शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

मोर्चे, मिरवणुका आणि शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 03:50 IST

सन १९६० साली मुंबईसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आधीच्या काही दशकांतील स्वातंत्र्य लढे आणि पन्नाशीच्या दशकातील मुंबईसाठी झालेली चळवळ इतिहासजमा झाली. राज्य काहीसे स्थिरस्थावर झाले तरी मुंबई मात्र शांत झाली नाही. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे राज्यातल्या नागरिकांच्या अपेक्षांना धुमारे फुटायला लागले.

-सुलक्षणा महाजनसन १९६० साली मुंबईसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आधीच्या काही दशकांतील स्वातंत्र्य लढे आणि पन्नाशीच्या दशकातील मुंबईसाठी झालेली चळवळ इतिहासजमा झाली. राज्य काहीसे स्थिरस्थावर झाले तरी मुंबई मात्र शांत झाली नाही. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे राज्यातल्या नागरिकांच्या अपेक्षांना धुमारे फुटायला लागले. सरकारदरबारी नानाविध कामांसाठी, गाºहाणी मांडण्यासाठी, संघटित होऊन मागण्या करण्यासाठी मुंबईला येऊन धडकू लागले. राजधानी मुंबई म्हणजे मोठा राजकीय मंच झाला. प्रेक्षकांची कमतरता येथे कधीच नव्हती. साठ-सत्तरच्या दशकात जवळजवळ रोज कोणाचे ना कोणाचे मोर्चे सचिवालयावर, म्हणजेच आताच्या मंत्रालयावर येऊन धडकत. मोर्चातील बाया-माणसांची गर्दी, त्यांच्या हातातील लाल, निळे, भगवे झेंडे, फलक, मेगाफोन आणि त्यातून दिल्या जाणाºया घोषणा, त्याला मिळणारे प्रतिसाद, आजूबाजूचा पोलिसांचा बंदोबस्त या सर्व गोष्टी सरकारपेक्षा नागरिकांचेच लक्ष वेधून घेत असत. प्रेक्षक म्हणून आणि पुढे क्वचित प्रसंगी मोर्चात सामील झाल्यावर त्यातील वणवण, तयारी, मोर्चेबांधणी किती कष्टाची असते हे लक्षात आले. त्याचे फलित किती आणि कोणाला मिळे कोणास ठाऊक. काही काळानंतर त्यातील उत्स्फूर्तता बहुतेक कमी कमी होत गेली आणि आता असे मोर्चे दक्षिण मुंबईमध्ये क्वचितच बघायला मिळतात.मुंबई आता इतकी अस्ताव्यस्त पसरली आहे की दक्षिण मुंबईत मंत्रालयावर मोर्चे नेणे व्यावहारिक राहिले नसावे. त्यातच ध्वनिप्रदूषणाच्या याचिकेचे निमित्त होऊन उच्च न्यायालयाने मेगाफोनबंदी अमलात आणली. रोजच्या आवाजी मोर्चांमुळे न्यायाधीशांना कोणाचे काही ऐकून घेणे, काम करणे अशक्य झाले होते, हे खरे त्यामागचे कारण होते. नंतर आझाद मैदानापुढे मिरवणूक नेण्यास शासनाने मज्जाव केला. मुंबईचे व्यवस्थापन करणे शासनाला जसे अवघड झाले आहे तसेच विरोधकांना मोर्चेबांधणी करणेही अवघड झाले आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचे साठ सालातील संघटित स्वरूप आता विस्कळीत झाले आहे. त्यामुळेच वेगळे होण्याची मनीषा केवळ राज्यातच नाही तर मुंबईतही व्यक्त होत असावी. पन्नास वर्षांपूर्वी लोकांनी मुंबईसह महाराष्ट्र राज्यासाठी लढे दिले होते याचा विसर मराठी समाजाला पडलेला दिसतो.रस्त्यावरच्या मिरवणुका हा दुसरा महत्त्वाचा लक्षवेधक प्रकार मुंबईमध्ये स्वातंत्र्य चळवळीच्या काळात नित्यनेमाने बघायला मिळत असे. शिवाय त्या काळात प्रभातफेºया हे समाज शिक्षणाचे साधन म्हणून विकसित झाले होते. उठा, जागे व्हा, पारंपरिक समाज बदला, सुधारणा करा असे महत्त्वाचे संदेश देणाºया या प्रभातफेºया आता क्वचितच दिसतात. काही ठिकाणी विविध धर्म-पंथाचे लोक अशा प्रभातफेºया काही विभागांत काढताना दिसतात. परंतु राजकारणी नेत्यांना अलीकडे रात्र-रात्र जागून कामे करावी लागत असल्यामुळे त्यांनी प्रभातफेºयांचा त्याग केला असावा.गेल्या काही वर्षांत गुढीपाडव्याच्या शोभायात्रांचे प्रस्थ बरेच वाढले आहे. डोंबिवली-ठाणे-पुणे आणि इतर काही शहरांत त्याचे लोण पसरलेले दिसते. त्यातून नवमध्यम, सुस्थित वर्गाला धार्मिक, सांस्कृतिक वैभवाचे सार्वजनिक प्रदर्शन करता येते. भरजरी पैठण्या, पारंपरिक दागदागिने, जरतारी उपरणी, पगड्या यांना हवा दाखविण्याचे ते निमित्त होते. अनेक नटलेल्या ललना तर पायी न चालता स्कूटरवरून त्यात सामील होतात. जोडीला लेझीम, ढोल, ताशे, तुताºया यांची साथही असते. त्याद्वारे एका समाजात वर्चस्वाची तर दुसºया समाजात भयाची भावना वाढताना दिसते.स्वातंत्र्य चळवळीच्या काळात लोकांना एकत्र आणण्यासाठी, सर्व धर्म, जाती, पंथ यांना एकत्र एकाच ध्येयाच्या दिशेने नेण्यासाठी, तिरंगी झेंड्याखाली संघटित करून संघभावना जोपासली जात असे. प्रभातफेºयांमध्ये खादीच्या, सुती साड्या नेसून महिला सामील होत तर खादीचे सदरे-धोतर हा पुरुषांचा गणवेश असे. सुरेल आवाजात गाणी गाऊन लोकांना उठवण्याचा, जागे करण्याचा विचार त्यामागे असे. शिवाय वर्चस्ववादी, श्रीमंत, परदेशी सत्तेला साध्यासुध्या लोकांनी शांतपणे पण निग्रहाने आव्हान देण्यासाठी निर्माण केलेला मिरवणुकीचा हा प्रकार काही कमी आकर्षक नव्हता. शिवाय तो अतिशय प्रभावी होता. स्वातंत्र्य चळवळीच्या यशातील ते एक प्रभावी साधन होते. दुर्दैवाने स्वातंत्र्यापूर्वी जोमदार असलेली सामाजिक संघभावना आज हरवली आहे. बहुसांस्कृतिक, बहुभाषिक आणि स्वतंत्र मुंबईच त्यामुळे हरवून गेली आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई