शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांनो, नव्या वर्षात हातावर हात ठेवून बसू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 01:56 IST

प्रत्येकाने आपापला मार्ग शोधून आपापली रोजीरोटी कमावली पाहिजे.

- सद‌्गुरु

कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी करील, ही मानसिकता नष्ट झाली पाहिजे.  प्रत्येकाने आपापला मार्ग शोधून आपापली रोजीरोटी कमावली पाहिजे.

आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी गेले वर्ष खूप आव्हानात्मक होते हे खरे; पण अशा संकटकाळी तरुणांची मोठी लोकसंख्या असलेला भारत प्रचंड संधीच्या उंबरठ्यावर उभा आहे. तारुण्य म्हणजे अजून पुरते न घडलेले व्यक्तिमत्त्व. ते लवचीक असतात, प्रौढ माणसांसारखे हटवादी असत नाहीत. ते नव्या शक्यता निर्माण करू शकतात. जगात काही रचनात्मक घडवायचे असेल तर ते तरुणच करू शकतात.

उलट्या बाजूने पाहिले, तर विनाशही त्यांच्याच हाताने घडतो. सळसळती ऊर्जा असलेले तरुण स्वभावाने फार उत्कट, तापट असतात, म्हणून जे घडेल त्याला पटकन प्रतिक्रिया देऊन बसतात. त्यांच्यामध्ये जशी सकारात्मकता भरता येऊ शकते, तशी नकारात्मकताही तितक्याच पटकन शिरते ती  म्हणूनच! त्यांचे मन स्थिर  असेल तर तरुण सकारात्मक आणि सर्जनशील मार्गाने त्यांची ऊर्जा वापरू शकतात.

या देशात सगळ्यात कळीचा प्रश्न कुठला असेल तर आपल्या तरुणांमध्ये असलेली प्रेरणेची कमतरता! प्रेरणा नसलेला माणूस आपल्या मर्यादा ओलांडून जाऊ शकत नाही; मग ती  मर्यादा शारीरिक असो, सामाजिक असो की मानसिक ! उलट स्वप्नांची पेरणी झालेला माणूस आपल्या मर्यादांचा विसर पडून अशक्य तेही सहज शक्य करू शकतो; पण मग तरुणांना प्रेरणा मिळावी कशी? आणि कुठून? पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना स्वत:पलीकडच्या वास्तवाचे भान असले पाहिजे, सभोवतालाशी त्यांचे नाते जोडले गेले पाहिजे.  एखाद्या व्यक्तीची ‘जगण्या’बद्दलची कल्पना फक्त स्वतःपुरतीच मर्यादित असते तर दुसऱ्या व्यक्तीसाठी ‘जगणे’ म्हणजे फक्त स्वतः आणि त्याचे कुटुंब एवढ्यापुरतेच मर्यादित असते.

तरुणांनी आपल्या जगण्याच्या कल्पनेमध्ये त्यांच्या आसपासचा मोठा समाज आणि  अवघ्या जगाचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने याचा आधुनिक शिक्षणात समावेश नाही. आधुनिक शिक्षण आपल्या मुलांमध्ये फक्त स्वविकासाची कल्पना रुजवते. फक्त स्वत:चा विचार करायला शिकवते.  आपल्या सुखसोयीसाठी आणि समृद्धीसाठी पृथ्वीवरच्या प्रत्येक गोष्टीचा उपभोग कसा घेता येईल हे शिकवणे, हाच आजच्या शिक्षणाचा उद्देश होऊन बसला आहे. एक विचित्र शोषक वृत्ती खोलवर भिनवली जात आहे. हे कसे बदलणार? सर्वांना सामावून घेणारे, सर्वांचा सकल विचार करणारे अधिक सर्वसमावेशक जग घडवायचे, तर त्यासाठी सर्वांचा विचार करणारी, फक्त ‘मी’च्या पलीकडे पाहू शकतील, अशी मने घडवणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या मदतीला येतील दोन गोष्टी : योगशास्त्र आणि अध्यात्म विचार!

कोणत्याही विचारधारेवर विश्वास ठेवणारा माणूस असो, तो कोणत्याही जाती, धर्म किंवा पंथातील असो, या देशातील अनेक समस्यांचे निराकरण कसे होऊ शकते हे प्रत्येकाने पाहण्याची वेळ आली आहे. तुमच्यासमोर जे प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे तुमचा धर्म किंवा संस्कृती देऊ शकते का, याचा शोध घ्या!  तुमचा धर्म  स्वत:चा शोध घेण्यासाठीचं एक वैयक्तिक साधन असू शकतो. 

स्वातंत्र्यप्राप्तीच्या सात दशकानंतरही एक अब्जाहून अधिक लोकांच्या हृदय आणि मनात भव्य भारताची स्वप्ने अजूनही प्रज्वलित आहेत. जर एक अब्ज लोक या राष्ट्रासाठी उभे राहिले तर जे मानवतेच्या इतिहासात कधीही झाले नाही, असे काही आपण सहज घडवू शकतो. म्हणजेच आपण एका मोठ्या लोकसंख्येला शिडीच्या आणखी वरवरच्या पायरीवर जायला मदत करू शकतो. यापूर्वी कधीही एका पिढीमध्ये वीस वर्षांच्या कालावधीत काही कोटी लोकांना जगण्याच्या एका स्तरातून दुसऱ्या स्तरावर उंचावले गेले, असे झालेले नाही. ही दुर्मीळ संधी या पिढीसमोर आहे.

आपण एक विकसनशील राष्ट्र आहोत. अद्याप पुष्कळ गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. म्हणून तरुणांनी, विशेषत: येत्या दोन वर्षांत हातावर हात ठेवून  रोजगाराची वाट पाहत बसू नये. कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी करील, ही मानसिकता नष्ट झाली पाहिजे. प्रत्येकाने आपापला मार्ग, आपापला तोडगा  शोधून आपापली रोजीरोटी कमावली पाहिजे. हे तुमच्यासाठी तर आहेच आहे, पण देशासाठीही फार महत्त्वाचे आहे.

टॅग्स :New Yearनववर्षMaharashtraमहाराष्ट्रEmployeeकर्मचारी