसांसह तपास यंत्रणांनाही विसर पडला आहे. सरकार त्याविषयी बोलत नाही आणि विरोधकांच्या बोलण्याकडे ते फारसे लक्षही देत नाही. सबब, गौरीच्या हत्येमुळे सरकारवर टीका करणाºयांच्या हत्या थांबतील यावर कोणी विश्वास ठेवण्याचे कारण नाही. त्या यापुढेही चालू राहतील. वृत्तपत्रे काही काळ त्यांच्या बातम्या छापतील आणि त्याची सवय झालेले लोक पुढे ‘अरे, आता हे असे चालणारच’ असे म्हणून गप्प होतील. म्हणून आपणच गौरीला श्रद्धांजली वाहू या.

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणGauri Lankeshगौरी लंकेश