शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
3
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
4
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
5
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
6
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
7
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."
8
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
9
Video - "मी तुमच्या मुलीवर उपचार करणार नाही..."; डॉक्टरची रुग्णाच्या वडिलांना मारहाण
10
Vastu Shastra: वास्तु शास्त्रानुसार घराच्या 'या' भागात ठेवा मोरपीस, आयुष्यात भरतील नवे रंग!
11
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
12
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
13
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
14
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
15
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
16
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
17
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
18
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
19
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
20
Ramkesh Murder Case: बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?

माणसातच देव शोधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 00:50 IST

धार्मिक स्थळांकडून जमा होणारा निधी विदर्भातील बालगृहांच्या विकासासाठी वापरण्याचा आदेश देऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागरिकांना सामाजिक बांधिलकीचा नवा वस्तूपाठ घालून दिला आहे.

धार्मिक स्थळांकडून जमा होणारा निधी विदर्भातील बालगृहांच्या विकासासाठी वापरण्याचा आदेश देऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागरिकांना सामाजिक बांधिलकीचा नवा वस्तूपाठ घालून दिला आहे. विदर्भातील शासकीय बालगृहांमधील पायाभूत व शैक्षणिक सुविधांसाठी हा सव्वा कोटीचा निधी कामी येणार आहे. बालगृहांची दैनावस्था कुणापासून लपलेली नाही. त्यामुळे न्यायालयाच्या सांगण्यानुसार या पैशाचा योग्य उपयोग झाल्यास या देशाचे भविष्य असलेल्या बालकांचे जीवन काही प्रमाणात तरी उजळून निघेल, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने या निधीचे व्यवस्थापन आणि वितरणासाठी एक तीन सदस्यीय समितीही स्थापन केली आहे. अतिक्रमण कारवाईला ज्या दीड हजार धार्मिक स्थळांनी आक्षेप घेतला त्यांना प्रत्येकी ६० हजार रुपये भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दुसरीकङे धार्मिक स्थळांवरील कारवाईमुळे सध्या उपराजधानीत रान पेटले आहे. विशेष म्हणजे एरवी एकमेकांवर कुरघोडी करणारे राजकीय पक्षही या मुद्यावर एकत्र आले आहेत. जनतेच्या हिताचे निर्णय घेताना हेच राजकीय पक्ष असे ऐक्य का दाखवीत नाहीत? असा प्रश्न पडतो. या पक्षांनी अतिक्रमित धार्मिक स्थळांच्या बचावासाठी मोर्चा उघडला असून, ठरावाचे अस्त्र उपसले आहे. परिसरातील नागरिकांना मन:शांतीकरिता धार्मिक स्थळ जवळ असणे ही सर्वधर्मीयांची गरज असल्याचे कारण यासाठी पुढे करण्यात आले आहे. यासंदर्भात स्वामी विवेकानंदांनी फार चांगले सांगितलेय. ते म्हणतात, ज्यांचा स्वत:वर विश्वास असतो तो आस्तिक आणि विश्वास नसतो तो नास्तिक. ही स्वत:वर विश्वास नसलेली माणसं कर्मकांडाच्या आहारी जातात अन् मग माणूसधर्म सोडून मूर्तिपूजा हाच त्यांचा धर्म बनतो. अतिक्रमण हटविण्याविरोधात संघर्ष करणाऱ्यांनी आपली ही ऊर्जा समाजातील रंजल्यागांजल्यांच्या उत्थानासाठी खर्ची घातली तर यापेक्षा किती तरी जास्त मनशांती आणि कमालीचे समाधान त्यांना लाभेल, देवत्वाची प्रचिती येईल. याचा अर्थ श्रद्धेला विरोध असा अजिबात नाही. पण ती जपताना असा आक्रस्ताळेपणा बरा नव्हे. मनापासून इच्छा असली तर माणसातच देव शोधता येईल, असे थोरमहात्मे सांगून गेलेत. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयातून आम्ही सर्वांनीच बोध घेतला पाहिजे. आजही आपल्या समाजातील एक मोठा वर्ग अत्यंत दयनीय जीवन जगत आहे. भुकेलेल्यांच्या यादीत हा देश आघाडीवर आहे. राज्यात बालमत्यू वाढताहेत. बालकामगारांची समस्या सुटता सुटत नाहीये. लाखो मुले अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांच्यासाठी खूप काही करण्यासारखे आहे. अखेर माणूसधर्माचे पालन हे मानवी जीवनाचे साध्य आहे. बहिणाबार्इंनी म्हटले, ‘मानसा मानसा कधी व्हशीन मानूस’. त्यांचे हे आवाहन आजही किती प्रासंगिक आहे, याची प्रचिती या संपूर्ण घटनाक्रमातून येते.

टॅग्स :newsबातम्या