शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

सर्वंकष प्रयत्नांंतूनच गंगा वाचेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 05:36 IST

राज्यकर्ते आता गंगेवरही आपले वर्चस्व सिद्ध करू पाहत आहेत. परिणामी गंगा एका धर्माची धार्मिक नदी मानली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे या कारणांमुळे उर्वरित धर्माचे लोक गंगेपासून दुरावले जात आहेत.

- डॉ. राजेंद्र सिंह, जलपुरुषराज्यकर्ते आता गंगेवरही आपले वर्चस्व सिद्ध करू पाहत आहेत. परिणामी गंगा एका धर्माची धार्मिक नदी मानली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे या कारणांमुळे उर्वरित धर्माचे लोक गंगेपासून दुरावले जात आहेत. मुळात गंगा सर्वांचीच आहे. मात्र, सरकारी प्रचारात केवळ स्नान करणे पुण्य मानले जात आहे. प्रचार-प्रसार करत काही धर्मांना गंगेपासून तोडण्याचे धोरण आखले जात आहे. गंगेचा संपर्क जंगलाशी तुटला आहे आणि घाणेरडे नाले आणि उद्योगांच्या मनमानी कारभारामुळे गंगेतले अतिक्रमण आणि प्रदूषण वाढत आहे.गंगेच्या स्वच्छतेसाठी आंदोलन छेडू पाहत असलेल्या सत्याग्रहींना राष्ट्रविरोधी म्हणून संबोधले जात आहे. गंगेलगत वस्ती आणि उद्योग स्थापन करण्यासाठी सरकार सवलत देत आहे. परिणामी गंगेचे पात्र कमी होत आहे. पूरक्षेत्र कमी होत आहे. महत्त्वाचे म्हणजे जेव्हा गंगेचे राष्ट्रीयकरण झाले तेव्हा या सर्व क्षेत्रांना वनजमिनीचा दर्जा देत संरक्षित करण्यात आले होते.गंगेचे आईप्रमाणे संरक्षण होणे गरजेचे होते. मात्र, गंगा उत्त्पन्नाचे साधन झाले आहे. हे उत्त्पन्नाचे साधन गंगेच्या मुलामुलींसाठी नाही तर उद्योजकांच्या उद्योगासाठी आहे. हे सरकार गंगेशी अप्रमाणिक आहे. गंगेवरील प्रेमाचा केवळ देखावा केला जात आहे. याच देखाव्यामुळे गंगेची प्रकृती बिघडली आहे. आता प्रकृती बिघडण्याचा वेग आणखी वाढला आहे. हे थांबवायचे असेल तर सांघिक रूपाने उपाययोजना करण्याची गरज आहे. मूळ रोग शोधून उपचार करण्याची गरज आहे.आजघडीला गंगेची प्रकृती सुधारण्यासाठी कित्येक चिकित्सक तयार केले जात आहेत. मात्र, त्यांना रोगाचे मूळ समजत नसल्याचे चित्र आहे. आपल्या परीने रोगाचा इलाज करण्याचे काम सुरू असून, सरकारकडून मनमानी पद्धतीने याचा खर्च वसूल केला जात आहे.अशा प्रकारच्या उपाययोजनांमुळे गंगेची प्रकृती आणखी ढासळत आहे. गंगेची प्रकृती आणखीच ढासळत असून, सरकारी खजिनाही रिकामा होत आहे. गंगा शुद्ध करण्याच्या नावाखाली आपण तिची प्रकृती आणखी ढासळवत आहोत. यासाठी अघोरी उपाय थांबवले पाहिजेत आणि नव्याने पुन्हा उपाययोजना आखल्या पाहिजेत. ‘नमामी गंगा’ नावाखाली सुरू असलेला भ्रष्टाचार आणखी थांबवला पाहिजे आणि संसदेत ठोस कायदा बनविला पाहिजेत. हा मुद्दा २९ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या आणि १२ जानेवारी २०१९ पर्यंत चाललेल्या सभा, संमेलनातून मांडत मंजूर करण्यात आला आहे. २०११ साली गंगेच्या भक्तांनी कायद्याच्या मसुद्या संदर्भातील प्रती भारत सरकारला दिल्या होत्या. तेव्हापासून आजपर्यंत असे अनेक मसुदे तयार करण्यात आले. मात्र, सरकारची योजना मात्र ‘गंगा नमामी’सारख्या योजना आखत उत्त्पन्न कमविण्याचे साधन आहे.आईचा मान गंगेला मिळावा, अशी गंगेची इच्छा आहे. तिला उत्त्पन्नही नको आणि उपचारही नकोत. गंगेत खोदकाम करू नका. बांध बांधू नका. घाणेरड्या नाल्यांचे पाणी गंगेत सोडू नका. गंगेचे पाणी प्रदूषित करत पुन्हा गंगाजलाची चिकित्सा करणे म्हणजे गंगेचा अपमान आहे. उद्योग आणि शहरांमधील प्रदूषित पाणी गंगेत मिसळू नका. असे केले तर गंगा नक्कीच स्वच्छ होईल. गंगेला नैसर्गिक ठेवा. तिचा सन्मान करा. तिचे संरक्षण करा; हाच योग्य उपाय आहे. गंगेच्या किनारी शेती होती. संस्कृती होती; तेव्हा गंगेची प्रकृती ठीक होती. आता शेतीचा उद्योग झाला आहे. शेतीमधील रसायने गंगेच्या पाण्याला प्रदूषित करत आहेत.गंगेच्या सत्याग्रहींची हत्या होत आहे. त्यांचे अपहरण होत आहे. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. गंगेत नाल्याचे पाणी आणि औद्योगिक रसायने मिसळली जात आहेत. पर्यावरण रक्षणावरच घाला घातला जात आहे. विकासाच्या नावाखाली गंगेचे शोषण केले जात आहे. नावाड्यांचे रोजगार हरवले आहेत. हे लोक डुबत्याला आधार देत होते. पहिल्यांदा सरकार यांना संरक्षण देत होते. आता सरकार नावाड्यांना प्राधान्य देत नाही. मोठ्या कंपन्या सरकारचे संरक्षण घेत आहेत. सरकारी यंत्रांचा उपयोग उद्योगांच्या हितासाठी केला जातआहे.पुलांच्या चुकीच्या संरचनेमुळे गंगेचा प्रवाह बदलत आहेत. परिणामी लगतच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. गावांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाकडे पाहिलेही जात नाही. सरकारी कारखाने आपली राख गरम पाण्यात मिसळून नदीत टाकत आहे. परिणामी गंगेतील जैवविविधता नष्ट होत आहे.सातत्याने होत असलेला विकास नदीवर घाला घालत आहे. गंगेकिनारी होत असलेल्या बांधकामांमुळे पाण्याची पातळी वाढत आहे. परिणामी लगतचा परिसर पाण्याखाली जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कारखान्यांचे रसायनमिश्रित सांडपाणी गंगेत सोडले जात असल्याने जैवविविधता नष्ट होत आहे. मात्र, याकडे कोणीच लक्ष देत नसून, गंगेला वाचवायचे असल्यास ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.एकंदर वरवरचे उपाय करून चालणार नाही तर जलतज्ज्ञांचे म्हणणे लक्षात घ्यावे लागेल. नुसते लक्षात नाही तर समजावून घ्यावे लागेल आणि त्यानुसार उपाय करावे लागतील तरच गंगा साफ होईल.

टॅग्स :riverनदी