शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

भारनियमनाचा ‘खेळ’, उद्योजक आणि शेतकरी भरडून निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:56 IST

भीषण वीजटंचाईमुळे राज्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणावर भारनियमन सुरू झाल्याने सामान्य नागरिक, उद्योजक आणि शेतकरी असे सारेचजण भरडून निघणार आहेत.

भीषण वीजटंचाईमुळे राज्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणावर भारनियमन सुरू झाल्याने सामान्य नागरिक, उद्योजक आणि शेतकरी असे सारेचजण भरडून निघणार आहेत. या भारनियमनामुळे शहरी भागात तीन तास आणि ग्रामीण भागात नऊ तासापर्यंत सध्या भारनियमन करण्यात येत आहे. ग्रामीण भागात तर वर्षभर भारनियमन सुरू असते. त्यामुळे या भारनियमनाबाबत नवलाई राहिलेली नाही. ज्या दिवशी वीज असते त्या दिवशी खेड्यात दिवाळी असते. एकीकडे शेतक-यांना सरकारने कर्जमाफी जाहीर केली. यावर्षी विदर्भात समाधानकारक पाऊस झाला नाही. दुसरीकडे कृषिपंपांना वीजपुरवठा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण आता कृषिपंपांचाच वीजपुरवठा भारनियमनामुळे खंडित होणार असल्यामुळे खरीप व रब्बी पिके संकटात सापडणार आहेत. महावितरण आणि महानिर्मिती या दोन वीज कंपन्यांमधील निष्काळजीपणा या भीषण संकटाला सर्वस्वी कारणीभूत आहे. राज्यातील ३० औष्णिक केंद्रापैकी १३ युनिट सध्या बंद आहेत. त्यामागे कोळशाचा तुटवडा हे कारण असले तरी या कंपन्यांमधील समन्वयाचा अभाव हेही एक प्रमुख कारण आहे. उरण येथून रिलायन्सच्या माध्यमातून महानिर्मितीला गॅसपुरवठा होतो. परंतु, या गॅसचे दर अवाढव्य वाढवल्याने स्वाभाविकच महानिर्मितीने या प्रकल्पातील वीजेच्या उत्पादनात हात आखडता घेतला आहे. महाजेनकोने कोळशाची कमतरता हे एक कारण समोर केले आहे. ते खरेही आहे. परंतु,पावसाळ््यात कोळसा ओला होत असेल तर याला दोषी कोण? महाजेनकोने तशी पूर्व खबरदारी का घेतली नाही, हा गंभीर प्रश्नसुद्धा यानिमित्ताने पुढे आला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात वीज सरप्लस असल्याचा दावा काही दिवसापूर्वीच केला होता. पण या वीज कंपन्यांनी आपल्या ऊर्जामंत्र्यांनाच तोंडघशी पाडले आहे. विदर्भ सध्या विविध कारणांनी संकटग्रस्त आहे. कीटकनाशक फवारणीने शेतकºयांचे बळी जात आहेत. दुसरीकडे विजेअभावी शेतपिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. वीजेची ही समस्या कायम राहिल्यास शेतकºयांचा रब्बी हंगामही संकटात येण्याची शक्यता आहे. स्वाईन फ्लू, डेंग्यूने थैमान घातले आहे आणि आता हे वीजेचे संकट ओढवले आहे. मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांच्या नागपुरात आठ वर्षानंतर पहिल्यांदाच ‘बत्ती गूल’ होणार आहे. हे या दोघांसाठीही फार भूषणावह नाही. दिवाळीपूर्वी या भारनियमनाच्या संकटातून राज्याला मुक्त करून सामान्य माणूस, उद्योजक आणि शेतक-यांची दिवाळी ख-या अर्थाने आनंददायी करावी, हीच जनतेची अपेक्षा आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी