शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

बुडत्याचा पाय खोलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 21:46 IST

जळगावातील महापालिकेच्या व्यापारी संकुलांच्या गाळेकराराचा विषय मार्गी लागण्याऐवजी चिघळत चालला आहे. संवाद आणि समन्वयाचा मार्ग सोडून प्रत्येक घटक अधिकार आणि हक्काचा सूर आळवत आहे.

जळगावातील महापालिकेच्या व्यापारी संकुलांच्या गाळेकराराचा विषय मार्गी लागण्याऐवजी चिघळत चालला आहे. संवाद आणि समन्वयाचा मार्ग सोडून प्रत्येक घटक अधिकार आणि हक्काचा सूर आळवत आहे. जिल्हा न्यायालयापासून तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा विषय पोहोचला. गाळेधारकांच्या धरसोडीच्या भूमिकेमुळे गुंतागुंत अधिक वाढत आहे. गटतटात विभागलेल्या गाळेधारकांमध्ये एकवाक्यतेचा अभाव असल्याने कुणी न्यायालयात जातोय, कुणी मंत्रालयात जातोय तर कुणी महापालिकेत जाऊन हरकत कायम ठेवून भाड्याच्या थकबाकीची काही रक्कम जमा करीत आहेत. राजकारण शिरल्याने हा विषय भरकटला हे आता गाळेधारकदेखील मान्य करतील. मुळात विषय असा होता, की महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेकराराची मुदत संपल्यानंतर नवीन करार आणि नवा भाडेदर ठरविणे क्रमप्राप्त होते. दर किती असावा आणि करार किती वर्षांचा असावा हा महत्त्वाचा मुद्दा होता. दर कमी आणि मुदत अधिक हवी, अशी लाभार्थी म्हणून गाळेधारकांची अपेक्षा गैर म्हणता येणार नाही. परंतु गाळेधारकांमधील काही नेते आणि राजकीय नेत्यांची मिलिभगत झाली आणि या विषयाने वळण घेतले. महापालिकेतील सत्ताधारी मंडळींना अडचणीत आणण्याची संधी राजकीय मंडळींना मिळाली आणि त्यांनी गाळेधारकांना खोटे आश्वासने देत भुलविले. राज्यातील सत्तेचा लाभ घेत महापालिकेच्या ठरावांना आडकाठी आणणे, अडवणूक करणे असे प्रकार सुरू झाले. हुडको आणि जिल्हा बँकेच्या कर्जाच्या बोजामुळे महापालिका आर्थिक अडचणीत असताना पाच वर्षांपासून या गाळ्यांचे भाडे थकले. त्यातून महापालिका जळगावकरांना मूलभूत सोयी-सुविधा देण्यात असमर्थ ठरत आहे. पाच लाख जळगावकर नागरिक या राजकारणामुळे वेठीस धरले गेले. उच्च न्यायालयाने सुस्पष्ट निर्देश दिल्यानंतर राजकारण करणारे तोंडघशी पडले. प्रशासनाने न्यायालयाच्या निकालानुसार कार्यवाहीस सुरुवात केली असताना आता मंत्रालयात खेटे घालून त्यात आडकाठी आणण्याचे उद्योग पुन्हा सुरू झाले आहेत. गाळेधारकांना झालेली भाडेआकारणी जास्त वाटत असेल तर त्यांनी सनदशीर मार्गाने जायला हवे. परंतु हा प्रश्न चिघळत ठेवल्यास जळगावकरांची सहानुभूती ते गमावून बसतील. परंतु राजकीय मंडळींना ७ महिन्यांवर आलेली महापालिकेची निवडणूक खुणावत आहे. हा प्रश्न सुटल्यास महापालिकेच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होईल. असे झाले तर महापालिका नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यास समर्थ होऊ शकेल. मात्र यामुळे ‘सतरा मजली’वर कब्जा करण्याचे स्वप्न दुभंगेल, या भीतीने आता राजकीय मंडळींकडून दबावतंत्रापासून षड्यंत्रापर्यंत ना ना क्लृप्त्या सुरू झाल्या आहेत. मग अधिकाºयाच्या बदलीपासून तर गाळेधारकांना भडकावण्यापर्यंत करामती केल्या जात आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिका