शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

विशेष लेख: अन्वयार्थ >> समुद्राखालच्या तारा ठरवतात आपले डिजिटल अस्तित्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 11:02 IST

१४ दशलक्ष किलोमीटर लांबीच्या ५५२ तारा समुद्राखालून गेलेल्या आहेत. जगाचे इंटरनेट सुरळीत राहावे यासाठी ६० जहाजे नेहमीच सज्ज असतात.

साधना शंकर, लेखिका, केंद्रीय राजस्व सेवेतील निवृत्त अधिकारी

तांबड्या समुद्राखालील तारा तुटल्यामुळे आशिया आणि आफ्रिकेतील इंटरनेट सेवा खंडित होत आहे. इंटरनेटच्या ४० वर्षांच्या प्रवासात या सेवेने पूर्णपणे काम थांबवले असे कधी झाले नाही. काहीवेळा काही भागात सेवा खंडित होत असे, परंतु ती संपूर्ण कोलमडणार नाही अशाच रीतीने तिची उभारणी केली गेली. 

असंख्य संगणकांचे विखुरलेले जाळे, प्रचंड संख्येने असलेले राउटर्स, काही अब्ज किलोमीटरच्या तारांनी जोडली गेलेली प्रणाली म्हणजे इंटरनेट. या तारांचा बराच मोठा भाग आंतर खंडात सागर आणि महासागर ओलांडून पोहोचत असतो. जगभरात ९९ टक्के इंटरनेट वाहतूक पाण्याखालील तारांच्या प्रणालीतून होते. 

आपण इंटरनेटचे वापरकर्ते प्रत्यक्षात ते कसे चालते याचा फारसा विचार कधी करत नाही; परंतु त्यांच्या कार्याला प्रत्यक्षातील जाळ्याचा आधार लागतो हे वास्तव होय. जेव्हा काही तारा विस्कळीत होतात तेव्हा पर्यायी मार्गातून माहितीचे संवहन केले जाते. आपल्यासारख्या वापरकर्त्यांना त्यात काही अडथळा आलेला आहे हे जाणवतही नाही.

उपलब्ध माहितीनुसार, दर तीन दिवसातून एक तरी तार तोडली जाते. त्यामागची कारणे वेगवेगळी असतात, परंतु माहिती पर्यायी मार्गाने नेली जात असल्यामुळे वापरकर्त्यांना त्याची झळ सोसावी लागत नाही. १४ दशलक्ष किलोमीटर इतक्या लांबीच्या ५५२ तारा समुद्राखालून गेलेल्या आहेत. आणि तार तोडली गेली तर अडचणीत आलेली माहिती पोहोचवण्यासाठी पुरेशी जागाही उपलब्ध होते. दुसरे म्हणजे सुमारे ६० दुरुस्ती जहाजांचा ताफा तुटलेल्या तारा जोडण्यासाठी नेहमीच सज्ज असतो.

तांबड्या समुद्राखाली तारा महत्त्वाच्या अशासाठी की त्या संख्येने ११ असून युरोपमधून आशियामध्ये जाणारी जवळपास सगळी माहिती ही तांबड्या समुद्राच्या खालून गेलेल्या या तारा पोहोचवत असतात. राजकारण आणि संघर्षाची झळ जशी जमिनीवरील तारांना पोहोचते त्याचप्रमाणे या समुद्राखालून जाणाऱ्या तारांनाही बसते.

तारा का तुटल्या याची कारणे शोधली जात आहेत आणि त्या दुरुस्तही केल्या जातील; परंतु अशा प्रकारे इंटरनेट सेवा खंडित होण्यातून काही इशारे मिळत आहेत. वापरकर्त्यांना इंटरनेटलासुद्धा काही भौतिक मर्यादा आहे हे जाणवू लागले आहे. शेवटी डिजिटल जगदेखील भौतिक जगाच्या पायावरच उभे असते.

डेटा वाहून नेणाऱ्या समुद्राखालच्या तारा इंटरनेटचे काम सुरळीतपणे चालणे, ते विस्तारणे यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बऱ्याच भागात अजून इंटरनेट पोहोचलेले नाही. दूर अंतरावर जमिनीवरून तारा टाकणे अतिशय कठीण असते; कारण वेगवेगळ्या प्रकारच्या उंचसखल प्रदेशातून त्या न्याव्या लागतात; मात्र समुद्राखालून तारा टाकणे हे खर्चीकच काम आहे. प्रारंभिक टेलिकॉम कंपन्यांनी या तारा टाकण्याचे काम केले, पण अलीकडे गुगल आणि मेटा यासारख्या क्लाउड कंपन्या हे काम करत आहेत.  

डेटा प्रवाह प्रत्यक्ष जगातील संघर्षामुळे खंडित होऊ नये याची काळजी हे जाळे संचालित करणारे घेतात; परंतु भू-राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत असून भविष्यकाळात कदाचित अशी परिस्थिती राहणार नाही. इंटरनेटच्या भौतिक साधनांवर कोणत्या देशाचे किंवा कंपनीचे नियंत्रण आहे याला भविष्यात अतिशय महत्त्व येईल. आपल्या दिनचर्येत इंटरनेटवरचे अवलंबित्व झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे या सेवेची भौतिक यंत्रणा ही पुन्हा एकदा महत्त्वाची ठरेल. ती ठीक राहिली तरच डिजिटल जगताचे कार्य सुरळीत चालू शकेल.

sadhna99@hotmail.com

 

टॅग्स :Internetइंटरनेटdigitalडिजिटल