शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

विशेष लेख: अन्वयार्थ >> समुद्राखालच्या तारा ठरवतात आपले डिजिटल अस्तित्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 11:02 IST

१४ दशलक्ष किलोमीटर लांबीच्या ५५२ तारा समुद्राखालून गेलेल्या आहेत. जगाचे इंटरनेट सुरळीत राहावे यासाठी ६० जहाजे नेहमीच सज्ज असतात.

साधना शंकर, लेखिका, केंद्रीय राजस्व सेवेतील निवृत्त अधिकारी

तांबड्या समुद्राखालील तारा तुटल्यामुळे आशिया आणि आफ्रिकेतील इंटरनेट सेवा खंडित होत आहे. इंटरनेटच्या ४० वर्षांच्या प्रवासात या सेवेने पूर्णपणे काम थांबवले असे कधी झाले नाही. काहीवेळा काही भागात सेवा खंडित होत असे, परंतु ती संपूर्ण कोलमडणार नाही अशाच रीतीने तिची उभारणी केली गेली. 

असंख्य संगणकांचे विखुरलेले जाळे, प्रचंड संख्येने असलेले राउटर्स, काही अब्ज किलोमीटरच्या तारांनी जोडली गेलेली प्रणाली म्हणजे इंटरनेट. या तारांचा बराच मोठा भाग आंतर खंडात सागर आणि महासागर ओलांडून पोहोचत असतो. जगभरात ९९ टक्के इंटरनेट वाहतूक पाण्याखालील तारांच्या प्रणालीतून होते. 

आपण इंटरनेटचे वापरकर्ते प्रत्यक्षात ते कसे चालते याचा फारसा विचार कधी करत नाही; परंतु त्यांच्या कार्याला प्रत्यक्षातील जाळ्याचा आधार लागतो हे वास्तव होय. जेव्हा काही तारा विस्कळीत होतात तेव्हा पर्यायी मार्गातून माहितीचे संवहन केले जाते. आपल्यासारख्या वापरकर्त्यांना त्यात काही अडथळा आलेला आहे हे जाणवतही नाही.

उपलब्ध माहितीनुसार, दर तीन दिवसातून एक तरी तार तोडली जाते. त्यामागची कारणे वेगवेगळी असतात, परंतु माहिती पर्यायी मार्गाने नेली जात असल्यामुळे वापरकर्त्यांना त्याची झळ सोसावी लागत नाही. १४ दशलक्ष किलोमीटर इतक्या लांबीच्या ५५२ तारा समुद्राखालून गेलेल्या आहेत. आणि तार तोडली गेली तर अडचणीत आलेली माहिती पोहोचवण्यासाठी पुरेशी जागाही उपलब्ध होते. दुसरे म्हणजे सुमारे ६० दुरुस्ती जहाजांचा ताफा तुटलेल्या तारा जोडण्यासाठी नेहमीच सज्ज असतो.

तांबड्या समुद्राखाली तारा महत्त्वाच्या अशासाठी की त्या संख्येने ११ असून युरोपमधून आशियामध्ये जाणारी जवळपास सगळी माहिती ही तांबड्या समुद्राच्या खालून गेलेल्या या तारा पोहोचवत असतात. राजकारण आणि संघर्षाची झळ जशी जमिनीवरील तारांना पोहोचते त्याचप्रमाणे या समुद्राखालून जाणाऱ्या तारांनाही बसते.

तारा का तुटल्या याची कारणे शोधली जात आहेत आणि त्या दुरुस्तही केल्या जातील; परंतु अशा प्रकारे इंटरनेट सेवा खंडित होण्यातून काही इशारे मिळत आहेत. वापरकर्त्यांना इंटरनेटलासुद्धा काही भौतिक मर्यादा आहे हे जाणवू लागले आहे. शेवटी डिजिटल जगदेखील भौतिक जगाच्या पायावरच उभे असते.

डेटा वाहून नेणाऱ्या समुद्राखालच्या तारा इंटरनेटचे काम सुरळीतपणे चालणे, ते विस्तारणे यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बऱ्याच भागात अजून इंटरनेट पोहोचलेले नाही. दूर अंतरावर जमिनीवरून तारा टाकणे अतिशय कठीण असते; कारण वेगवेगळ्या प्रकारच्या उंचसखल प्रदेशातून त्या न्याव्या लागतात; मात्र समुद्राखालून तारा टाकणे हे खर्चीकच काम आहे. प्रारंभिक टेलिकॉम कंपन्यांनी या तारा टाकण्याचे काम केले, पण अलीकडे गुगल आणि मेटा यासारख्या क्लाउड कंपन्या हे काम करत आहेत.  

डेटा प्रवाह प्रत्यक्ष जगातील संघर्षामुळे खंडित होऊ नये याची काळजी हे जाळे संचालित करणारे घेतात; परंतु भू-राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत असून भविष्यकाळात कदाचित अशी परिस्थिती राहणार नाही. इंटरनेटच्या भौतिक साधनांवर कोणत्या देशाचे किंवा कंपनीचे नियंत्रण आहे याला भविष्यात अतिशय महत्त्व येईल. आपल्या दिनचर्येत इंटरनेटवरचे अवलंबित्व झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे या सेवेची भौतिक यंत्रणा ही पुन्हा एकदा महत्त्वाची ठरेल. ती ठीक राहिली तरच डिजिटल जगताचे कार्य सुरळीत चालू शकेल.

sadhna99@hotmail.com

 

टॅग्स :Internetइंटरनेटdigitalडिजिटल