शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

अन्नसुरक्षेशी तडजोड नको

By admin | Updated: September 24, 2014 06:21 IST

जागतिक व्यापारी संघटनेच्या (हळड) नुकत्याच जीनिव्हा येथे झालेल्या बैैठकीत जागतिक व्यापार सुलभीकरणाचा नवीन करार अस्तित्वात येऊ शकला नाही

शांताराम वाघ - जागतिक व्यापारी संघटनेच्या (हळड) नुकत्याच जीनिव्हा येथे झालेल्या बैैठकीत जागतिक व्यापार सुलभीकरणाचा नवीन करार अस्तित्वात येऊ शकला नाही. या कराराला भारताने आपला तीव्र विरोध नोंदविला आणि स्वाक्षरी करण्यास नकार दिला. भारताच्या भूमिकेमुळे व नकाराधिकारामुळे अमेरिकेसारखे प्रगत देश आरडोओरड करणार हे उघडच होते. आता लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या वेळीही हा कायदा संमत करण्यासाठी अध्यक्ष ओबामा हे मोदींवर दबाव आणण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; पण भारतीयांची अन्नसुरक्षा ही अधिक महत्त्वाची असल्याने भारताने या दबावाला बळी न पडता आपल्या हिताचा विचार करून निर्णय घेणे योग्य ठरेल.आतापर्यंतचा इतिहास पाहाता विकसनशील देश अशा प्रकरणात भारताच्या बाजूने उभे राहात असत. या वेळी मात्र त्यांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला नाही. आज या संघटनेत भारत एकाकी पडला असला, तरी या नवीन करारासंबंधी भारताची जी भूमिका आहे त्याकडे दुर्लक्ष करणे, प्रगत किंवा विकसनशील राष्ट्रांना परवडणारे नाही हे कटूसत्य आहे. इतर देशांच्या तुलनेत भारत हा जगातील मोठी बाजारपेठ असलेला देश आहे हे तर उघडच आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघटनेने (युनो) भारताच्या भूमिकेचे समर्थन केले आहे, ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. इतर राष्ट्रातील रोजगार निर्मितीला हातभार लावण्यापेक्षा स्वत:च्या देशातील जनतेच्या अन्नसुरक्षेची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे आहे हे युनोचे मत कोणालाही पटण्यासारखे नाही. जागतिक व्यापार संघटनेकडून येऊ घातलेला नवीन करार हा प्रामुख्याने अन्नसुरक्षा आणि अनुदान देण्यासंबंधीचा आहे. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानावर मर्यादा घालणे व एकूण अन्नधान्याच्या फक्त १० टक्के साठा करणे या दोन अव्यवहार्य व जाचक अटी या करारात आहेत. शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान कमी केले तर फक्त श्रीमंत देशच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टिकू शकतील व पर्यायाने भारतीय शेतकरी त्यापासून वंचित राहील हे उघड गणित आहे. दुसरी गोष्ट अन्नधान्याच्या साठ्याबाबतची. एकूण अन्नधान्याच्या फक्त १० टक्के साठाच ठेवता येईल, हा आग्रह मूलभूत मानवी जीवनावरच घाला घालणारा आहे. भारताला तर दुष्काळ, अतिवृष्टी किंवा नैैसर्गिक आपत्तींना नेहमीच तोंड द्यावे लागते. १२० कोटी लोकांना अन्न पुरविणे हे भारतापुढील मोठे आव्हान आहे. सरकार जर आपल्या जनतेला अन्न मिळण्याची ग्वाही देऊ शकत नसेल, तर ‘अच्छे दिन’ कसे येतील? शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे आज आपल्या देशात जनतेला दोन वर्षे पुरेल एवढा अन्नसाठा उपलब्ध आहे, हे मोदी सरकारचे भाग्यच म्हणावे लागेल. जागतिक व्यापार संघटनेत भारताने घेतलेली भूमिका यामुळेच रास्त ठरते. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अन्नधान्याच्या बाबतीत भारताची भूमिका स्वागतार्ह असली, तरी स्वदेशात मात्र सरकारचे वर्तन अगदी उलट होताना दिसत आहे. गरिबांना माफक दरात अन्नधान्य उपलब्ध करून देणे हा सरकारचा सार्वभौम अधिकार असल्याचे वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत नुकतेच सांगितले. सोनिया गांधी यांनी महद्प्रयासाने अन्नधान्य विधेयक मंजूर करून घेतले, त्याबद्दल मात्र मोदी सरकार मूग गिळून गप्प आहे. उलट हा अन्नसुरक्षा कायदा तीन महिन्यांसाठी प्रलंबित ठेवला आहे. येत्या काही महिन्यांत होणाऱ्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून हा निर्णय घेण्यात आला हे नि:संशय.