शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

सण आणि उत्सवही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:27 IST

दिवाळी सण देशाच्या विविध भागात उत्साहाने साजरा होत आहे. हा सण अवघ्या भारताचा. त्यामुळे सर्वत्र दिव्यांची रोषणाई, रंगीबिरंगी रांगोळ्या, ठिकठिकाणी लावलेले आकाशकंदिल, कमी-अधिक प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी, मिठायांचा गोडवा जाणवू लागला आहे.

दिवाळी सण देशाच्या विविध भागात उत्साहाने साजरा होत आहे. हा सण अवघ्या भारताचा. त्यामुळे सर्वत्र दिव्यांची रोषणाई, रंगीबिरंगी रांगोळ्या, ठिकठिकाणी लावलेले आकाशकंदिल, कमी-अधिक प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी, मिठायांचा गोडवा जाणवू लागला आहे. अर्थात दरवर्षी तो या पद्धतीने साजरा होतोच. पण आता दिवाळीचे महत्त्व वाढू लागले आहे. गेल्या काही वर्षांत अंधार दूर करणारा, दिव्यांचा हा सण केवळ भारतापुरता मर्यादित न राहता, जगभर साजरा होऊ लागला आहे. तो केवळ भारतीयांचा वा हिंदूंचा न राहता समस्त मानवजातीचाच बनून गेला आहे. म्हणजेच इतर देश, धर्म यांनीही तो उत्सव म्हणून स्वीकारला आहे. ख्रिसमस हा जसा केवळ ख्रिश्चनांचा राहिला नाही, तशीच दिवाळीही केवळ एकाच धर्माची राहिलेली नाही आणि त्यामुळेच ती जगभर साजरी होताना दिसत आहे. एखाद्या धर्मीयांचा वा देशवासीयांचा कोणताही सण जगभरात उत्सव म्हणून साजरा होणे, ही मोठी बाब म्हणायला हवी. एकेकाळी मुस्लीम राष्ट्र असलेल्या पाकिस्तानमध्ये दिवाळी साजरी करण्यावर बंदी होती. पण तिथेही गेली काही वर्षे दिवाळी साजरी होते. दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफही त्यात सहभागी झाले होते. अनेक मुस्लीम संघटनांची दिवाळीच्या शुभेच्छा देणारी पोस्टर्स तिथे पाहायला मिळतात. श्रीलंका, नेपाळ, म्यानमार, सुरिनाम, मलेशिया, त्रिनिदाद आदी देशात भारतीय वंशाचे लाखो लोक वर्षानुवर्षे राहतात. तिथे ते मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करतातच. पण आता तेथील सरकारांनीही दिवाळीनिमित्त सुटी जाहीर केली आहे. म्हणजे दिवाळी त्या देशांचाही जणू अधिकृत उत्सव झाला आहे. सिंगापूर, इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड, फ्रान्स, जर्मनी, आॅस्ट्रेलिया, स्पेन, अफगाणिस्तान, चीन, रशिया या देशांनाही आता दिवाळी नवी राहिलेली नाही. तिथे असंख्य भारतीय असणे, हे दिवाळी साजरी होण्याचे प्रमुख कारण आहेच. पण तेथील स्थानिक लोक दिवाळीच्या उत्सवात सहभागी होताना, स्वत:हून तेही दिवाळी साजरी करताना दिसणे, ही बाब अधिक आनंददायी. म्हणजे दिवाळी आता हा केवळ सण नव्हे तर उत्सव बनून गेला आहे. एकप्रकारे या उत्सवाचे जागतिकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशनच झाले आहे. दिवाळीच्या काळात या देशांत गेल्यास केवळ भारतीयांच्या वस्त्या व घरांमध्येच नव्हे, तर त्यांच्या राजधानीच्या शहरांमध्येही दिव्यांची रोषणाई दिसते. भारतीय नसलेल्या लोकांच्या घरांवरही आपल्यासारखे विविध रंगांचे आकाशकंदिल लावलेले दिसतात. आयफेल टॉवरपासून, अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअरपर्यंत आणि लंडनच्या ट्रॅफलगर स्क्वेअरपासून न्यूझीलंडमधील आॅकलंडच्या स्काय टॉवरपर्यंत केलेली विद्युत रोषणाई खरोखरच अभूतपूर्व असते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्येही दिवाळीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी अनेक भारतीयांना तसेच विविध देशांच्या राजदूतांना दिवाळी महोत्सवासाठी व्हाईट हाऊसमध्ये निमंत्रित केले होते. थोडक्यात सांगायचे तर दिव्यांचा सण सर्वधर्मीयांनाच हवाहवासा वाटू लागला आहे. आयुष्य अनेकदा अतिशय नीरस असते. त्यातील तोचतोचपणा नकोसा असतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी जीवनात काहीतरी वेगळे हवे असते. त्यामुळेच सण व उत्सवांना अधिक महत्त्व येते. पण बºयाचदा सण जाती-धर्मापुरते मर्यादित राहतात. अशा वेळी एखादा सण उत्सव म्हणून जाती, धर्म, पंथ, प्रांत देश यांच्यापलिकडे जाऊ न साजरा होतो, तेव्हा त्याचा गोडवा वाढतो. दिवाळीचा आनंद द्विगुणित होण्याला आणखी मिळालेले हे कारणच म्हणता येईल.

टॅग्स :diwaliदिवाळीIndiaभारत