शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

शिवध्यासाने धगधगणारे अग्निकुंड शांत झाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 05:53 IST

बाबासाहेब पुरंदरे यांची कळवळ मुकी नव्हती. तिला मदतीचे हात होते. समाजाला ते सतत देत राहिले. हे देणं कधीच फिटणार नाही...

ठळक मुद्देबाबासाहेबांची एक बहीण नागपूरला होती. ती बाबासाहेबांना म्हणाली, ‘बाबासाहेब, तुम्ही शिवचरित्राचा अभ्यास करताय. एक व्याख्यान नागपूरला द्या.’ बाबासाहेब नाही म्हणण्याच्या तयारीत असताना त्या म्हणाल्या

प्रा. मिलिंद जोशी

बाबासाहेबांची प्राणज्योत मालवली आणि  शिवशाहिरीचे एक तेजस्वी पर्व लोपले. आयुष्यभर शिवध्यासाने धगधगणारे एक अग्निकुंड शांत झाले. त्यामुळे इतिहासही क्षणभर थबकला असेल. ‘शिवशाहीर’ हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभे राहतात ते हजारोंच्या जनसमुदायाला शिवचरित्राची मोहिनी घालणारे श्रीमंत बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे. गोष्टी सांगण्याची त्यांना लहानपणापासूनच आवड होती. ही कला बाबासाहेब शिकले ते त्यांच्या वडिलांकडून. बाबासाहेबांनी आयुष्यातले पहिले भाषण वयाच्या आठव्या वर्षी केले. ताथवडे हे त्यांचे आजोळ, तिथे नृसिंहाचे सुंदर मंदिर आहे. त्या मंदिरात नृसिंह जयंतीचा उत्सव साजरा व्हायचा तो थाटामाटात. त्या उत्सवासाठी बाबासाहेब आईबरोबर मामांकडे जायचे. नृसिंह जयंतीच्या दिवशी एका कीर्तनकाराचे नृसिंह अवतारावर सुंदर कीर्तन व्हायचे. त्या कीर्तनकाराला त्यावेळी दोन रुपये बिदागी मिळायची. त्या दोन रुपयांतूनच त्याने पेटी आणि तबला वाजविणाऱ्या कलाकारांची बिदागी द्यायची, असा सगळा मामला असायचा. त्यावर्षी नृसिंह जन्माची वेळ जवळ आली तरी कीर्तनकाराचा पत्ता नव्हता. सगळे लोक अस्वस्थ होते. मामांच्या जिवाची घालमेल सुरु होती. कारण त्या उत्सवाचे यजमानपद त्यांच्याकडे होते. त्यांच्या इभ्रतीला साजेसा उत्सव त्यांनी आजवर केला होता. हाफ चड्डी आणि शर्ट घातलेले पोरसवदा बाबासाहेब हे सारे पाहत होते. त्यांचे मामा त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, ‘तुला नृसिंह जन्माची गोष्ट माहीत आहे ना? , ती तू सांग.’

बाबासाहेब गडबडलेच, कारण त्यांना नुसती गोष्ट येत होती. कीर्तनकार जसे पूर्वरंग आणि उत्तररंग अशा दोन भागात कीर्तन करीत, तसे त्यांना जमणे शक्य नव्हते. आपला आवाज चांगला नाही, तालाचे आणि वाद्याचे ज्ञान नाही असे त्यांना वाटत होते.  त्यामुळे कीर्तनकारासारखी गोष्ट कशी सांगायची, असा प्रश्न बाबासाहेबांना पडला होता. धीर देत मामा म्हणाले, ‘तुला जशी गोष्ट सांगता येते तशी तू सांग. त्या कीर्तनकाराप्रमाणेच सांगितली पाहिजे असा आग्रह नाही.’ इतर लोकांनीही त्यांना खूप आग्रह केला. प्रोत्साहन दिले. मनाची हिंमत करून बाबासाहेब उठले. त्यांनी साभिनय नृसिंह जन्माची गोष्ट सांगितली. लोकांना ती खूप आवडली. लोकांनी अक्षरशः टाळ्यांचा कडकडाट केला. ते बाबासाहेबांचे पहिले जाहीर भाषण. खांबातून प्रकटलेल्या नृसिंहाने प्रल्हादाचा छळ करणाऱ्या हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन स्वतःच्या नखांनी त्याचे पोट फाडले आणि त्याचा कोथळा बाहेर काढला, हा प्रसंग बाबासाहेबांनी इतक्या तन्मयतेने सांगितला की, लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. या प्रसंगाने शिवचरित्र व्याख्यानरुपाने कथन करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.

बाबासाहेबांची एक बहीण नागपूरला होती. ती बाबासाहेबांना म्हणाली, ‘बाबासाहेब, तुम्ही शिवचरित्राचा अभ्यास करताय. एक व्याख्यान नागपूरला द्या.’ बाबासाहेब नाही म्हणण्याच्या तयारीत असताना त्या म्हणाल्या, ‘तुम्ही नाही म्हणालात तर, लोक काय म्हणतील?’ त्या असं बोलल्यामुळे बाबासाहेबांना नकार देणे अवघड झाले. त्यांच्या बहिणीचे भगिनी मंडळ होते. ते मंडळ आणि नागपुरातील सीताबर्डी भागातील राजाराम सीताराम लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने ते व्याख्यान झाले. लोकांना शिवचरित्र ऐकायला खूप आवडते, याचा त्या दिवशी बाबासाहेबांना प्रत्यय आला आणि शिवचरित्र कथन हा त्यांचा ध्यास आणि श्वास बनला. इतिहासाकडून नेमकं काय शिकायचं याची संथा शिवशाहिरांनी दिली. अव्याभिचारी जीवननिष्ठा, घोर तपश्चरण, सातत्य आणि वक्तशीरपणा या सूत्रातले शिवशाहिरांचे जीवन हीच एक मूर्तिमंत गाथा होती. हा इतिहासपुत्र कमालीचा हळवा होता. पीडितांना पाहून कळवळणाऱ्या शिवशाहिरांची कळवळ मुकी नव्हती. तिला मदतीचे हात होते. समाजाला ते सतत देत राहिले. हे देणं कधीच फिटणार नाही.बाबासाहेबांनी शंभरीत पदार्पण केले, पण त्यांची   शतकपूर्ती होऊ शकली नाही याची खंत महाराष्ट्राला नक्कीच राहील. बाबासाहेब ज्या तपाच्या वाटेने गेले ती वाट चोखाळणे हीच  त्यांना खरी आदरांजली ठरेल.

(लेखक, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष आहेत)joshi.milind23@gmail.com

टॅग्स :Babasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेnagpurनागपूर