शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
4
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
5
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
6
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
7
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
8
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
9
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
10
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
11
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
12
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
13
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
14
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
15
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
16
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
17
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
18
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
19
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
20
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'

भारनियमनाचा ‘खेळ’, उद्योजक आणि शेतकरी भरडून निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:56 IST

भीषण वीजटंचाईमुळे राज्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणावर भारनियमन सुरू झाल्याने सामान्य नागरिक, उद्योजक आणि शेतकरी असे सारेचजण भरडून निघणार आहेत.

भीषण वीजटंचाईमुळे राज्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणावर भारनियमन सुरू झाल्याने सामान्य नागरिक, उद्योजक आणि शेतकरी असे सारेचजण भरडून निघणार आहेत. या भारनियमनामुळे शहरी भागात तीन तास आणि ग्रामीण भागात नऊ तासापर्यंत सध्या भारनियमन करण्यात येत आहे. ग्रामीण भागात तर वर्षभर भारनियमन सुरू असते. त्यामुळे या भारनियमनाबाबत नवलाई राहिलेली नाही. ज्या दिवशी वीज असते त्या दिवशी खेड्यात दिवाळी असते. एकीकडे शेतक-यांना सरकारने कर्जमाफी जाहीर केली. यावर्षी विदर्भात समाधानकारक पाऊस झाला नाही. दुसरीकडे कृषिपंपांना वीजपुरवठा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण आता कृषिपंपांचाच वीजपुरवठा भारनियमनामुळे खंडित होणार असल्यामुळे खरीप व रब्बी पिके संकटात सापडणार आहेत. महावितरण आणि महानिर्मिती या दोन वीज कंपन्यांमधील निष्काळजीपणा या भीषण संकटाला सर्वस्वी कारणीभूत आहे. राज्यातील ३० औष्णिक केंद्रापैकी १३ युनिट सध्या बंद आहेत. त्यामागे कोळशाचा तुटवडा हे कारण असले तरी या कंपन्यांमधील समन्वयाचा अभाव हेही एक प्रमुख कारण आहे. उरण येथून रिलायन्सच्या माध्यमातून महानिर्मितीला गॅसपुरवठा होतो. परंतु, या गॅसचे दर अवाढव्य वाढवल्याने स्वाभाविकच महानिर्मितीने या प्रकल्पातील वीजेच्या उत्पादनात हात आखडता घेतला आहे. महाजेनकोने कोळशाची कमतरता हे एक कारण समोर केले आहे. ते खरेही आहे. परंतु,पावसाळ््यात कोळसा ओला होत असेल तर याला दोषी कोण? महाजेनकोने तशी पूर्व खबरदारी का घेतली नाही, हा गंभीर प्रश्नसुद्धा यानिमित्ताने पुढे आला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात वीज सरप्लस असल्याचा दावा काही दिवसापूर्वीच केला होता. पण या वीज कंपन्यांनी आपल्या ऊर्जामंत्र्यांनाच तोंडघशी पाडले आहे. विदर्भ सध्या विविध कारणांनी संकटग्रस्त आहे. कीटकनाशक फवारणीने शेतकºयांचे बळी जात आहेत. दुसरीकडे विजेअभावी शेतपिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. वीजेची ही समस्या कायम राहिल्यास शेतकºयांचा रब्बी हंगामही संकटात येण्याची शक्यता आहे. स्वाईन फ्लू, डेंग्यूने थैमान घातले आहे आणि आता हे वीजेचे संकट ओढवले आहे. मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांच्या नागपुरात आठ वर्षानंतर पहिल्यांदाच ‘बत्ती गूल’ होणार आहे. हे या दोघांसाठीही फार भूषणावह नाही. दिवाळीपूर्वी या भारनियमनाच्या संकटातून राज्याला मुक्त करून सामान्य माणूस, उद्योजक आणि शेतक-यांची दिवाळी ख-या अर्थाने आनंददायी करावी, हीच जनतेची अपेक्षा आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी