शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

साऱ्यांचे पाय मातीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 05:29 IST

दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील धोकादायक, अतिधोकादायक इमारतींना पालिकेकडून इशारे दिले जातात. दरडप्रवण वस्त्यांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यास सुचवले जाते

दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील धोकादायक, अतिधोकादायक इमारतींना पालिकेकडून इशारे दिले जातात. दरडप्रवण वस्त्यांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यास सुचवले जाते. पण यापुढील काळात मुंबईतील टेकड्या, भराव टाकून केलेले भूभाग, पाणथळ जागा, समुद्रकिनाºयांलगतच्या उच्चभ्रू वस्त्यांनाही असेच इशारे द्यावे लागतील की काय, अशी शक्यता वडाळ्यातील घटनेमुळे निर्माण झाली आहे. शेजारच्या बांधकामाचे हादरे आणि खोल कामाच्या खड्ड्यांमुळे बाजूच्या भूखंडाचा भार सहन करू शकेल, अशी यंत्रणा न उभारल्याने लॉइड इस्टेट रिकामे करण्याची वेळ रहिवाशांवर आली. मुंबईतील अनधिकृत इमारतीत घरे घेतल्याने लाखांचे बारा हजार करण्याची वेळ अनेकांवर आली. आता अशा प्रकारे जमिनीचा भार सहन करण्याची ताकद न तपासता जागोजाग उभारल्या जाणाºया टॉवरमुळे भविष्यात कोट्यवधींची घरे घेतलेल्यांवरही याचप्रकारे क्षणात मातीमोल होण्याची वेळ येणार का, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. वडाळ्यात कोसळलेला मातीचा ढिगारा, त्यात गाडलेल्या गाड्या, चिखलाखाली बेपत्ता झालेला आजूबाजूचा परिसर यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला, तो यामुळेच. समुद्राने वेढलेल्या मुंबईची भौगोलिक रचना, तेथे निचरा न होणाºया पाण्यामुळे जमिनीची भार सहन करण्याची क्षमता परिसरनिहाय कमी-जास्त आहे. ज्या पद्धतीने मुंबई गगनचुंबी होते आहे, ते पाहता भविष्यात येथील अभियांत्रिकीला भू-तांत्रिक अभ्यासाची जोड द्यावी लागणार आहे. अशा क्षेत्रात बांधकाम करताना त्याचा जमिनीच्या भार सहन करण्याच्या क्षमतेवर किती आणि कसा परिणाम होणार आहे, हे पालिकेला स्वतंत्रपणे तपासून घ्यावे लागेल. तसेच भोवताली नव्याने खोदकाम करताना हादरे सहन करण्याची त्या जमिनीची क्षमता आहे की नाही, हेही पाहावे लागेल. वडाळ्यात खोदकामामुळे जमिनीचा मोठा भाग सरकला आणि त्याचा तडाखा उंचावरील गृहसंकुलाच्या पार्किंग क्षेत्राला बसला; पण तोच जर इमारतींना बसला असता, तर अनावस्था प्रसंग उद््भवला असता. तेथील रहिवाशांनी या हादºयांची, खोदकामाची तक्रार करूनही पालिकेच्या अधिकाºयांनी त्याची दखल घेतली नसल्याचे आरोप सुरू आहेत.त्यात तथ्य असेल, तर पुन्हा बिल्डर आणि पालिका अधिकाºयांच्या अभद्र युतीवर हे प्रकरण येऊन थांबते. त्याची यथावकाश चौकशी होईल. अहवाल येतील. प्रसंगी कारवाईही होईल. पण यातून गगनचुंबी मुंबईसमोरील भुसभुशीत होणाºया पायाचे आव्हान किती मोठे आहे, याची जाणीव या घटनेमुुळे झाली. हे या महानगरीवरील संकट नव्हे; तर नव्या काळाचे, बदलत्या मुंबईचे आणखी एक आव्हान आहे, असे समजून त्यावर उपाय योजण्याची गरज आहे.