शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

दहशतवादावरील असा तोडगा हा विस्तवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 03:56 IST

भारतीय पोलीस सेवेत दाखल होणा-या नव्या प्रशिक्षणार्थी अधिका-यांचा दीक्षांत समारंभ नुकताच हैद्राबाद येथील सरदार पटेल अकादमीत झाला. या समारंभात बोलताना राजनाथ सिंह यांनी अशी ग्वाही दिली आहे की, येत्या पाच वर्षांत देशातील दहशतवाद, नक्षलवादी कारवाया संपून जाणार आहेत.

- प्रकाश बाळ(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)भारतीय पोलीस सेवेत दाखल होणा-या नव्या प्रशिक्षणार्थी अधिका-यांचा दीक्षांत समारंभ नुकताच हैद्राबाद येथील सरदार पटेल अकादमीत झाला. या समारंभात बोलताना राजनाथ सिंह यांनी अशी ग्वाही दिली आहे की, येत्या पाच वर्षांत देशातील दहशतवाद, नक्षलवादी कारवाया संपून जाणार आहेत. त्या दृष्टीनं काश्मीर, ईशान्य भारतात सरकार पावलं टाकत आहे, असा निर्वाळाही त्यांनी दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री पदावर बसलेल्या राजनाथ सिंह यांनी बोलून दाखवलेल्या या आशावादातून काय सूचित होतं?प्रथम काश्मीरचाच मुद्दा घेऊ या. काश्मीरमधील दहशतवादाचा कणा मोडला आहे, असा दावा सरकार करीत आहे. त्यामुळं आता तेथे संवादाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी गुप्तहेर खात्याच्या माजी प्रमुखाची नेमणूक केली आहे. या नव्या संवाद प्रक्रियेमुळं विकास कामावर भर देण्याजोगी परिस्थिती निर्माण होईल आणि त्यात स्थानिक काश्मिरींचा सहभाग वाढत जाईल. त्यामुळं अंतिमत: दहशतवादाला काश्मीर खोºयात पाय रोवता येणं अशक्य बनेल, अशी सध्याच्या केंद्र सरकारची भूमिका आहे.पहिली गोष्ट म्हणजे काश्मीर खोºयात संवादाची प्रक्रिया काही पहिल्यांदाच सुरू होत आहे असं नव्हे. या आधी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात प्रख्यात दिवंगत पत्रकार दिलीप पाडगावकर व इतर दोघा सदस्यांच्या समितीनं दीड वर्षे काश्मिरी समाजातील विविध गटांशी संवाद साधून एक अहवाल सरकारला दिला होता. काश्मिरी जनतेची ‘स्वायत्त’तेची जी मागणी आहे, ती राज्यघटनेच्या चौकटीत कशी व कितपत पुरी करता येऊ शकते, याचा विचार करणं गरजेचं आहे, अशी या समितीची प्रमुख शिफारस होती. त्यावेळच्या सरकारनं हा अहवाल बासनात बांधून ठेवला. आता गुप्तहेर खात्याच्या माजी संचालकांची नेमणूक करून नव्यानं जी संवाद प्रक्रिया सुरू केली जात आहे, त्यात ‘सर्वांशी सर्व मुद्यावर चर्चा केली जाईल’, असं जाहीर केलं गेलं आहे. पण प्रत्यक्षात तशी शक्यता अजिबातच नाही, हे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ताज्या विधानावरून अगदी सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट झालं आहे. काश्मीरमध्ये खरा मुद्दा आहे, तो स्वायत्ततेचाच, अशी प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री व गृहमंत्री पी. चिदंबदरम यांनी व्यक्त केली होती. अर्थात पाडगावकर समितीनं दिलेल्या अहवालाच्या आधारेच हे विधान