शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : खूप मजा आली... अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

साऱ्यांचे पाय मातीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 05:29 IST

दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील धोकादायक, अतिधोकादायक इमारतींना पालिकेकडून इशारे दिले जातात. दरडप्रवण वस्त्यांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यास सुचवले जाते

दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील धोकादायक, अतिधोकादायक इमारतींना पालिकेकडून इशारे दिले जातात. दरडप्रवण वस्त्यांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यास सुचवले जाते. पण यापुढील काळात मुंबईतील टेकड्या, भराव टाकून केलेले भूभाग, पाणथळ जागा, समुद्रकिनाºयांलगतच्या उच्चभ्रू वस्त्यांनाही असेच इशारे द्यावे लागतील की काय, अशी शक्यता वडाळ्यातील घटनेमुळे निर्माण झाली आहे. शेजारच्या बांधकामाचे हादरे आणि खोल कामाच्या खड्ड्यांमुळे बाजूच्या भूखंडाचा भार सहन करू शकेल, अशी यंत्रणा न उभारल्याने लॉइड इस्टेट रिकामे करण्याची वेळ रहिवाशांवर आली. मुंबईतील अनधिकृत इमारतीत घरे घेतल्याने लाखांचे बारा हजार करण्याची वेळ अनेकांवर आली. आता अशा प्रकारे जमिनीचा भार सहन करण्याची ताकद न तपासता जागोजाग उभारल्या जाणाºया टॉवरमुळे भविष्यात कोट्यवधींची घरे घेतलेल्यांवरही याचप्रकारे क्षणात मातीमोल होण्याची वेळ येणार का, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. वडाळ्यात कोसळलेला मातीचा ढिगारा, त्यात गाडलेल्या गाड्या, चिखलाखाली बेपत्ता झालेला आजूबाजूचा परिसर यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला, तो यामुळेच. समुद्राने वेढलेल्या मुंबईची भौगोलिक रचना, तेथे निचरा न होणाºया पाण्यामुळे जमिनीची भार सहन करण्याची क्षमता परिसरनिहाय कमी-जास्त आहे. ज्या पद्धतीने मुंबई गगनचुंबी होते आहे, ते पाहता भविष्यात येथील अभियांत्रिकीला भू-तांत्रिक अभ्यासाची जोड द्यावी लागणार आहे. अशा क्षेत्रात बांधकाम करताना त्याचा जमिनीच्या भार सहन करण्याच्या क्षमतेवर किती आणि कसा परिणाम होणार आहे, हे पालिकेला स्वतंत्रपणे तपासून घ्यावे लागेल. तसेच भोवताली नव्याने खोदकाम करताना हादरे सहन करण्याची त्या जमिनीची क्षमता आहे की नाही, हेही पाहावे लागेल. वडाळ्यात खोदकामामुळे जमिनीचा मोठा भाग सरकला आणि त्याचा तडाखा उंचावरील गृहसंकुलाच्या पार्किंग क्षेत्राला बसला; पण तोच जर इमारतींना बसला असता, तर अनावस्था प्रसंग उद््भवला असता. तेथील रहिवाशांनी या हादºयांची, खोदकामाची तक्रार करूनही पालिकेच्या अधिकाºयांनी त्याची दखल घेतली नसल्याचे आरोप सुरू आहेत.त्यात तथ्य असेल, तर पुन्हा बिल्डर आणि पालिका अधिकाºयांच्या अभद्र युतीवर हे प्रकरण येऊन थांबते. त्याची यथावकाश चौकशी होईल. अहवाल येतील. प्रसंगी कारवाईही होईल. पण यातून गगनचुंबी मुंबईसमोरील भुसभुशीत होणाºया पायाचे आव्हान किती मोठे आहे, याची जाणीव या घटनेमुुळे झाली. हे या महानगरीवरील संकट नव्हे; तर नव्या काळाचे, बदलत्या मुंबईचे आणखी एक आव्हान आहे, असे समजून त्यावर उपाय योजण्याची गरज आहे.