शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

गणराया, तुझ्या उत्साहाला जबाबदारीचे कोंदण मिळेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 16:07 IST

मातीच्या छोट्या गणेशमूर्तीची पूजा, घरगुती विसर्जन, दिवाळीत फटाके न उडविणे.. हा सुखद बदल आहे. अशा बदलांना सरकारने अधिक वेग दिला पाहिजे.

गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त करण्याची घोषणा एकनाथ शिंदे सरकारने केल्यामुळे यंदा सगळेच सण दणक्यात साजरे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातही गणेशोत्सवाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कारण गणेशोत्सवाला अलीकडच्या काळात लाभलेली राजकीय परिमाणे! सार्वजनिक लोकमताला बांध घालून आपल्या राजकीय हितसंबंधांना बाधा आणणे राज्यकर्त्यांना परवडत नाही. आजच्या आधुनिक ‘इव्हेंन्टी उत्सवा’बाबत कोणी काही आक्षेप नोंदवला की रूढी, परंपरा, धार्मिक अस्मितांचे मुद्दे अकारण  प्रतिष्ठेचे करून तोंडे बंद केली जातात. त्यामुळे परंपरांमधील वैविध्य हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य असले तरी तेच आता दुखणे बनले असल्याचे अलीकडच्या अनेक धार्मिक उत्सवांतून दिसून येत आहे. हे सारे बघितले की प्रश्न पडतो की, आपण परंपरा, संस्कृती, धार्मिक अस्मितांचे वारसदार आहोत की भारवाहक? न्यायालयाने उत्सवा दरम्यानच्या आवाजाबाबत काही मार्गदर्शक तत्त्वांची संहिता जारी केली असली, तरी न्यायालयाच्या आदेशाची वासलात लावण्याचे काम कथित उत्सवप्रेमी सतत करत असतात. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गेल्या काही वर्षांत समाजप्रबोधनाची व सांस्कृतिक संवर्धनाची  रूळलेली वाट सोडून इव्हेंन्टीकरणाची वाट धरलेली दिसते. काही सन्मान्य अपवाद वगळता सार्वजनिक उत्सवांना मनुष्य शक्तीच्या सार्वजनिक अपव्ययाचे व निरूद्देश शक्तिप्रदर्शनाचे रूप प्राप्त झाले आहे.  

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तेव्हाच टिळकांच्या या कृतीवर आगरकरांनी ‘गणपतीला रस्त्यांवर आणू नका’, अशा कडक शब्दांत टीका केली होती. ही भीती आता सर्वच सण, उत्सवांबाबत खरी ठरू लागली आहे. गेल्या काही वर्षांत गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेपासून विसर्जनापर्यंत, वीकेंडपासून पिकनिकपर्यंत, घरगुती कार्यक्रमांपासून ते सार्वजनिक उपक्रमांपर्यंत आणि वाढदिवसापासून ते अंत्ययात्रांपर्यंत उन्मादाची कमान चढत चालली आहे आणि विवेकाचा आवाज क्षीण होत चालला आहे. उन्माद हे व्यक्तीचे नव्हे तर समाजाचे लक्षण बनू लागले आहे. उत्सव म्हणजे बेमुर्वत उन्माद दाखविण्याची संधी वाटू लागली आहे.  या सर्वधर्मीय उन्मादी सण-उत्सवांना लगाम घालण्याचे काम मागील दोन वर्षात निसर्गानेच हाती घेतले होते. कोरोनाच्या महामारीमुळे रस्त्यावरच्या उत्सवाचे आणि उत्साहाचे प्रदर्शन  अपरिहार्यपणे रोखावे लागले. त्याही आधीपासून पर्यावरणासाठी काम करणाऱ्या जाणत्या नागरिकांनी लोकप्रिय उत्सवांमध्ये शिरलेल्या अनिष्ट वृत्ती आणि प्रथांबाबत लोकजागराचे काम सुरू केले; त्याला चांगले यश येताना दिसते आहे. मातीच्या छोट्या मूर्तीची पूजा, घरगुती विसर्जन, दिवाळीत फटाके उडवणार नाही, अशा शपथा घेऊन त्या पाळणारी मुले हे एका सुखद बदलाचे चित्र आहे. समाजात स्वयंस्फूर्तीने होत असलेल्या अशा  बदलांना अधिक वेग देण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. अशा बदलांच्या मागे सरकारनेही आपले पाठबळ उभे केले पाहिजे. लोकानुनयाच्या मागे जाणे सरकारने निदान काही बाबतीत तरी टाळायला हवे. उत्सव - मग ते कोणत्याही धर्माचे असोत, उत्साहानेच साजरे व्हावेत याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. फक्त त्या उत्साहाच्या लाटेत विवेक हरवणार नाही, याची काळजी आपण सर्वांनीच घ्यायला हवी! आनंद आणि उत्साहाला जबाबदारीचे कोंदण देण्याची ‘सुवर्णसंधी’ आपणास प्राप्त झाली आहे, ती दवडता कामा नये. 

- बाळकृष्ण शिंदे, पुणे

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणेशोत्सव