शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 04:56 IST

केंद्र आणि राज्य सरकारचे स्पष्ट नियम असतानाही रिक्षा, टॅक्सी, व्हॅनसारख्या १२ पेक्षा कमी आसने असलेल्या वाहनांनाही स्कूल बसचा परवाना दिल्याचे प्रकरण म्हणजे परिवहन विभागाने आपल्याच नियमांचा गळा घोटून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारचे स्पष्ट नियम असतानाही रिक्षा, टॅक्सी, व्हॅनसारख्या १२ पेक्षा कमी आसने असलेल्या वाहनांनाही स्कूल बसचा परवाना दिल्याचे प्रकरण म्हणजे परिवहन विभागाने आपल्याच नियमांचा गळा घोटून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. मुंबईत एकट्या अंधेरी परिसरात अशा २५ हजारांहून अधिक रिक्षा विद्यार्थ्यांची वाहतूक करीत आहेत. गेल्या आठवड्यात ‘लोकमत’नेही ठाण्यात प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांत क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कसे कोंबून नेले जाते, त्याचे धडधडीत पुरावे दिले होते. १२ पेक्षा कमी आसनक्षमता असलेल्या वाहनांना स्कूल बस म्हणून परवानगी देऊ नये, असा राज्याचा; तर १३ आसनक्षमतेचा केंद्राचा नियम आहे. गेल्या दशकात पनवेलमध्ये स्कूल बसला आणि मुंबईत बेकायदा वाहतूक करणाऱ्या व्हॅनला लागलेल्या आगीत विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने नियम करण्यात आले. पण त्यालाही कसा फाटा दिला जातो, त्याचे उदाहरण पालक-शिक्षक संघटनेच्या याचिकेमुळे समोर आले. अंधेरीतील रिक्षांना स्कूल बसचा परवाना देण्यामागे परिवहन विभागातील अधिकाºयांचे रॅकेट असून हा त्यांचा पर्यायी व्यवसाय आहे आणि कारवाईच्या वेळी ते व्हॅन, रिक्षांच्या पाठीशी उभे राहतात, हेही न्यायालयात उघड झाले. विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक या एकमेव मुद्द्याला प्राधान्य देण्याऐवजी त्यातूनही धंदा पाहण्याच्या वृत्तीमुळे बसचा रंग, आपत्कालीन दरवाजे, तातडीच्या उपचाराची साधने, क्लीनर आणि बसमध्ये मुली असतील तर त्यांच्या सुरक्षेसाठी महिला कर्मचारी ठेवण्यासारख्या मुद्द्यांना वेळोवेळी प्रचंड विरोध झाला; आणि दरवेळी न्यायालयाला हस्तक्षेप करून, समज देऊन, प्रसंगी कठोर इशारे देत हे नियम अंमलात आणावे लागले. आताही दरवर्षी दरवाढीचा मुद्दा याच पद्धतीने समोर येतो आणि अकारण विद्यार्थी, पालक वेठीला धरले जातात. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे परिवहन विभागाला एवढेच वावडे असेल; तर त्यांनी एकदा त्याबाबतची भूमिका स्पष्ट करावी. म्हणजे त्यासाठी तसा लढा तरी देता येईल. पण मे महिन्यात न्यायालयात दिलेल्या माहितीपेक्षा उफराटी स्थिती जर तीनच महिन्यांत समोर येणार असेल, तर परिवहन विभागाच्या कारभारातील सावळ्यागोंधळाची कल्पना केलेली बरी. परवडणारे वाहन म्हणून जरी रिक्षा, टॅक्सी, व्हॅनचे समर्थन केले जात असले तरी त्यांच्या आणि बसच्या खर्चात फारशी तफावत नाही. विद्यार्थ्यांच्या जिवाची सुरक्षा हा एकमेव निकष लावला तर मोठ्या वाहनांचा आग्रह का धरला जातो, ते स्पष्ट होईल. पण नियमांच्या अंमलबजावणीतही सुरक्षेपेक्षा धंदा पाहिला जात असेल तर नियम कसे फिरवले जातात याची उदाहरणे या याचिकेमुळे समोर आली. त्यात जेवढ्या लवकर सुधारणा होईल, तेवढे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे.

टॅग्स :Schoolशाळा