शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

माजी मुख्यमंत्र्यांकडून स्वकीयांची पाठराखण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 23:24 IST

मिलिंद कुलकर्णी कोरोना काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी जळगावला भेट देऊन कोविड रुग्णालयाची पाहणी केली तसेच ...

मिलिंद कुलकर्णीकोरोना काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी जळगावला भेट देऊन कोविड रुग्णालयाची पाहणी केली तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन काही सूचना केल्या. विरोधी पक्षनेते या नात्याने त्यांची भेट आणि त्यांनी केलेल्या सूचना या योग्य आणि समर्थनीय आहेत. मात्र भाजपचे लोकप्रतिनिधी, पालिकांचे पदाधिकारी यांनाही थोडे अनुभवाचे दोन शब्द सांगितले असते तर जनतेच्यादृष्टीने ते न्याय्य ठरले असते.राज्य सरकारचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि त्यांचे बहुतांश मंत्री कोरोना काळात घराबाहेर पडत नसल्याने सामान्य जनतेमध्ये तीव्र भावना आहेत. मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचे नियंत्रण नसले की, प्रशासकीय यंत्रणा सामान्य जनतेला जुमानत नाही. राष्टÑीय आपत्तीमुळे मिळालेल्या अधिकारांचा वापर करुन अचाट निर्णय घेतले जातात. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता या नात्याने संपूर्ण महाराष्टÑाचा दौरा करण्याची कृती वाखाणण्यासारखी आहे. विरोधी पक्षनेत्याचा दरारा आणि अभ्यासपूर्ण वक्तव्य महाराष्टÑाने बºयाच वर्षाने पुन्हा एकदा अनुभवले. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यांच्या दौºयाला काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध करणे स्वाभाविक आहे. सरकार आणि प्रशासनाचे वाभाडे काढण्यासाठी ते आल्याने सत्ताधारी पदाधिकाºयांना ते रुचणार नव्हतेच.जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाले असताना फडणवीस यांनी यायला नको, असाही सूर सत्ताधारी मंडळींकडून लावला गेला. अर्ध्या महाराष्टÑात लॉकडाऊन सुरु असताना विरोधी पक्षनेते असो की, मंत्री यांनी फिरुच नये, असा याचा अर्थ झाला. एकमात्र खरे की, राजकीय नेते आले की, त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा गराडा अकारण होत असतो. किमान कोरोना काळात तरी शारीरिक अंतराचे भान ठेवायला हवे. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे असो की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, दोन्ही नेत्यांभोवती गर्दी जमली होतीच. कोरोनापश्चात सर्वच क्षेत्रात बदल होत असताना राजकारणात मात्र काही बदलणार नाही, असे यावरुन तरी स्पष्ट झाले.जळगाव जिल्ह्याची स्थिती चिंताजनक आहे. अहवाल २४ तासात यायला हवे. तपासणीची संख्या वाढायला हवी, अशा सूचना फडणवीस यांनी केल्या. त्या रास्त आहेत. देशापेक्षा चौपट मृत्यूदरामुळे जळगाव आधीच बदनाम झालेले असताना या गोष्टींमध्ये यंत्रणेत बदल झाला तरी सुधारणा अद्याप झालेली नाही. जिल्हाधिकारी व अधिष्ठाता बदलले म्हणजे सगळी यंत्रणा बदलली असे होत नाही. एकदम चमत्कार होईल, अशी अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. फडणवीस यांनी अपेक्षा व्यक्त करणे योग्य आहे. मात्र यासोबत त्यांनी स्वकीयांना काही प्रश्न विचारायला हवे. फडणवीस यांचे उजवे हात असलेले गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन झाले. त्यांनीच अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे आणि इतर वैद्यकीय अधिकारी याठिकाणी आणले. हे महाविद्यालय कोविड रुग्णालय केल्यानंतर उपचार, औषधी आणि यंत्रसामुग्री या तिन्ही पातळीवर सपशेल अपयशी ठरले. दोनशेहून अधिक वैद्यकीय अधिकारी याठिकाणी तैनात असताना प्रत्यक्ष कामावर ५० देखील अधिकारी नसल्याचे उघड झाले. अनेक यंत्रसामुग्री वापराविना पडून आहे. व्हेंटीलेटर नाहीत. मालती नेहेते या वृध्देचा मृत्यू हा तर या ठिकाणच्या यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा बळी होता. भाजप आणि महाजन यांची सत्ता गेली तरी जळगाव जिल्ह्यात त्या काळातील अधिकारी तैनात होते आणि अप्रत्यक्ष महाजन आणि त्यांच्या आरोग्यदूतांची सत्ता रुग्णालयात अबाधित होती. ेएकूण ३१५ मृत्यूंपैकी २३१ मृत्यू या रुग्णालयात झालेले आहेत. त्याविषयी फडणवीस यांनी बोलणे अपेक्षित होते.भाजपची सत्ता असलेल्या पालिका आणि आमदार असलेल्या मतदारसंघात कोरोना स्थिती बिकट आहे. रुग्ण आणि मृत्यूसंख्येचा आढावा घेऊया. जळगाव : रुग्ण : १२७२ (मृत्यू: ५९), भुसावळ : ५२९ (५१), अमळनेर : ४५२( ३०), एरंडोल : २७४ (१०), जामनेर : २९३ (२२), पारोळा : ३०१ (०७), चाळीसगाव : ११७ (०८), मुक्ताईनगर : १२८ (०४), बोदवड : १७२ (०५). अशी स्थिती असतानाही जळगाव महापालिका रुग्णांसाठी आवश्यक असलेली औषधी व सामुग्री विकत घेण्यासाठी दोन आमदारांनी दिलेला एक कोटींचा निधी महिना उलटूनही खर्च करु शकलेली नाही. गिरीश महाजन यांनी रिलायन्सच्या मदतीने जामनेरला उभारलेले रुग्णालय आणि जळगावात पालिकेच्या नानीबाई रुग्णालयाचे अत्याधुनिकरण अद्याप झालेले नाही. जनतेला ते उपयोगी पडलेले नाही. पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक फडणवीस यांच्या दौºयातच जनतेला दिसले. तीन महिन्यापासून तेही घरात आहेत. त्यांनाही वडिलकीच्या नात्याने तंबी दिली असती तर जनतेचे भले झाले असते.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव