शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

कामचुकारपणावर बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 5:08 AM

कमला मिलमधील दोन रेस्टोपबच्या आगीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने पालिकेच्या तीन विभागांनी जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नसल्याचा निष्कर्ष काढून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे.

कमला मिलमधील दोन रेस्टोपबच्या आगीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने पालिकेच्या तीन विभागांनी जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नसल्याचा निष्कर्ष काढून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे. ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजोस बिस्ट्रो’मध्ये ज्या पद्धतीने ही आग भडकली होती आणि बाहेर पडता न आल्याने होरपळून, गुदमरून ग्राहकांचा बळी गेला होता; ते पाहता सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यावर खरे तर पालिकेनेच कठोर कारवाई करणे अपेक्षित होते. पण न्यायालयाच्या समितीने इमारत प्रस्ताव, अग्निशमन आणि आरोग्य विभागावर बोट ठेवत त्यांनी पुरेशी खातरजमा न करता परवाने दिल्याचा निष्कर्ष काढला. आधी जे परवाने दिले होते त्यातील त्रुटी दूर झाल्याची खात्री न करता परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले. इमारत प्रस्ताव विभागाच्या परवानगीपूर्वीच उपाहारगृहाला परवानगी देण्यात आली; आवारातील बांधकाम वाढवणे - तेथे बदल करण्यास मुभा देण्यात आल्याबद्दल समितीने स्पष्टीकरण मागवले आहे. कळीचा मुद्दा म्हणजे आग लागल्यास बाहेर पडण्यासाठी पुरेशी जागा आहे की नाही, आगीची सूचना देणाऱ्या यंत्रणा बसवल्या आहेत की नाही याची खातरजमाही केली नसल्याकडे समितीने वेधलेले लक्ष. मूलभूत बाबींची पूर्तता नसतानाही परवाने का, कसे, कोणत्या परिस्थितीत, कुणाच्या सांगण्यावरून दिले गेले याचे उत्तर या विभागांना द्यावे लागेल आणि त्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही, म्हणजेच वेळकाढूपणा करता येणार नाही, हे महत्त्वाचे. या आगीत १४ जणांचा बळी गेल्यानंतरही दोषी स्पष्ट होत नव्हते किंवा होऊ दिले जात नव्हते. त्यामुळे या समितीपुढील चौकशीत जबाबदारी निश्चित होईल आणि पालिकेतील विभागांना फार काळ परस्परांवर जबाबदारी ढकलण्याचा खेळ खेळता येणार नाही, हेही दिलासादायक आहे. या रेस्टोपबमधील आगीची दुर्घटना ही मुंबईतील पहिली घटना नव्हे. यापूर्वीही वेगवेगळ्या दुर्घटनांत यंत्रणांची हलगर्जी उघड झाली होती. अनेक उपाहारगृहे नियम धाब्यावर बसवून उभी असल्याचे या दुर्घटनेनंतर पालिकेने मान्य केले, काही काळ कारवाई झाली; त्यानंतर जैसे थे परिस्थिती राहिली. यात अनेकांचे हात गुंतलेले असल्याने जबाबदारी निश्चित करून संबंधितांना दोषी ठरवण्यात कायमच चालढकल केली गेली. तीच मुंबईकरांच्या जिवावर बेतते आहे. या प्रकरणातून दोषी कोण ते स्पष्ट होण्याबरोबरच पुन्हा या पद्धतीने कुणाचा जीव जाणार नाही, यासाठी नियम पाळण्यावर भर दिला; तरी आजवर जे जे आगीत होरपळले त्यांच्या जखमेवर हलकीशी फुंकर मारली जाईल.