शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

बुडत्याचा पाय खोलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 21:46 IST

जळगावातील महापालिकेच्या व्यापारी संकुलांच्या गाळेकराराचा विषय मार्गी लागण्याऐवजी चिघळत चालला आहे. संवाद आणि समन्वयाचा मार्ग सोडून प्रत्येक घटक अधिकार आणि हक्काचा सूर आळवत आहे.

जळगावातील महापालिकेच्या व्यापारी संकुलांच्या गाळेकराराचा विषय मार्गी लागण्याऐवजी चिघळत चालला आहे. संवाद आणि समन्वयाचा मार्ग सोडून प्रत्येक घटक अधिकार आणि हक्काचा सूर आळवत आहे. जिल्हा न्यायालयापासून तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा विषय पोहोचला. गाळेधारकांच्या धरसोडीच्या भूमिकेमुळे गुंतागुंत अधिक वाढत आहे. गटतटात विभागलेल्या गाळेधारकांमध्ये एकवाक्यतेचा अभाव असल्याने कुणी न्यायालयात जातोय, कुणी मंत्रालयात जातोय तर कुणी महापालिकेत जाऊन हरकत कायम ठेवून भाड्याच्या थकबाकीची काही रक्कम जमा करीत आहेत. राजकारण शिरल्याने हा विषय भरकटला हे आता गाळेधारकदेखील मान्य करतील. मुळात विषय असा होता, की महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेकराराची मुदत संपल्यानंतर नवीन करार आणि नवा भाडेदर ठरविणे क्रमप्राप्त होते. दर किती असावा आणि करार किती वर्षांचा असावा हा महत्त्वाचा मुद्दा होता. दर कमी आणि मुदत अधिक हवी, अशी लाभार्थी म्हणून गाळेधारकांची अपेक्षा गैर म्हणता येणार नाही. परंतु गाळेधारकांमधील काही नेते आणि राजकीय नेत्यांची मिलिभगत झाली आणि या विषयाने वळण घेतले. महापालिकेतील सत्ताधारी मंडळींना अडचणीत आणण्याची संधी राजकीय मंडळींना मिळाली आणि त्यांनी गाळेधारकांना खोटे आश्वासने देत भुलविले. राज्यातील सत्तेचा लाभ घेत महापालिकेच्या ठरावांना आडकाठी आणणे, अडवणूक करणे असे प्रकार सुरू झाले. हुडको आणि जिल्हा बँकेच्या कर्जाच्या बोजामुळे महापालिका आर्थिक अडचणीत असताना पाच वर्षांपासून या गाळ्यांचे भाडे थकले. त्यातून महापालिका जळगावकरांना मूलभूत सोयी-सुविधा देण्यात असमर्थ ठरत आहे. पाच लाख जळगावकर नागरिक या राजकारणामुळे वेठीस धरले गेले. उच्च न्यायालयाने सुस्पष्ट निर्देश दिल्यानंतर राजकारण करणारे तोंडघशी पडले. प्रशासनाने न्यायालयाच्या निकालानुसार कार्यवाहीस सुरुवात केली असताना आता मंत्रालयात खेटे घालून त्यात आडकाठी आणण्याचे उद्योग पुन्हा सुरू झाले आहेत. गाळेधारकांना झालेली भाडेआकारणी जास्त वाटत असेल तर त्यांनी सनदशीर मार्गाने जायला हवे. परंतु हा प्रश्न चिघळत ठेवल्यास जळगावकरांची सहानुभूती ते गमावून बसतील. परंतु राजकीय मंडळींना ७ महिन्यांवर आलेली महापालिकेची निवडणूक खुणावत आहे. हा प्रश्न सुटल्यास महापालिकेच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होईल. असे झाले तर महापालिका नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यास समर्थ होऊ शकेल. मात्र यामुळे ‘सतरा मजली’वर कब्जा करण्याचे स्वप्न दुभंगेल, या भीतीने आता राजकीय मंडळींकडून दबावतंत्रापासून षड्यंत्रापर्यंत ना ना क्लृप्त्या सुरू झाल्या आहेत. मग अधिकाºयाच्या बदलीपासून तर गाळेधारकांना भडकावण्यापर्यंत करामती केल्या जात आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिका