शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

फसलेल्या बंडाची नव्याने तुतारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 14:30 IST

अनिल गोटे : उमेदवारी लोकसभेची नजर मात्र विधानसभेवर

मिलिंद कुलकर्णीजळगाव : कधीकाळी जनसंघात काम केलेल्या आमदार अनिल गोटे यांचा साडेचार वर्षांपूर्वीचा भाजपाप्रवेश धक्कादायक होता, मात्र त्यांचे बंड अनपेक्षित नव्हते. पक्षीय, संघटनात्मक चौकट न मानवणाऱ्या गोटे यांची वाटचाल महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बंडाकडे झाली आणि हे बंड फसले तरी आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी नव्याने तुतारी हाती घेतली आहे.अभ्यासू, कार्यक्षम परंतु तेवढेच आक्रमक, आक्रस्ताळे आणि शिवराळ भाषेचा मुक्तपणे वापर करणारे असे अनिल गोटे यांचे व्यक्तिमत्व धुळेकरांसह राज्याला परिचित आहे. जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील यांच्यासोबत त्यांच्या वर्तमानपत्रात काम करीत असतानाच राजकीय धडे त्यांनी गिरविले. पुढे शेतकरी संघटनेत शरद जोशी यांच्यासोबत सक्रीय झाले. समाजवादी पक्ष (महाराष्टÑ), लोकसंग्राम संघटना या स्वत:च्या पक्ष, संघटनेच्या माध्यमातून बेरोजगार, शेतकऱ्यांसाठी आंदोलने उभारली. अब्दुल हमीद यांचे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, पांझरा नदीतिरावरील कल्पकतेने बनविलेली चौपाटी ही त्यांची भरीव कामे, वाहतुकीला अडथळा ठरणारी खाजगी आणि शासकीय अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यासाठी बेधडकपणे पाठपुरावा करण्याच्या स्वभावामुळे त्यांची नीडर लोकप्रतिनिधी अशी ओळख निर्माण झाली. पत्रकारीतेचा अनुभव असल्याने अभ्यासूपणे अनेक प्रश्न विधिमंडळ आणि बाहेरदेखील लावून धरल्याने प्रशासनात वचक निर्माण झाला. धुळेकरांनी त्यांच्या या व्यकिमत्व आणि कार्यशैलीला उचलून धरत दोनदा अपक्ष तर गेल्यावेळी भाजपाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून दिले. त्यांच्या पत्नी हेमा गोटे यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून देत पालिकेची सत्ता दिली होती.मूलत: बंडखोर स्वभाव असल्याने कोणत्याही पक्ष वा संघटनेत ते फारसे रमले नाहीत. पाताळगंगा प्रकल्पविरोधी आंदोलनात शरद जोशींशी बिनसल्यानंतर ते शेतकरी संघटनेतून बाहेर पडले.भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी सख्य असले तरी भाजपामध्ये तेव्हाही गेले नाही. बनावट मुद्रांक घोटाळ्यात प्रमुख आरोपी अब्दुल करीम तेलगीसोबत संबंधांवरुन त्यांना ४ वर्षे कारागृहात काढावी लागली. या कारवाईनंतर शरद पवार व छगन भुजबळ यांचे ते कट्टर विरोधक झाले. भाजपा-शिवसेनेच्या जवळ गेले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपा नेते एकनाथराव खडसे यांच्या आग्रहाने ते भाजपाच्या तिकिटावर धुळ्यातून उभे राहिले आणि निवडून आले.भाजपामध्ये खडसेंचा उतरतीचा काळ सुरु होताच, गोटेंचे महत्व कमी झाले. धुळ्यात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचा दबदबा वाढला. महापालिका निवडणुकीची सूत्रे आपल्याच हाती येतील असा समज करुन घेत गोटेंनी ८५ सभा घेतल्या. परंतु, भामरे व रावल यांनी ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांना बोलावून घेत धुळ्यात बाजी मारली. तत्पूर्वी गोटे यांनी बंडाचे निशाण हाती घेतले. आमदारकीचा राजीनामा देऊ केला आणि विधानसभेत अन्यायाचा पाढा वाचला. पण त्यांचे बंड फसले आणि धुळेकरांनी हेमा गोटे यांच्यारुपाने केवळ एक जागा त्यांच्या पारड्यात घातली.महापालिका निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी गोटे यांनी लोकसंग्रामचे उमेदवार रिंगणात उतरविले होते. मनसेकडून समर्थन मिळविले होते. राष्टÑवादीचे माजी आमदार आणि कट्टर प्रतिस्पर्धी राजवर्धन कदमबांडे यांच्याशी हातमिळवणी केली होती. परंतु, तरीही पराभव झाला.आता लोकसभा निवडणुकीत आघाडीअंतर्गत ही जागा कॉंग्रेसकडे आहे. माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पूत्र आमदार कुणाल पाटील हे उमेदवार आहेत. पाटीलद्वयींवर टीका करणे गोटे यांनी कायम टाळलेले असताना बंडखोरी त्यांच्या पथ्यावर पडणारी ठरेल, असा कयास व्यक्त होत असला तरी तूर्त त्यात फार तथ्य वाटत नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव