शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

साऱ्यांचे पाय मातीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 05:29 IST

दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील धोकादायक, अतिधोकादायक इमारतींना पालिकेकडून इशारे दिले जातात. दरडप्रवण वस्त्यांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यास सुचवले जाते

दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील धोकादायक, अतिधोकादायक इमारतींना पालिकेकडून इशारे दिले जातात. दरडप्रवण वस्त्यांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यास सुचवले जाते. पण यापुढील काळात मुंबईतील टेकड्या, भराव टाकून केलेले भूभाग, पाणथळ जागा, समुद्रकिनाºयांलगतच्या उच्चभ्रू वस्त्यांनाही असेच इशारे द्यावे लागतील की काय, अशी शक्यता वडाळ्यातील घटनेमुळे निर्माण झाली आहे. शेजारच्या बांधकामाचे हादरे आणि खोल कामाच्या खड्ड्यांमुळे बाजूच्या भूखंडाचा भार सहन करू शकेल, अशी यंत्रणा न उभारल्याने लॉइड इस्टेट रिकामे करण्याची वेळ रहिवाशांवर आली. मुंबईतील अनधिकृत इमारतीत घरे घेतल्याने लाखांचे बारा हजार करण्याची वेळ अनेकांवर आली. आता अशा प्रकारे जमिनीचा भार सहन करण्याची ताकद न तपासता जागोजाग उभारल्या जाणाºया टॉवरमुळे भविष्यात कोट्यवधींची घरे घेतलेल्यांवरही याचप्रकारे क्षणात मातीमोल होण्याची वेळ येणार का, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. वडाळ्यात कोसळलेला मातीचा ढिगारा, त्यात गाडलेल्या गाड्या, चिखलाखाली बेपत्ता झालेला आजूबाजूचा परिसर यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला, तो यामुळेच. समुद्राने वेढलेल्या मुंबईची भौगोलिक रचना, तेथे निचरा न होणाºया पाण्यामुळे जमिनीची भार सहन करण्याची क्षमता परिसरनिहाय कमी-जास्त आहे. ज्या पद्धतीने मुंबई गगनचुंबी होते आहे, ते पाहता भविष्यात येथील अभियांत्रिकीला भू-तांत्रिक अभ्यासाची जोड द्यावी लागणार आहे. अशा क्षेत्रात बांधकाम करताना त्याचा जमिनीच्या भार सहन करण्याच्या क्षमतेवर किती आणि कसा परिणाम होणार आहे, हे पालिकेला स्वतंत्रपणे तपासून घ्यावे लागेल. तसेच भोवताली नव्याने खोदकाम करताना हादरे सहन करण्याची त्या जमिनीची क्षमता आहे की नाही, हेही पाहावे लागेल. वडाळ्यात खोदकामामुळे जमिनीचा मोठा भाग सरकला आणि त्याचा तडाखा उंचावरील गृहसंकुलाच्या पार्किंग क्षेत्राला बसला; पण तोच जर इमारतींना बसला असता, तर अनावस्था प्रसंग उद््भवला असता. तेथील रहिवाशांनी या हादºयांची, खोदकामाची तक्रार करूनही पालिकेच्या अधिकाºयांनी त्याची दखल घेतली नसल्याचे आरोप सुरू आहेत.त्यात तथ्य असेल, तर पुन्हा बिल्डर आणि पालिका अधिकाºयांच्या अभद्र युतीवर हे प्रकरण येऊन थांबते. त्याची यथावकाश चौकशी होईल. अहवाल येतील. प्रसंगी कारवाईही होईल. पण यातून गगनचुंबी मुंबईसमोरील भुसभुशीत होणाºया पायाचे आव्हान किती मोठे आहे, याची जाणीव या घटनेमुुळे झाली. हे या महानगरीवरील संकट नव्हे; तर नव्या काळाचे, बदलत्या मुंबईचे आणखी एक आव्हान आहे, असे समजून त्यावर उपाय योजण्याची गरज आहे.