शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

नक्षल्यांची गांधीगिरी

By admin | Updated: August 18, 2016 06:25 IST

महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात काही आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन अहिंसेचा मार्ग पत्करण्याचा निश्चय केला

महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात काही आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन अहिंसेचा मार्ग पत्करण्याचा निश्चय केला असून वर्तमान काळातही गांधीजींचे शांती आणि अहिंसेचे तत्त्वज्ञान किती प्रासंगिक आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आणून दिली आहे. या ५६ नक्षलवाद्यांनी गांधीवादी विचारदर्शन परीक्षा अव्वल गुणांनी उत्तीर्ण करून सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. पुण्यातील आदर्श मित्र मंडळ आणि गडचिरोली पोलिसांनी संयुक्तपणे राबविलेल्या या उपक्रमांची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. अशाच एका आगळ्यावेगळ्या प्रयत्नांतर्गत अलीकडेच नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात बंदिवानांची त्यांच्या मुलाबाळांशी गळाभेट घडविण्यात आली होती. कुठलीही व्यक्ती जन्मजात गुन्हेगार नसते तर ती परिस्थितीचा बळी ठरत असते. मार्ग भरकटलेल्या अशा लोकाना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी निश्चितच मिळायला हवी आणि प्रशासनाकडून ती दिली जाते, हे अतिशय स्तुत्य आहे. देशापुढे आज नक्षलवादाचे फार मोठे आव्हान आहे. महाराष्ट्रासोबतच झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश ही राज्ये नक्षलवादाच्या विळख्यात सापडली आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासंदर्भात भिन्न मतप्रवाह असले तरी सशस्त्र कारवाईपेक्षा सामाजिक दृष्टिकोनातृून नक्षल चळवळ आटोक्यात आणता येऊ शकते यावरच सरकारचा अधिक विश्वास आहे. त्या अनुषंगाने २००५ साली राज्य सरकारने नक्षल आत्मसमर्पण योजना सुरू केली होती आणि त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. गेल्या ११ वर्षात जवळपास ६०० नक्षलवाद्यांनी नक्षल चळवळीचे सिद्धांत नाकारून सामान्य जीवन जगणे पसंत केले आहे. १९६७ साली पश्चिम बंगालच्या नक्षलबाडीतून एका विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी उदयास आलेली नक्षल चळवळ आता केवळ हिंसाचार आणि दहशत माजविण्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. या चळवळीत सामील होणारे बहुतांश तरुण हे नक्षल तत्त्वज्ञानापेक्षा त्यांचा पोषाख आणि बंदुकीच्या आकर्षणाने तिकडे वळत असल्याचे एका सर्वेक्षणात अधोरेखित झाले आहे. काही वेळेला बळजबरीने बंदुकीच्या धाकावर मुलामुलींना नक्षलवादात खेचले जाते. कालांतराने यापैकी अनेकांचा स्वप्नभंग होतो आणि आपल्याच लोकांच्या रक्तपाताने विचलित त्यांची मने नक्षल चळवळीतून बाहेर पडण्यासाठी धडपडू लागतात. अंध:कारमय वर्तमानातून प्रकाशमय भविष्याची आस धरणाऱ्या या नक्षलवाद्यांना मदतीचा हात पुढे करणे हे शासन आणि समाजाचेही कर्तव्य आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे साने गुरुजी म्हणत. नक्षल संकटातून मुक्तीचेही हेच गमक आहे.