शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
3
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
4
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
5
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
6
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
7
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
8
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
9
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
10
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
11
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
12
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
13
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
14
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
15
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
17
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
18
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
19
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
20
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...

वाळू संकटमुक्तीचा मार्ग सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 1:00 AM

वाळू माफिया आणि त्यांच्या कारनाम्यांवर नेहमीच चर्चा होते. आता मात्र वाळूटंचाईच्या संकटमोचनाचा मार्ग बांधकाम क्षेत्र शोधू लागले आहे.

- राजा मानेवाळू माफिया आणि त्यांच्या कारनाम्यांवर नेहमीच चर्चा होते. आता मात्र वाळूटंचाईच्या संकटमोचनाचा मार्ग बांधकाम क्षेत्र शोधू लागले आहे.गेल्या दोन दशकांत महाराष्टÑात वाळू उपसा आणि त्याअनुषंगाने जन्मास आलेल्या वाळू तस्करीचे संकट टप्प्याटप्प्याने मोठे होत गेले. त्यातूनच वाळू तस्करीच्या अक्षरश: टोळ्या निर्माण झाल्या आणि करोडोंच्या अर्थकारणासह प्रशासन व राजकारणातही धुमाकूळ घालू लागल्या. वाळू लिलाव पद्धती, पर्यावरणविषयक मुद्यांना दिली जाणारी बगल, प्रचंड प्रमाणात महसूल बुडवून उपसली जाणारी वाळू, बेकायदेशीर वाळू व्यवहाराला संरक्षण देण्यासाठी नैसर्गिकरीत्या तयार झालेले नोटांच्या इशाऱ्यावर नाचणारे कवच आणि शासनाच्या विकास योजनांबरोबरच सर्वच स्तरातील लोकांच्या घरबांधणीसाठी लागणाºया वाळू उपलब्धतेत निर्माण होणारे अडथळे आदी प्रश्नांनी नेहमीच सर्व घटकांना त्रास दिलेला आहे.हरित लवादाने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी नद्यांसह अनेक पाणीप्रवाह क्षेत्रातील वाळू उपशासाठी निश्चित स्वरूपाचे नियम ठरविले आहेत. वाहत्या पाण्याखालील वाळू न काढण्यापासून जागतिक स्तरावर विकसित झालेल्या उपसा यंत्रांवर विशिष्ट स्वरूपाचे निर्बंध घालण्यापर्यंतची काळजी लवादाने घेतली. त्या काळजीचा भाग म्हणून महसुली यंत्रणेनेही अनेक ठिकाणी कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. याच अंमलबजावणीला छेद देण्याचे काम वाळू तस्करांनी निर्माण केलेल्या भ्रष्ट यंत्रणेने केल्याचे दिसून येते. दुर्दैवाने या यंत्रणेत काही शासकीय हातही सहभागी झाले आणि ही यंत्रणा म्हणजेच वाळू वितरण पद्धती असे सूत्र बनले. या सूत्राला बदलून टाकण्याचा प्रयत्न अनेक चांगल्या अधिकाºयांनी केल्याचे उदाहरणेही आपण अनुभवली. अशा कर्तबगार कर्मचारी-अधिकाºयांना चिरडण्याचे प्रयत्न झाले. या पार्श्वभूमीवर पर्यावरणवादी, घरबांधणीसाठी वाळूची गरज असलेला सर्वसामान्य माणूस, मोठे शासकीय कंत्राटदार आणि बिल्डर्स यांना सुलभरीत्या वाळू मिळविणे जिकिरीचे बनले.पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील वाळू उपसा बंद करण्याच्या न्यायालयीन आदेशाने सर्वच घटकांची कोंडी झाली होती. हरित लवादाचे निकष आणि वाळू लिलाव प्रक्रिया पद्धतीतील सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतरच वाळूची उपलब्धता होण्याचा मार्ग कायद्याने ठरविला आहे. त्याच मार्गाने जाऊन वाळू उपलब्ध करून घेणे एवढाच पर्याय सध्या उरलेला आहे.एकट्या सोलापूर जिल्ह्याचे उदाहरण घेतले तरी राज्याच्या मानगुटीवर बसलेल्या वाळूच्या संकटाची कल्पना आपल्याला येईल. सोलापूर शहर व जिल्ह्यात उड्डाणपूल आणि अनेक रस्त्यांच्या तब्बल २५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची फक्त घोषणाच नव्हे तर काही कामांचे भूमिपूजन करण्याचे कामही केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. घरबांधणीसह सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे प्रकल्प आज वाळूअभावी ठप्प आहेत. या क्षेत्रावर अवलंबून असणाºया १५ हजार कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्नही तेवढाच गंभीर बनलेला आहे. सामान्य माणसाच्या घराचे स्वप्न वाळूअभावी अधुरेच राहत असताना येत्या दोन वर्षांत लागणारी सहा लाख ब्रास वाळू कशी मिळणार आणि वाळू संकटमोचनाचा मार्ग कसा सापडणार, हाच खरा प्रश्न आहे.