चिदंबरम यांनी केलं, हे उघडच आहे. तरीही तुम्ही हा अहवाल अंमलात आणण्याच्या दृष्टीनं का प्रयत्न केले नाहीत आणि आता का आक्षेप घेता, असा प्रश्न चिदंबरम यांना विचारला गेलाच पाहिजे. तसा तो विचारला गेला नाही, याचं कारण म्हणजे आपल्या देशातील प्रसार माध्यमांची सध्याची अवस्था हे आहे. मात्र चिदंबरम व संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारनं पाडगावकर समितीचा अहवाल बासनात बांधून ठेवला. कारण ‘काश्मीरला स्वायत्तता’ हा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मामला होता व आजही आहे. याचं खरं कारण, काश्मिरी जनता व तेथील नेते आणि भारतीय जनता व येथील नेते यांच्या समजुतीत असलेली मूलभूत विसंगती हेच आहे. काश्मीर भारतात विलीन झालं, असं आपण मानत आलो आहोत, तर ‘आम्ही काही अटींवर भारतात सामील झालो’, असं काश्मिरी जनता व तेथील नेते मानत आले आहेत. काश्मीरमधील प्रश्न हा ‘अस्मिते’चा आहे. असाच अस्मितेचा प्रश्न देशाच्या इतर अनेक भागात आहे. मात्र काश्मीरमधील अस्मितेचा जो प्रश्न आहे, त्याचं एक अंग हे फाळणीशी निगडित आहे. त्यामुळं त्याला धर्माचा रंग चढला आहे. तसा तो ईशान्येत वा देशातील इतर भागात नाही.हा जो अस्मितेचा मुद्दा आहे त्यावर विकास वा रोजगार अथवा नोकºया हा तोडगा नाही. भारत हा विविध प्रादेशिक अस्मितांचा मिळून बनलेला एक ‘देश’ आहे. त्याच्या या बहुविधतेतून ‘एकात्मता’ (युनिटी) तयार केली जाण्याची प्रक्रिया पुरी झालेली नाही. उलट भाजपा जी विचारसरणी मानतो, त्यात या प्रकारच्या ‘एकात्मते’ऐवजी ‘एकसाचीकरणा’वर (युनिफॉर्मिटी) भर आहे.राजनाथ सिंह जेव्हा सांगतात की आम्ही येत्या पाच वर्षात दहशतवाद, नक्षलवाद संपवून टाकू, तेव्हा ते लष्कर व सुरक्षा दलालांच्या बळावर या ‘अस्मिते’च्या अंगाराला जे हिंसक वळण मिळत गेलं आहे, ते निपटण्यात येईल, असं सुचवत असतात. भारतीयत्वाचा जो आशय आहे त्याच्याशी पूर्णत: विपरीत अशी ही भूमिका आहे.प्रत्यक्षात अशा ‘बळा’च्या आधारे ‘अस्मिते’चे अंगारे फुलून त्याची अभिव्यक्ती ज्या हिंसाचारात होते तो कधीच बळाच्या आधारे मोडून काढता येत नाही. जगभर पॅलेस्टिनपासून अगदी कालपरवाच्या कुर्दिश अथवा आता अस्मितेचे अंगार फुलून स्पेनमधील कॅटालोनिया प्रांतातील ताज्या पेचप्रसंगापर्यंत अनेक घटनांनी हे सिद्ध केलं आहे. त्यामुळे ‘अस्मिते’ला उत्तर हे विकास व लष्करी बळ कधीच नसतं. खरा तोडगा असतो तो अशा अस्मितांना सामावून घेण्याचा. तोच भाजपाला व त्याच्या मागं असलेल्या राष्टÑीय स्वयंसेवक संघाला मान्य नाही. म्हणूनच येत्या पाच वर्षांत देशातील दहशतवाद, नक्षलवादी कारवाया संपुष्टात येतील’ अशी ग्वाही गृहमंत्रिपदी बसलेल्या राजनाथ सिंह यांनी देणं, याचा अर्थ देशातील विविध अस्मिता सामावून घेण्याऐवजी त्यांना ‘एकसाची’ चौकटीत कोंबून टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, असाच आहे.हा विस्तवाशी खेळ आहे आणि त्यातून कायमस्वरूपी सामाजिक अशांतता व अस्थिरता निर्माण होण्याचा धोका आहे.

टॅग्स :Terrorismदहशतवाद