शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

शेतक-यांचे मारेकरी

By admin | Updated: December 8, 2014 06:02 IST

शेती व शेतकऱ्यांबद्दल बिगर शेतकरी समाजात अनेक गैरसमज आहेत. बहुतेक लोक शेतकरी ही एक जीवनशैली आहे, असे मानतात.

अमर हबीब - शेती व शेतकऱ्यांबद्दल बिगर शेतकरी समाजात अनेक गैरसमज आहेत. बहुतेक लोक शेतकरी ही एक जीवनशैली आहे, असे मानतात. बिगर शेतकऱ्याने असे उदात्तीकरण केले, की मी त्यांना ‘तुम्ही शेती का करीत नाहीत?’ असा प्रश्न विचारतो. तेव्हा गप्प बसतात. शेती करणे हे एवढे छान छान असते, तर त्यावर लोकांच्या उड्या नसत्या का? शेती ही जीवनशैली आहे, असे म्हणणाऱ्यांच्या मनात ‘तू असाच राबत राहा.’ असा छुपा संदेश असतो. छान टुमदार बंगला, नवरा बायकोचा गडगंज पगार. दोघांना कार, मूल कॉन्व्हेन्टला. अधून मधून गावाकडे फेरफटका मारायचा अन् म्हणायचे, ‘तुमचे किती चांगले आहे, निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळते.’ महिन्याच्या पगाराची वा हरामाच्या कमाईची ददात नसलेल्यांची ही कोडगी भाषा. शेती ही जीवनशैली आहे, ही समजूत केवळ बिगर शेतकऱ्यांचीच नाही. अनेक शेतकरी खुद्द शेतीला जीवनशैली मानतात. याला ‘तुरुंगातील तंद्री’ म्हणतात. तुरुंगात राहणारेच तुरुंगाचे गुणगान करू लागतात. माझ्या तुरुंगाच्या भिंती किती उंच आहेत आणि मला घातलेल्या बेड्या किती बलदंड आणि सुंदर आहेत, याची महती ते सांगू लागतात. असे तुरुंगाचे ‘गौरवगीत’ गाणारे अनेक महाभाग मी पाहिले आहेत. त्यांपैकी बऱ्याच लोकांना शेतीबाह्य उत्पन्न होते. जात किंवा धर्म जसा जन्माच्या आधाराने ठरतो, तसे ज्यांचे आई-बाप शेतकरी आहेत, त्यांना शेतकरी समजले जाते, ही समजूतदेखील चुकीची आहे. शेती हा एक व्यवसाय आहे. किराणा दुकानदाराचा मुलगा कलेक्टर झाल्यावर जसा किराणा दुकानदार म्हणून ओळखला जात नाही, तसेच शेती न करणारा शेतकऱ्याचा मुलगाही शेतकरी नसतो. शेतकऱ्याचा मुलगा प्राध्यापक, तलाठी, शिक्षक झाल्यानंतर शेतकरी राहत नाही. समाजाचे विश्लेषण करणारे विद्वान खास करून ही गफलत करतात.ज्याच्याकडे सात-बारा आहे, तो शेतकरी, ही समजूतही चूक आहे. इन्कम टॅक्स बुडविण्यासाठी अनेक व्यापारी, पुढारी आणि अधिकारी शेतजमिनी आपल्या नावाने करून ठेवतात. आपल्याकडील काळा पैसा शेतीतून आला आहे, असे दाखवून पांढरा करून घेतात. त्यांना शेतकरी म्हणायचे का? स्वत:ला शेतकरी म्हणून मिरविणारे चलाख पुढारी आहेत. सगळ्या शेतकऱ्यांची शेती तोट्यात असताना पुढाऱ्याचीच शेती फायद्याची कशी काय होते? पुढाऱ्याची शेती रानात नव्हे, राजकारणात पिकते. मग शेतकरी कोण? ज्यांचे पोट शेतीवर आहे, ज्यांची प्रगती आणि अधोगती शेतीतून आलेला पैसा ठरवितो, ते सगळे शेतकरी. हा शेतकरी आज भयंकर संकटात आहे.मराठी साहित्यात अलीकडच्या काळात शेतकऱ्यांचे वास्तव चित्र काही प्रमाणात दिसते आहे. पूर्वीचे साहित्य म्हणजे लेखक लहानपणी सुटीच्या दिवसांत मामाच्या गावी जायचे. तेथे त्यांना शेती दिसायची. हिरवीगार राने, नदीपात्रात पोहणे, आंबराया, चांदणी रात्र वगैरे. निसर्गचित्राचे वर्णन करावे, तसे त्यांनी केले. नंतर हे चित्र बदलले. इंग्रज भारतात आल्यानंतर काही शहरांत औद्योगिकीकरण झाले. खेड्यातील लोक शेती सोडून जगायला शहरात येऊ लागले, तेव्हा तथाकथित मध्यप्रवाह मानलेल्या मराठी साहित्यात शेतकरी ‘विदूषक’ म्हणून रंगविला गेला. काळ बदलला. कामगारांच्या बाजूने आवाज उठू लागला. मार्क्सवादी विचारांचा प्रभाव वाढला. वर्गसंघर्षाची भाषा बोलली जाऊ लागली. मालक आणि मजुरांचे तत्त्वज्ञान लोकप्रिय झाले. मालक शेतकरी आणि शेतीत काम करणारा मजूर. मजुरांचा कैवार घेण्यासाठी मालकावर हल्ला चढविला पाहिजे. या काळात ‘खलनायक’ म्हणून शेतकऱ्यांचे चित्र रेखाटले गेले. मराठी चित्रपटांत त्याचे प्रतिबिंब उमटलेले. गावचा पाटील, पिळदार मिश्या, खांद्याला बंदूक, घोड्यावर बसून येतो, रानातल्या मजुराच्या सुंदर पोरीला उचलून घेऊन जातो, अशी दृश्ये रेखाटली गेली. शेतकऱ्याला परंपरागतवाल्यांनी ‘विदूषक’ आणि पुरोगाम्यांनी ‘खलनायक’ ठरविले. ही दोन्ही चित्रे खोटी, भ्रामक आणि द्वेषमूलक होती.शेतकऱ्यांचे खरे दुखणे कोणीच मांडले नाही का? याचे उत्तर ‘मांडले होते,’ असे आहे. १५० वर्षांपूर्वी महात्मा फुले यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ लिहिला. शेतकऱ्याचे वास्तव चित्र मांडले. फार कमी लोकाना माहीत आहे, की प्रबोधनकार ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक पुस्तक लिहिले आहे. प्रबोधनकार आज असते, तर त्यांनी सत्तेचे सिंहासन अक्षरश: पेटवून दिले असते, इतके जहाल लेखन त्यांनी केले आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी अनेकांनी शेतकऱ्यांच्या वेदनांना वाचा दिली. लोकांनी काय केले? या महात्म्यांचे जे आणि जेवढे सोयीचे होते, तेवढेच उचलले. शेतकऱ्यांबद्दलच्या विचाराकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. यावरून एकच गोष्ट लक्षात येते, की माणसे मेंदूने कमी आणि खिशाने जास्त विचार करतात. कारखानदार असो की औद्योगिक कामगार, नोकरदार असो की सरकार, यांना शेतकऱ्यांचे वाईट करूनच कल्याण साधायचे असेल, तर कोणता महात्मा तरी काय करू शकेल?