शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांची गांधीगिरी

By admin | Updated: August 18, 2016 06:25 IST

महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात काही आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन अहिंसेचा मार्ग पत्करण्याचा निश्चय केला

महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात काही आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन अहिंसेचा मार्ग पत्करण्याचा निश्चय केला असून वर्तमान काळातही गांधीजींचे शांती आणि अहिंसेचे तत्त्वज्ञान किती प्रासंगिक आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आणून दिली आहे. या ५६ नक्षलवाद्यांनी गांधीवादी विचारदर्शन परीक्षा अव्वल गुणांनी उत्तीर्ण करून सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. पुण्यातील आदर्श मित्र मंडळ आणि गडचिरोली पोलिसांनी संयुक्तपणे राबविलेल्या या उपक्रमांची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. अशाच एका आगळ्यावेगळ्या प्रयत्नांतर्गत अलीकडेच नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात बंदिवानांची त्यांच्या मुलाबाळांशी गळाभेट घडविण्यात आली होती. कुठलीही व्यक्ती जन्मजात गुन्हेगार नसते तर ती परिस्थितीचा बळी ठरत असते. मार्ग भरकटलेल्या अशा लोकाना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी निश्चितच मिळायला हवी आणि प्रशासनाकडून ती दिली जाते, हे अतिशय स्तुत्य आहे. देशापुढे आज नक्षलवादाचे फार मोठे आव्हान आहे. महाराष्ट्रासोबतच झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश ही राज्ये नक्षलवादाच्या विळख्यात सापडली आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासंदर्भात भिन्न मतप्रवाह असले तरी सशस्त्र कारवाईपेक्षा सामाजिक दृष्टिकोनातृून नक्षल चळवळ आटोक्यात आणता येऊ शकते यावरच सरकारचा अधिक विश्वास आहे. त्या अनुषंगाने २००५ साली राज्य सरकारने नक्षल आत्मसमर्पण योजना सुरू केली होती आणि त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. गेल्या ११ वर्षात जवळपास ६०० नक्षलवाद्यांनी नक्षल चळवळीचे सिद्धांत नाकारून सामान्य जीवन जगणे पसंत केले आहे. १९६७ साली पश्चिम बंगालच्या नक्षलबाडीतून एका विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी उदयास आलेली नक्षल चळवळ आता केवळ हिंसाचार आणि दहशत माजविण्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. या चळवळीत सामील होणारे बहुतांश तरुण हे नक्षल तत्त्वज्ञानापेक्षा त्यांचा पोषाख आणि बंदुकीच्या आकर्षणाने तिकडे वळत असल्याचे एका सर्वेक्षणात अधोरेखित झाले आहे. काही वेळेला बळजबरीने बंदुकीच्या धाकावर मुलामुलींना नक्षलवादात खेचले जाते. कालांतराने यापैकी अनेकांचा स्वप्नभंग होतो आणि आपल्याच लोकांच्या रक्तपाताने विचलित त्यांची मने नक्षल चळवळीतून बाहेर पडण्यासाठी धडपडू लागतात. अंध:कारमय वर्तमानातून प्रकाशमय भविष्याची आस धरणाऱ्या या नक्षलवाद्यांना मदतीचा हात पुढे करणे हे शासन आणि समाजाचेही कर्तव्य आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे साने गुरुजी म्हणत. नक्षल संकटातून मुक्तीचेही हेच गमक आहे.