शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

भारनियमनाचा ‘खेळ’, उद्योजक आणि शेतकरी भरडून निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:56 IST

भीषण वीजटंचाईमुळे राज्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणावर भारनियमन सुरू झाल्याने सामान्य नागरिक, उद्योजक आणि शेतकरी असे सारेचजण भरडून निघणार आहेत.

भीषण वीजटंचाईमुळे राज्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणावर भारनियमन सुरू झाल्याने सामान्य नागरिक, उद्योजक आणि शेतकरी असे सारेचजण भरडून निघणार आहेत. या भारनियमनामुळे शहरी भागात तीन तास आणि ग्रामीण भागात नऊ तासापर्यंत सध्या भारनियमन करण्यात येत आहे. ग्रामीण भागात तर वर्षभर भारनियमन सुरू असते. त्यामुळे या भारनियमनाबाबत नवलाई राहिलेली नाही. ज्या दिवशी वीज असते त्या दिवशी खेड्यात दिवाळी असते. एकीकडे शेतक-यांना सरकारने कर्जमाफी जाहीर केली. यावर्षी विदर्भात समाधानकारक पाऊस झाला नाही. दुसरीकडे कृषिपंपांना वीजपुरवठा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण आता कृषिपंपांचाच वीजपुरवठा भारनियमनामुळे खंडित होणार असल्यामुळे खरीप व रब्बी पिके संकटात सापडणार आहेत. महावितरण आणि महानिर्मिती या दोन वीज कंपन्यांमधील निष्काळजीपणा या भीषण संकटाला सर्वस्वी कारणीभूत आहे. राज्यातील ३० औष्णिक केंद्रापैकी १३ युनिट सध्या बंद आहेत. त्यामागे कोळशाचा तुटवडा हे कारण असले तरी या कंपन्यांमधील समन्वयाचा अभाव हेही एक प्रमुख कारण आहे. उरण येथून रिलायन्सच्या माध्यमातून महानिर्मितीला गॅसपुरवठा होतो. परंतु, या गॅसचे दर अवाढव्य वाढवल्याने स्वाभाविकच महानिर्मितीने या प्रकल्पातील वीजेच्या उत्पादनात हात आखडता घेतला आहे. महाजेनकोने कोळशाची कमतरता हे एक कारण समोर केले आहे. ते खरेही आहे. परंतु,पावसाळ््यात कोळसा ओला होत असेल तर याला दोषी कोण? महाजेनकोने तशी पूर्व खबरदारी का घेतली नाही, हा गंभीर प्रश्नसुद्धा यानिमित्ताने पुढे आला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात वीज सरप्लस असल्याचा दावा काही दिवसापूर्वीच केला होता. पण या वीज कंपन्यांनी आपल्या ऊर्जामंत्र्यांनाच तोंडघशी पाडले आहे. विदर्भ सध्या विविध कारणांनी संकटग्रस्त आहे. कीटकनाशक फवारणीने शेतकºयांचे बळी जात आहेत. दुसरीकडे विजेअभावी शेतपिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. वीजेची ही समस्या कायम राहिल्यास शेतकºयांचा रब्बी हंगामही संकटात येण्याची शक्यता आहे. स्वाईन फ्लू, डेंग्यूने थैमान घातले आहे आणि आता हे वीजेचे संकट ओढवले आहे. मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांच्या नागपुरात आठ वर्षानंतर पहिल्यांदाच ‘बत्ती गूल’ होणार आहे. हे या दोघांसाठीही फार भूषणावह नाही. दिवाळीपूर्वी या भारनियमनाच्या संकटातून राज्याला मुक्त करून सामान्य माणूस, उद्योजक आणि शेतक-यांची दिवाळी ख-या अर्थाने आनंददायी करावी, हीच जनतेची अपेक्षा आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी