शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

गंभीर प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 06:04 IST

स्त्रीला प्रायव्हसीचा पूर्ण अधिकार असायलाच हवा. विवाहित महिला तिच्या पतीच्या मालकीची वस्तू नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने व्यभिचाराचा गुन्हा रद्द करताना नोंदविलेले निरीक्षण सर्वस्वी योग्यच आहे.

भारतीय स्त्री पुरुषांच्या बरोबरीने ताठपणे उभी राहू शकेल, एवढी समर्थ व्हावी, याचे मी नेहमीच ठामपणे समर्थन करीत आलो आहे. महिलांवरली सर्व तºहेचे अत्याचार थांबावेत आणि कायदेमंडळांमध्ये त्यांना ३३ टक्के राखीव जागा मिळाव्यात, या मागण्या मी संसदेत व संसदेबाहेरही मांडल्या आहेत. स्त्रीभ्रूणहत्येविरुद्ध सदैव आवाज उठविला आहे. महिला सशक्त झाल्याखेरीज देशाच्या सर्वंकष विकासाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही, असे मला मनापासून वाटते.

स्त्रीला प्रायव्हसीचा पूर्ण अधिकार असायलाच हवा. विवाहित महिला तिच्या पतीच्या मालकीची वस्तू नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने व्यभिचाराचा गुन्हा रद्द करताना नोंदविलेले निरीक्षण सर्वस्वी योग्यच आहे. महिला स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला स्वतंत्र आहेत. गेली १५८ वर्र्षे दंड विधानामध्ये असलेला व्यभिचाराचा गुन्हा महिलांच्या प्रायव्हसीच्या अधिकारावर घाला घालणारा आहे, असेही न्यायालयाने म्हटले ते बरोबरच आहे. या निकालाच्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, दंड विधानातील जे ४९७ कलम न्यायालयाने घटनाबाह्य ठरवून रद्द केले, त्यात महिलेला दोषी धरण्याची तरतूदच नव्हती. या कलमात फक्त पुरुषाला दोषी मानून शिक्षा करण्याची सोय होती. हे कलम ज्या कृतीला व्यभिचार म्हणून दंडनीय ठरविते, त्यात पुरुषासोबत महिलाही सहभागी होत असल्याने तिलाही दोषी धरले जावे, असे याचिका करणारे जोसेफ शाइन यांचे म्हणणे होते. न्यायालयाने तेवढेच न करता संपूर्ण कलमच दंड विधानातून काढून टाकले. मात्र, व्यभिचार हा घटस्फोटासाठीचा यापुढेही मुद्दा कायम राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. एखाद्या पत्नीने पतीच्या व्यभिचारामुळे आत्महत्या केली, तर मात्र असा व्यभिचार गुन्ह्याच्या कक्षेत येईल.

व्यभिचाराकडे सामाजिक गैरवर्तन म्हणून पाहिले जाऊ नये, अशीही आणखी एक महत्त्वाची बाब न्यायालयाने नोंदविली. सामाजिक संदर्भातून पाहिले, तर असे दिसते की, आपल्याकडे समाजरचनेत कुटुंबसंस्थेला महत्त्वाचे स्थान असल्याने आपली संस्कृती एवढी विकसित झाली. पुरुषसत्ताक विचारसरणीने महिलांवर नक्कीच खूप अत्याचार होत आले आहेत. कोणत्याही सभ्य समाजात याला अजिबात थारा असू शकत नाही. कुटुंबसंस्था टिकवून ठेवण्यात महिलांनीच सर्वात मोठी भूमिका बजावली आहे. एक स्त्री संपूर्ण कुटुंबाला आकार देते, सांभाळते व सावरते, पण पुरुषात ही क्षमता नाही, हे सर्वमान्य सत्य आहे. एवढेच नव्हे, तर संस्कृतीचे खरे रक्षण महिलाच करत असतात. मुलावर पित्याहून आईच अधिक चांगले संस्कार करते. एक पुरुष घर बांधू शकेल, पण त्या घराला घरपण केवळ महिलेमुळेच येते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

पुरुषांना जे अधिकार स्वत:ला हवेसे वाटतात, ते सर्व महिलांनाही मिळायलाच हवेत, पण हेही तेवढेच खरे की, हजारो वर्षांत आकाराला आलेली आपली संस्कृती सोडून आपण पाश्चात्यांचे अंधानुकरण करत गेलो, तर आपल्या संस्कृतीचे माहात्म्य आणि वेगळेपण नष्ट होईल. पाश्चात्य जगात एखादे मूल चार दिवस घरी फिरकले नाही, तरी त्याला कुठे गेला होतास, असे विचारण्याची पद्धत व सोय नाही. आई-वडिलांनी जरा जरी खडसावून विचारले, तर प्रकरण तेथे थेट पोलिसांपर्यंत जाऊन अशा पालकांना अटकही होऊ शकते! आपल्या देशातही असे घडेल, अशी कल्पना आपल्याला करवेल? आणि मी म्हणतो, अशी कल्पना करावी तरी का म्हणून? अजूनही आपली कुटुंबसंस्था शाबूत आहे, याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. परदेशात आई कुठे राहते, वडील कोणासोबत राहतात व मुले कुठे राहतात, याचा काही भरवसा देता येत नाही. तिकडे मुले सणावारी आई-वडिलांना भेटायला जातात.आपली संस्कृती वडीलधाऱ्यांचा आदर करण्याची आहे. पाश्चात्य देशांत मुले शाळेत सिगारेट ओढतात व बंदूक घेऊन शाळेत येतात. त्याचे पाहून आपणही तेच करावे का? दुर्दैवाने आपल्याकडेही हल्ली एक ‘फ्री सोसायटी’ (मुक्त समाज) आकाराला येत आहे. आपणही विदेशी वाटेने जात आहोत की काय? या फ्री सोसायटीत वडील व मुलगा एकत्र बसून मद्यपान करतात. लिव्ह-इन रिलेशन, कुमारी माता, समलिंगी संबंध असे प्रकार आपल्याकडेही उघडपणे सुरू झाले आहेत. यात त्यांना स्वातंत्र्य मिळाल्याचे भूषण वाटते. समाजाचा हा वर्ग विवाह म्हणजे केवळ एक करार मानतो. साहजिकच, त्यांच्यात घटस्फोेटही सर्रास होतात. सुदैवाने बहुसंख्य समाज अजूनही या विकृतींपासून दूर आहे. तो तसाच राहावा, अशी अपेक्षा करू या.मला हे स्पष्ट करायला हवे की, मला पिझ्झा आणि बर्गरशी वैर नाही, पण पिझ्झा आणि बर्गरने संस्कृती बदलू लागली, तर चिंता वाटणे स्वाभाविक आहे. चांगले सुग्रास जेवण मिळावे व घरच्या जेवणाची चव कायम राहावी, यासाठी पूर्वी घरून जेवणाचा डबा दिला जायचा. मला म्हणायचे आहे की, इंग्रजी जरूर शिका, पण मातृभाषेची लाज वाटण्याचे कारण काय? आई आणि माँ यात जे लाघवी ममत्व आहे ते ‘मम्मी’मध्ये नाही, हे समजून घ्यायला हवे. संस्कृती हाच आपला सर्वात बहुमोल वारसा आहे, हे लक्षात ठेवा. तेच गमावून बसलो, तर हाती काहीच उरणार नाही! आधुनिकतेच्या मागे धावण्याने निर्माण होणाºया या प्रश्नांची उत्तरेही समाजालाच शोधायला हवीत.विजय दर्डा

 ( लेखक लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, आहेत.) 

टॅग्स :WomenमहिलाCourtन्यायालय