शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांची गांधीगिरी

By admin | Updated: August 18, 2016 06:25 IST

महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात काही आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन अहिंसेचा मार्ग पत्करण्याचा निश्चय केला

महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात काही आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन अहिंसेचा मार्ग पत्करण्याचा निश्चय केला असून वर्तमान काळातही गांधीजींचे शांती आणि अहिंसेचे तत्त्वज्ञान किती प्रासंगिक आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आणून दिली आहे. या ५६ नक्षलवाद्यांनी गांधीवादी विचारदर्शन परीक्षा अव्वल गुणांनी उत्तीर्ण करून सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. पुण्यातील आदर्श मित्र मंडळ आणि गडचिरोली पोलिसांनी संयुक्तपणे राबविलेल्या या उपक्रमांची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. अशाच एका आगळ्यावेगळ्या प्रयत्नांतर्गत अलीकडेच नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात बंदिवानांची त्यांच्या मुलाबाळांशी गळाभेट घडविण्यात आली होती. कुठलीही व्यक्ती जन्मजात गुन्हेगार नसते तर ती परिस्थितीचा बळी ठरत असते. मार्ग भरकटलेल्या अशा लोकाना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी निश्चितच मिळायला हवी आणि प्रशासनाकडून ती दिली जाते, हे अतिशय स्तुत्य आहे. देशापुढे आज नक्षलवादाचे फार मोठे आव्हान आहे. महाराष्ट्रासोबतच झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश ही राज्ये नक्षलवादाच्या विळख्यात सापडली आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासंदर्भात भिन्न मतप्रवाह असले तरी सशस्त्र कारवाईपेक्षा सामाजिक दृष्टिकोनातृून नक्षल चळवळ आटोक्यात आणता येऊ शकते यावरच सरकारचा अधिक विश्वास आहे. त्या अनुषंगाने २००५ साली राज्य सरकारने नक्षल आत्मसमर्पण योजना सुरू केली होती आणि त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. गेल्या ११ वर्षात जवळपास ६०० नक्षलवाद्यांनी नक्षल चळवळीचे सिद्धांत नाकारून सामान्य जीवन जगणे पसंत केले आहे. १९६७ साली पश्चिम बंगालच्या नक्षलबाडीतून एका विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी उदयास आलेली नक्षल चळवळ आता केवळ हिंसाचार आणि दहशत माजविण्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. या चळवळीत सामील होणारे बहुतांश तरुण हे नक्षल तत्त्वज्ञानापेक्षा त्यांचा पोषाख आणि बंदुकीच्या आकर्षणाने तिकडे वळत असल्याचे एका सर्वेक्षणात अधोरेखित झाले आहे. काही वेळेला बळजबरीने बंदुकीच्या धाकावर मुलामुलींना नक्षलवादात खेचले जाते. कालांतराने यापैकी अनेकांचा स्वप्नभंग होतो आणि आपल्याच लोकांच्या रक्तपाताने विचलित त्यांची मने नक्षल चळवळीतून बाहेर पडण्यासाठी धडपडू लागतात. अंध:कारमय वर्तमानातून प्रकाशमय भविष्याची आस धरणाऱ्या या नक्षलवाद्यांना मदतीचा हात पुढे करणे हे शासन आणि समाजाचेही कर्तव्य आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे साने गुरुजी म्हणत. नक्षल संकटातून मुक्तीचेही हेच गमक आहे.