शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ज्वलनशील पाणी

By admin | Updated: November 12, 2016 01:18 IST

पंजाब सरकारने एकूण पाच राज्ये आणि एका केन्द्रशासित प्रदेशाशी पाणी वाटून घेण्यास मान्यता देणारा करार २००४ साली विधानसभेत विधेयक मांडून

पंजाब सरकारने एकूण पाच राज्ये आणि एका केन्द्रशासित प्रदेशाशी पाणी वाटून घेण्यास मान्यता देणारा करार २००४ साली विधानसभेत विधेयक मांडून एकतर्फी मोडीत काढणारा जो ठराव २००४ साली मंजूर केला होता, तो ठरावच घटनाविरोधी असल्याचा निवाडा सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने घटनाविरोधी असल्याचा निवाडा जाहीर केल्याने विधानसभेची निवडणूक ऐन तोंडावर आलेली असतानाच हा निवाडा जाहीर झाल्यामुळे त्या प्रदेशातील पाणीवाद अति ज्वलनशील बनणार हे उघड आहे. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी न्यायालयाच्या निवाड्याच्या निषेधार्थ आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा लोकसभेच्या अध्यक्षांकडे रवाना केला असून पंजाबच्या हिताचे रक्षण करण्यात तेथील अकाली-भाजपा युतीचे सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा ठपकाही ठेवला आहे. पंजाब सरकारने सतलज-यमुना जोड कालव्याचे बांधकाम हाती घेऊन ते पूर्ण करावे आणि या जोड कालव्यातील पाणी हरयाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि चंदिगड यांच्याशी वाटून घ्यावे असा करार करण्यात आला होता. पण कराराचे पालन करण्याबाबत पंजाब सरकार टंगळमंगळ करीत असल्याचे पाहून हरयाणा सरकार २००२ साली सर्वोच्च न्यायालयात धाऊन गेले आणि न्यायालयाने पंजाब सरकारला योग्य ती समज दिली. त्यावर आपल्याला या जबाबदारीतून मोकळे करावे अशी याचिका २००४मध्ये पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली, पण ती फेटाळली गेली. त्यानंतरच सदरहू एकतर्फी ठराव संमत केला गेला. तसे करताना एकाच वेळी करार तर मोडीत काढलात गेला पण सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या निर्देशांचीही अवमानना केली गेली. करार मोडीत काढणारा ठराव मंजूर केला गेला तेव्हां पंजाबात काँग्रेसचे सरकार होते व कॅप्टन अमरिंदरसिंग हेच मुख्यमंत्री होते. केन्द्रातदेखील काँग्रेसचीच राजवट होती. अर्थात त्यानंतर सत्तेत आलेल्या अकाली-भाजपा सरकारनेदेखील कराराचे पालन करण्याच्या दृष्टीने आपणहून कोणतीही हालचाल केली नाही. ते शक्यही नव्हते. कारण काँग्रेस सरकारने पंजाबच्या जनतेच्या भल्याचा विचार करुन घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात कोणतेच सरकार जाऊ शकत नव्हते. तथापि न्यायालयासमोर पंजाबची भूमिका मांडण्यात विद्यमान सरकार अपयशी ठरल्याचा स्पष्ट आरोप काँग्रेसने केल्यामुळे तेथील राजकीय सुंदोपसुंदीला जोर चढेल यात शंका नाही. विशेषत: पंजाब विधानसभेची निवडणूक आता थेट सीमेपाशी आली असून निवडणुकीचे वातावरण तापण्यास तशीही अगोदरपासूनच सुरुवात झाली आहे. दक्षिणेतील कावेरीच्या पाण्याचा वाद तसाच लोबकळत पडलेला असताना आणि महाराष्ट्रातही पाणी वाटपाचा प्रश्न आज ना उद्या उग्र होण्याची लक्षणे असताना केन्द्रातील सरकारच्या डोकोदुखीत यातून वाढच होत जाणार आहे.