शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 20:12 IST

शेतक-यांच्या खात्यावर हजारांमध्ये सन्माननिधी पोहोचविण्याचा आटापिटा सुरू असला तरी सतत शेतकरी आत्महत्येच्या बातम्या कानावर धडकत आहेत.

-  धर्मराज हल्लाळे शेतकरी साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबियांनी सामूहिक आत्महत्या केली. तो दिवस होता १९ मार्च. साधारणपणे ३३ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शेतकरी आत्महत्यांचा सिलसिला आजही थांबत नाही. शेतक-यांच्या खात्यावर हजारांमध्ये सन्माननिधी पोहोचविण्याचा आटापिटा सुरू असला तरी सतत शेतकरी आत्महत्येच्या बातम्या कानावर धडकत आहेत. देश आणि राज्यातील हा चिंतेचा विषय सोडविण्याचा दावा सर्व सरकारे करत आली आहेत. त्याचवेळी कोणाच्या काळात किती आत्महत्या झाल्या, याचेही राजकारण होत आहे. मात्र समस्येच्या मुळाशी जाऊन शेतक-यांच्या कष्टाला योग्य दाद मिळत नाही आणि त्याच्या तक्रारीचीही कोणी फिर्याद घेत नाही. भाव, हमीभाव हवेत असतात. कायदे विरोधात असतात. धोरणे बदलत असतात. अशी विचित्र अवस्था आहे. अशावेळी निमूटपणे पाहणारा समाज हा बळीराजाचे आत्मबळच नाहिसे करीत आहे. तिथेही एखादा आशेचा किरण दिसतो, तो अन्नत्यागासारख्या व्यापक आंदोलन आणि चळवळीतून. किसानपुत्र आंदोलन उभारणारे अमर हबिब यांनी गेल्या तीन वर्षांपासून राज्यभर अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची हाक दिली आहे. दरवर्षी १९ मार्च रोजी प्रत्येकाने एक दिवस उपवास करावा, हा एक सत्याग्रही विचार अमर हबिब यांनी मांडला. 

पहिल्या वर्षी म्हणजेच १९ मार्च २०१७ रोजी अमर हबिब यांनी साहेबराव करपे यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या गावी उपवास केला. दुसºया वर्षी जिथे आत्महत्या झाली, त्या दत्तपूरला भेट देऊन पवनारला उपोषण केले. शेतक-यांच्या आत्महत्यांकडे मी निमूटपणे पाहणार नाही, मी माझी भूमिका मांडेन. मी अन्नदात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीन, त्याच्या कष्टाला सलाम करीन ही भावना वृद्धिंगत करण्यासाठी किसानपुत्र आंदोलन टप्प्या-टप्प्याने व्यापक होत गेले. यंदा १९ मार्च रोजी दिल्ली येथे महात्मा गांधी यांच्या समाधीसमोर राजघाटावर उपवास केला जाणार आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे अमर हबिब ज्यावेळी दिल्लीत उपवास करतील, त्याचवेळी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात संवेदनशील नागरिक आणि किसानपुत्र एक दिवसाचा उपवास धरतील. यंदाची ही संख्या लाखोंच्या घरात असणार आहे. विशेष म्हणजे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर किसानपुत्र आंदोलनाशी जोडलेले अनेक तरुण आपापल्या नोकरीच्या ठिकाणी राहून देशाच्या कानाकोप-यातील मोठ्या शहरांमध्येही उपवास करणार आहेत. गेल्यावर्षी परदेशात नोकरी करणा-या किसानपुत्रांनीही उपवास धरला होता. 

सशस्त्र जुलमी राजवट करणा-या इंग्रजांना अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधी यांनी सळोकीपळो करून सोडले होते. सामान्य माणसांना सहज साधता येईल, असे सत्याग्रही आयुध महात्मा गांधींनी देशाला दिले. उपवास, परदेशी कपड्यांची होळी, मिठाचा सत्याग्रह अर्थातच ‘उचललेस तू मीठ मूठभर, खचला साम्राज्याचा पाया’ हे जे घडले ते सामान्य माणसांच्या ताकदीतूनच. ते सामर्थ्य गांधी विचारात होते आणि त्याच विचारांना पाईक मानून किसानपुत्र आंदोलन पुढे येत आहे. नक्कीच हे राजनैतिक आंदोलन नाही, तर नैतिक अधिष्ठान दाखविणारे, कृतज्ञता आणि संवेदनशीलता दर्शविणारे अन्नत्याग आंदोलन आहे. त्यात काही ठिकाणी मागण्या मांडल्या जातील. शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, ही भूमिका सांगितली जाईल. त्याहीपेक्षा अन्नदाता जो जीवनाचा त्याग करीत आहे, त्याला धैर्य देणारे हे आंदोलन असणार आहे. 

जो आपणा सर्वांचा अन्नदाता आहे, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाने एक दिवस उपवास करावा ही भूमिका आहे. अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी  समविचारी कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिक एकत्र येऊन, एकत्र बसून अन्नत्याग आंदोलन करतील. शिवाय, ज्यांना एकत्र बसणे शक्य नाही, त्यांनी आपापल्या कामावर हजर राहून एकदिवस उपवास केला पाहिजे. जे शेतक-यांच्या घरात घडते आहे, ते आपल्याच कुटुंबात घडले तर आपणासाठी तो दिवस अन्नत्यागाचा असतो. हीच संवेदना ध्यानी ठेवून प्रत्येकाने एकदिवस उपवास केला तर आत्महत्या करणा-या हजारो शेतक-यांचे स्मरण होईल. स्मरणातूनच विचार प्रकट होतील. याच विचारांचे तयार झालेले वायूमंडळ समाजात बदल घडवील, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी