शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

फडणवीसांच्या कर्जमाफीला स्वच्छतेची धार...

By राजा माने | Published: December 08, 2017 3:57 AM

फडणवीसांची कर्जमाफी खरी की फसवी? हा प्रश्न राज्याच्या राजकारणात आज टिपेला पोहोचला आहे. जून २०१७ मध्ये कर्जमाफीची घोषणा झाली.

फडणवीसांची कर्जमाफी खरी की फसवी? हा प्रश्न राज्याच्या राजकारणात आज टिपेला पोहोचला आहे. जून २०१७ मध्ये कर्जमाफीची घोषणा झाली. कर्जबाजारी शेतक-याला उभे करण्याचे खूप मोठे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे उभे होते. २००९ साली देखील राज्यातील ३४ लाख शेतकºयांची चार हजार आठ कोटी रुपये एवढी कर्जमाफी झाली होती. त्या कर्जमाफीचा लाभ नक्की कुणाला मिळाला, या प्रश्नावर नेहमीच चर्चा व्हायची. १५० कोटी रुपयांची कर्जमाफी चुकीच्या किंवा गरज नसलेल्या धनदांडग्यांना दिली गेली, हे देखील रेकॉर्डवर आले होते. या पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा लाभ हा केवळ कर्जबाजारी आणि गरजू बळीराजाच्याच घरात पोहोचला पाहिजे, हा दृष्टिकोन फडणवीस आणि त्यांच्या टीमने अंगिकारल्याचे दिसून येते. त्याच कारणाने कर्जमाफीच्या घोषणेनंतर सर्व आघाड्यांवर काहीसा गोंधळ उडाल्याचा अनुभव महाराष्टÑाने घेतला. कर्जमाफीच्या माध्यमातून दिली जाणारी पै न् पै पारदर्शी पद्धतीने आणि पात्र शेतकºयालाच मिळाली पाहिजे, हा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केल्याचे प्रत्येक वादाच्या वेळी दिसून आले. तरीही कर्जमाफीच्या भवितव्याबद्दल सतत शंका व्यक्त होत गेल्या.राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने दिलेल्या आकडेवारीनुसार मुख्यमंत्र्यांनी ८९ लाख शेतकºयांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. त्यात थकबाकीदार कर्जदार ४४ लाख, नियमित कर्जदार ३५ लाख आणि पुनर्गठित १० लाख कर्जदारांचा समावेश होता. पुढारी, अधिकारी, जिल्हा बँकांपासून नगरपालिकेपर्यंतचे पदाधिकारी आणि करदात्या शेतकºयांना कर्जमाफीतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला. १ एप्रिल २००९ नंतर कर्ज घेतलेल्या व ३० जून २०१६ अखेर थकीत असलेल्या कर्जदार शेतकºयांनाच कर्जमाफीचा लाभ देण्याचे धोरण शासनाने स्वीकारले. प्रत्येक पातळीवर निकषाची चाळणी काटेकोरपणे लावली गेली. राज्यातील बँकिंग क्षेत्राला खºया अर्थाने कामाला लावणारे कर्जमाफीचे सॉफ्टवेअर विकसित झाल्याने बँकिंग क्षेत्रातही अस्वस्थता निर्माण झाली. त्यात दिवाळी कर्जमाफीने साजरी करण्याचा सरकारचा अट्टाहासही नाराजीचे कारण ठरला. या पार्श्वभूमीवर कर्जमाफीवरील फसवेपणाच्या आरोपाचा आणि कर्जमाफी प्रक्रियेतील स्वच्छतेच्या दाव्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.२००९ साली झालेली कर्जमाफी आणि सध्या छ. शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या नावाने होत असलेली कर्जमाफी यांची तुलना केली असता देवेंद्र फडणवीस यांच्या कर्जमाफीला स्वच्छतेची धार असल्याचा अनुभव आकडेवारी देते. प्रत्यक्ष थकबाकीदार ४४ लाख कर्जदार शेतकºयांपैकी २० लाख ६६ हजार शेतकºयांसाठी १२ हजार ७०८ कोटी रुपये बँकांकडे वर्ग झाले आहेत तर ९ लाख ४३ हजार शेतकºयांच्या खात्यावर ५ हजार १४१ कोटी जमा झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कर्जमाफीला स्वच्छतेची धार दिसते. आता तिचा फायदा शेतकºयांना कसा होणार हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस