शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
5
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
6
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
7
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
8
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
9
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
10
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
11
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
12
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
13
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
14
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
15
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
16
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
17
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
18
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
19
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

ज्वलनशील पाणी

By admin | Updated: November 12, 2016 01:18 IST

पंजाब सरकारने एकूण पाच राज्ये आणि एका केन्द्रशासित प्रदेशाशी पाणी वाटून घेण्यास मान्यता देणारा करार २००४ साली विधानसभेत विधेयक मांडून

पंजाब सरकारने एकूण पाच राज्ये आणि एका केन्द्रशासित प्रदेशाशी पाणी वाटून घेण्यास मान्यता देणारा करार २००४ साली विधानसभेत विधेयक मांडून एकतर्फी मोडीत काढणारा जो ठराव २००४ साली मंजूर केला होता, तो ठरावच घटनाविरोधी असल्याचा निवाडा सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने घटनाविरोधी असल्याचा निवाडा जाहीर केल्याने विधानसभेची निवडणूक ऐन तोंडावर आलेली असतानाच हा निवाडा जाहीर झाल्यामुळे त्या प्रदेशातील पाणीवाद अति ज्वलनशील बनणार हे उघड आहे. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी न्यायालयाच्या निवाड्याच्या निषेधार्थ आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा लोकसभेच्या अध्यक्षांकडे रवाना केला असून पंजाबच्या हिताचे रक्षण करण्यात तेथील अकाली-भाजपा युतीचे सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा ठपकाही ठेवला आहे. पंजाब सरकारने सतलज-यमुना जोड कालव्याचे बांधकाम हाती घेऊन ते पूर्ण करावे आणि या जोड कालव्यातील पाणी हरयाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि चंदिगड यांच्याशी वाटून घ्यावे असा करार करण्यात आला होता. पण कराराचे पालन करण्याबाबत पंजाब सरकार टंगळमंगळ करीत असल्याचे पाहून हरयाणा सरकार २००२ साली सर्वोच्च न्यायालयात धाऊन गेले आणि न्यायालयाने पंजाब सरकारला योग्य ती समज दिली. त्यावर आपल्याला या जबाबदारीतून मोकळे करावे अशी याचिका २००४मध्ये पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली, पण ती फेटाळली गेली. त्यानंतरच सदरहू एकतर्फी ठराव संमत केला गेला. तसे करताना एकाच वेळी करार तर मोडीत काढलात गेला पण सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या निर्देशांचीही अवमानना केली गेली. करार मोडीत काढणारा ठराव मंजूर केला गेला तेव्हां पंजाबात काँग्रेसचे सरकार होते व कॅप्टन अमरिंदरसिंग हेच मुख्यमंत्री होते. केन्द्रातदेखील काँग्रेसचीच राजवट होती. अर्थात त्यानंतर सत्तेत आलेल्या अकाली-भाजपा सरकारनेदेखील कराराचे पालन करण्याच्या दृष्टीने आपणहून कोणतीही हालचाल केली नाही. ते शक्यही नव्हते. कारण काँग्रेस सरकारने पंजाबच्या जनतेच्या भल्याचा विचार करुन घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात कोणतेच सरकार जाऊ शकत नव्हते. तथापि न्यायालयासमोर पंजाबची भूमिका मांडण्यात विद्यमान सरकार अपयशी ठरल्याचा स्पष्ट आरोप काँग्रेसने केल्यामुळे तेथील राजकीय सुंदोपसुंदीला जोर चढेल यात शंका नाही. विशेषत: पंजाब विधानसभेची निवडणूक आता थेट सीमेपाशी आली असून निवडणुकीचे वातावरण तापण्यास तशीही अगोदरपासूनच सुरुवात झाली आहे. दक्षिणेतील कावेरीच्या पाण्याचा वाद तसाच लोबकळत पडलेला असताना आणि महाराष्ट्रातही पाणी वाटपाचा प्रश्न आज ना उद्या उग्र होण्याची लक्षणे असताना केन्द्रातील सरकारच्या डोकोदुखीत यातून वाढच होत जाणार आहे.