शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 04:56 IST

केंद्र आणि राज्य सरकारचे स्पष्ट नियम असतानाही रिक्षा, टॅक्सी, व्हॅनसारख्या १२ पेक्षा कमी आसने असलेल्या वाहनांनाही स्कूल बसचा परवाना दिल्याचे प्रकरण म्हणजे परिवहन विभागाने आपल्याच नियमांचा गळा घोटून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारचे स्पष्ट नियम असतानाही रिक्षा, टॅक्सी, व्हॅनसारख्या १२ पेक्षा कमी आसने असलेल्या वाहनांनाही स्कूल बसचा परवाना दिल्याचे प्रकरण म्हणजे परिवहन विभागाने आपल्याच नियमांचा गळा घोटून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. मुंबईत एकट्या अंधेरी परिसरात अशा २५ हजारांहून अधिक रिक्षा विद्यार्थ्यांची वाहतूक करीत आहेत. गेल्या आठवड्यात ‘लोकमत’नेही ठाण्यात प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांत क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कसे कोंबून नेले जाते, त्याचे धडधडीत पुरावे दिले होते. १२ पेक्षा कमी आसनक्षमता असलेल्या वाहनांना स्कूल बस म्हणून परवानगी देऊ नये, असा राज्याचा; तर १३ आसनक्षमतेचा केंद्राचा नियम आहे. गेल्या दशकात पनवेलमध्ये स्कूल बसला आणि मुंबईत बेकायदा वाहतूक करणाऱ्या व्हॅनला लागलेल्या आगीत विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने नियम करण्यात आले. पण त्यालाही कसा फाटा दिला जातो, त्याचे उदाहरण पालक-शिक्षक संघटनेच्या याचिकेमुळे समोर आले. अंधेरीतील रिक्षांना स्कूल बसचा परवाना देण्यामागे परिवहन विभागातील अधिकाºयांचे रॅकेट असून हा त्यांचा पर्यायी व्यवसाय आहे आणि कारवाईच्या वेळी ते व्हॅन, रिक्षांच्या पाठीशी उभे राहतात, हेही न्यायालयात उघड झाले. विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक या एकमेव मुद्द्याला प्राधान्य देण्याऐवजी त्यातूनही धंदा पाहण्याच्या वृत्तीमुळे बसचा रंग, आपत्कालीन दरवाजे, तातडीच्या उपचाराची साधने, क्लीनर आणि बसमध्ये मुली असतील तर त्यांच्या सुरक्षेसाठी महिला कर्मचारी ठेवण्यासारख्या मुद्द्यांना वेळोवेळी प्रचंड विरोध झाला; आणि दरवेळी न्यायालयाला हस्तक्षेप करून, समज देऊन, प्रसंगी कठोर इशारे देत हे नियम अंमलात आणावे लागले. आताही दरवर्षी दरवाढीचा मुद्दा याच पद्धतीने समोर येतो आणि अकारण विद्यार्थी, पालक वेठीला धरले जातात. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे परिवहन विभागाला एवढेच वावडे असेल; तर त्यांनी एकदा त्याबाबतची भूमिका स्पष्ट करावी. म्हणजे त्यासाठी तसा लढा तरी देता येईल. पण मे महिन्यात न्यायालयात दिलेल्या माहितीपेक्षा उफराटी स्थिती जर तीनच महिन्यांत समोर येणार असेल, तर परिवहन विभागाच्या कारभारातील सावळ्यागोंधळाची कल्पना केलेली बरी. परवडणारे वाहन म्हणून जरी रिक्षा, टॅक्सी, व्हॅनचे समर्थन केले जात असले तरी त्यांच्या आणि बसच्या खर्चात फारशी तफावत नाही. विद्यार्थ्यांच्या जिवाची सुरक्षा हा एकमेव निकष लावला तर मोठ्या वाहनांचा आग्रह का धरला जातो, ते स्पष्ट होईल. पण नियमांच्या अंमलबजावणीतही सुरक्षेपेक्षा धंदा पाहिला जात असेल तर नियम कसे फिरवले जातात याची उदाहरणे या याचिकेमुळे समोर आली. त्यात जेवढ्या लवकर सुधारणा होईल, तेवढे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे.

टॅग्स :Schoolशाळा