शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

फसलेल्या बंडाची नव्याने तुतारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 14:30 IST

अनिल गोटे : उमेदवारी लोकसभेची नजर मात्र विधानसभेवर

मिलिंद कुलकर्णीजळगाव : कधीकाळी जनसंघात काम केलेल्या आमदार अनिल गोटे यांचा साडेचार वर्षांपूर्वीचा भाजपाप्रवेश धक्कादायक होता, मात्र त्यांचे बंड अनपेक्षित नव्हते. पक्षीय, संघटनात्मक चौकट न मानवणाऱ्या गोटे यांची वाटचाल महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बंडाकडे झाली आणि हे बंड फसले तरी आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी नव्याने तुतारी हाती घेतली आहे.अभ्यासू, कार्यक्षम परंतु तेवढेच आक्रमक, आक्रस्ताळे आणि शिवराळ भाषेचा मुक्तपणे वापर करणारे असे अनिल गोटे यांचे व्यक्तिमत्व धुळेकरांसह राज्याला परिचित आहे. जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील यांच्यासोबत त्यांच्या वर्तमानपत्रात काम करीत असतानाच राजकीय धडे त्यांनी गिरविले. पुढे शेतकरी संघटनेत शरद जोशी यांच्यासोबत सक्रीय झाले. समाजवादी पक्ष (महाराष्टÑ), लोकसंग्राम संघटना या स्वत:च्या पक्ष, संघटनेच्या माध्यमातून बेरोजगार, शेतकऱ्यांसाठी आंदोलने उभारली. अब्दुल हमीद यांचे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, पांझरा नदीतिरावरील कल्पकतेने बनविलेली चौपाटी ही त्यांची भरीव कामे, वाहतुकीला अडथळा ठरणारी खाजगी आणि शासकीय अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यासाठी बेधडकपणे पाठपुरावा करण्याच्या स्वभावामुळे त्यांची नीडर लोकप्रतिनिधी अशी ओळख निर्माण झाली. पत्रकारीतेचा अनुभव असल्याने अभ्यासूपणे अनेक प्रश्न विधिमंडळ आणि बाहेरदेखील लावून धरल्याने प्रशासनात वचक निर्माण झाला. धुळेकरांनी त्यांच्या या व्यकिमत्व आणि कार्यशैलीला उचलून धरत दोनदा अपक्ष तर गेल्यावेळी भाजपाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून दिले. त्यांच्या पत्नी हेमा गोटे यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून देत पालिकेची सत्ता दिली होती.मूलत: बंडखोर स्वभाव असल्याने कोणत्याही पक्ष वा संघटनेत ते फारसे रमले नाहीत. पाताळगंगा प्रकल्पविरोधी आंदोलनात शरद जोशींशी बिनसल्यानंतर ते शेतकरी संघटनेतून बाहेर पडले.भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी सख्य असले तरी भाजपामध्ये तेव्हाही गेले नाही. बनावट मुद्रांक घोटाळ्यात प्रमुख आरोपी अब्दुल करीम तेलगीसोबत संबंधांवरुन त्यांना ४ वर्षे कारागृहात काढावी लागली. या कारवाईनंतर शरद पवार व छगन भुजबळ यांचे ते कट्टर विरोधक झाले. भाजपा-शिवसेनेच्या जवळ गेले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपा नेते एकनाथराव खडसे यांच्या आग्रहाने ते भाजपाच्या तिकिटावर धुळ्यातून उभे राहिले आणि निवडून आले.भाजपामध्ये खडसेंचा उतरतीचा काळ सुरु होताच, गोटेंचे महत्व कमी झाले. धुळ्यात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचा दबदबा वाढला. महापालिका निवडणुकीची सूत्रे आपल्याच हाती येतील असा समज करुन घेत गोटेंनी ८५ सभा घेतल्या. परंतु, भामरे व रावल यांनी ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांना बोलावून घेत धुळ्यात बाजी मारली. तत्पूर्वी गोटे यांनी बंडाचे निशाण हाती घेतले. आमदारकीचा राजीनामा देऊ केला आणि विधानसभेत अन्यायाचा पाढा वाचला. पण त्यांचे बंड फसले आणि धुळेकरांनी हेमा गोटे यांच्यारुपाने केवळ एक जागा त्यांच्या पारड्यात घातली.महापालिका निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी गोटे यांनी लोकसंग्रामचे उमेदवार रिंगणात उतरविले होते. मनसेकडून समर्थन मिळविले होते. राष्टÑवादीचे माजी आमदार आणि कट्टर प्रतिस्पर्धी राजवर्धन कदमबांडे यांच्याशी हातमिळवणी केली होती. परंतु, तरीही पराभव झाला.आता लोकसभा निवडणुकीत आघाडीअंतर्गत ही जागा कॉंग्रेसकडे आहे. माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पूत्र आमदार कुणाल पाटील हे उमेदवार आहेत. पाटीलद्वयींवर टीका करणे गोटे यांनी कायम टाळलेले असताना बंडखोरी त्यांच्या पथ्यावर पडणारी ठरेल, असा कयास व्यक्त होत असला तरी तूर्त त्यात फार तथ्य वाटत नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव