शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

माणसातच देव शोधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 00:50 IST

धार्मिक स्थळांकडून जमा होणारा निधी विदर्भातील बालगृहांच्या विकासासाठी वापरण्याचा आदेश देऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागरिकांना सामाजिक बांधिलकीचा नवा वस्तूपाठ घालून दिला आहे.

धार्मिक स्थळांकडून जमा होणारा निधी विदर्भातील बालगृहांच्या विकासासाठी वापरण्याचा आदेश देऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागरिकांना सामाजिक बांधिलकीचा नवा वस्तूपाठ घालून दिला आहे. विदर्भातील शासकीय बालगृहांमधील पायाभूत व शैक्षणिक सुविधांसाठी हा सव्वा कोटीचा निधी कामी येणार आहे. बालगृहांची दैनावस्था कुणापासून लपलेली नाही. त्यामुळे न्यायालयाच्या सांगण्यानुसार या पैशाचा योग्य उपयोग झाल्यास या देशाचे भविष्य असलेल्या बालकांचे जीवन काही प्रमाणात तरी उजळून निघेल, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने या निधीचे व्यवस्थापन आणि वितरणासाठी एक तीन सदस्यीय समितीही स्थापन केली आहे. अतिक्रमण कारवाईला ज्या दीड हजार धार्मिक स्थळांनी आक्षेप घेतला त्यांना प्रत्येकी ६० हजार रुपये भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दुसरीकङे धार्मिक स्थळांवरील कारवाईमुळे सध्या उपराजधानीत रान पेटले आहे. विशेष म्हणजे एरवी एकमेकांवर कुरघोडी करणारे राजकीय पक्षही या मुद्यावर एकत्र आले आहेत. जनतेच्या हिताचे निर्णय घेताना हेच राजकीय पक्ष असे ऐक्य का दाखवीत नाहीत? असा प्रश्न पडतो. या पक्षांनी अतिक्रमित धार्मिक स्थळांच्या बचावासाठी मोर्चा उघडला असून, ठरावाचे अस्त्र उपसले आहे. परिसरातील नागरिकांना मन:शांतीकरिता धार्मिक स्थळ जवळ असणे ही सर्वधर्मीयांची गरज असल्याचे कारण यासाठी पुढे करण्यात आले आहे. यासंदर्भात स्वामी विवेकानंदांनी फार चांगले सांगितलेय. ते म्हणतात, ज्यांचा स्वत:वर विश्वास असतो तो आस्तिक आणि विश्वास नसतो तो नास्तिक. ही स्वत:वर विश्वास नसलेली माणसं कर्मकांडाच्या आहारी जातात अन् मग माणूसधर्म सोडून मूर्तिपूजा हाच त्यांचा धर्म बनतो. अतिक्रमण हटविण्याविरोधात संघर्ष करणाऱ्यांनी आपली ही ऊर्जा समाजातील रंजल्यागांजल्यांच्या उत्थानासाठी खर्ची घातली तर यापेक्षा किती तरी जास्त मनशांती आणि कमालीचे समाधान त्यांना लाभेल, देवत्वाची प्रचिती येईल. याचा अर्थ श्रद्धेला विरोध असा अजिबात नाही. पण ती जपताना असा आक्रस्ताळेपणा बरा नव्हे. मनापासून इच्छा असली तर माणसातच देव शोधता येईल, असे थोरमहात्मे सांगून गेलेत. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयातून आम्ही सर्वांनीच बोध घेतला पाहिजे. आजही आपल्या समाजातील एक मोठा वर्ग अत्यंत दयनीय जीवन जगत आहे. भुकेलेल्यांच्या यादीत हा देश आघाडीवर आहे. राज्यात बालमत्यू वाढताहेत. बालकामगारांची समस्या सुटता सुटत नाहीये. लाखो मुले अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांच्यासाठी खूप काही करण्यासारखे आहे. अखेर माणूसधर्माचे पालन हे मानवी जीवनाचे साध्य आहे. बहिणाबार्इंनी म्हटले, ‘मानसा मानसा कधी व्हशीन मानूस’. त्यांचे हे आवाहन आजही किती प्रासंगिक आहे, याची प्रचिती या संपूर्ण घटनाक्रमातून येते.

टॅग्स :newsबातम्या