शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मुक्त संचार स्वातंत्र्य

By admin | Updated: February 11, 2016 03:53 IST

गेले अनेक दिवस विविध माध्यमांपासून तो थेट संसदेपर्यंत ज्या विषयाची चर्चा अगदी हमरीतुमरावर येऊन सुरु होती, त्या ‘नेट न्यूट्रॅलिटी’च्या विषयावर दूरसंचार नियामक प्राधिकरणाने

गेले अनेक दिवस विविध माध्यमांपासून तो थेट संसदेपर्यंत ज्या विषयाची चर्चा अगदी हमरीतुमरावर येऊन सुरु होती, त्या ‘नेट न्यूट्रॅलिटी’च्या विषयावर दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) अखेर एकदाचा पडदा टाकल्याने देशभरातील इंटरनेटचा वापर करणाऱ्यांना मुक्त संचाराचे स्वातंत्र्य मिळणार असल्याने ते खुशालून जाणे स्वाभाविक असले तरी इंटरनेटची सेवा पुरविणाऱ्या खासगी संस्था आणि अगदी अलीकडेच पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याशी मैत्र जुळलेले ‘फेसबुक’चे जन्मदाते मार्क झुकेरबर्ग यांची मात्र घोर निराशा झाली आहे. जोवर इंटरनेटचा वापर केवळ टेबलावरील वा मांडीवरील संगणकापर्यंत मर्यादित होता तोपर्यंत प्रश्न निर्माण झाला नव्हता. पण स्मार्ट फोनमुळे मोबाईलवरुनही इंटरनेटची सेवा उपलब्ध होऊ लागली आणि गोंधळास प्रारंभ झाला. आज देशभरात तब्बल एक कोटी मोबाईलधारक असून त्यातील चाळीस लाख लोकांकडे इंटरनेटची जोडणी आहे. हा पसारा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि तो वाढतच जावा ही ‘डिजीटल इंडिया’ची अपेक्षा आहे. इतक्या मोठ्या संख्येतील लोक इंटरनेटचा वापर करु लागल्यानंतर संबंधित सेवा पुरविणाऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटले. इंटरनेटच्या माध्यमातून ज्या ज्या म्हणून सेवा उपलब्ध आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र दर आकारणी करण्याची मुभा मिळावी असा लकडा लावायला त्यांनी प्रारंभ केला. आजच्या स्थितीत ज्या ग्राहकाकडे इंटरनेटची सुविधा आहे तो ग्राहक कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता ई-मेल, गुगल, फेसबुक, ट्विटर, ग्राहकोपयोगी वस्तुंची आॅनलाईन विक्री करणाऱ्या विविध संस्था (साईट्स) आदिंशी थेट संपर्क साधू शकतो. त्याच्या या संपर्कावर म्हणजेच त्याच्या मुक्त संचार स्वातंत्र्यावर अतिरिक्त शुल्काचा अंकुश निर्माण करण्याचा इंटरनेटची सुविधा विकणाऱ्या खासगी संस्थांचा डाव होता. फेसबुकने त्यात उडी घेताना मोबाईल वापरदारांना फेसबुकची सेवा मोफत (इंटरनेटशिवाय) देण्याचे गाजर दाखविले. ते गाजरच होते. कारण ज्याना फेसबुकशिवाय मायाजालातील अन्य सेवांशी जवळीक साधायची असेल त्यांना ती संधी मिळणार नव्हती. ती मिळवायची तर वेगळ्या शुल्काची आकारणी त्यात अनुस्यूत होती. ट्रायने या साऱ्यांचा डाव उधळून लावला आहे. एकदा का इंटरनेटची सेवा विकत घेतली की संबंधिताला मायाजालात अनिर्बन्ध आणि मुक्त संचाराचे स्वातंत्र्य राहील असे ट्रायने जाहीर करुन टाकले. डिजीटल इंडिया किंवा तत्सम स्वप्नांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने जे झाले ते उत्तम झाले यात शंका नाही. परंतु अन्य अनेक स्वातंत्र्यांप्रमाणेच हे स्वातंत्र्यदेखील एक दुधारी शस्त्र असल्याचे विसरता येत नाही. काही राष्ट्रांनी इंटरनेटवरील विशिष्ट सेवा त्यांच्यापुरत्या बंद केल्या तसे भारतात होऊ शकत नाही. पण भारतात इंटरनेटचा व त्या माध्यमातून हाताशी मोफत लागणाऱ्या सामाजिक माध्यमांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे, हेदेखील नजरेआड करता येत नाही.