शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 06:44 IST

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा हा परिणाम असल्याचे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे असले, तरी या मायंदाळ पावसाला तेवढे एकच कारण पुरेसे नसावे. जागतिक तापमानवाढीचा हा परिणाम असण्याची शक्यता अधिक आहे

राज्यात यावर्षी मान्सूनने दगडधोंड्यांप्रमाणे बरसत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहिली जाते, त्याच पावसाने शेतकऱ्यांच्या घरी आज हवालदिल वातावरण निर्माण केले आहे. अतिवृष्टी, मुसळधार सरी, ढगफुटीच्या घटनांनी शेतातील पिके अक्षरशः वाहून गेली. मराठवाडा, खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या सर्वच भागांतील शेतकरी संकटाच्या गर्तेत आहेत. नांदेड, यवतमाळ, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, औरंगाबाद, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरांहून अधिक शेती मातीमोल झाली. कपाशी, सोयाबीन, तूर, मका, बाजरी, भुईमूग, भाजीपाला, ऊस या पिकांचा अक्षरशः चिखल झाला. हजारो कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे; मात्र खरी परिस्थिती त्याहीपेक्षा गंभीर आहे.

शेतकऱ्यांचे आयुष्यभराचे कष्ट, घेतलेले कर्ज, खरेदी केलेले बी-बियाणे, औषधे, खतांचा खर्च, सगळे एका क्षणात पाण्यात गेले. यंदा नैर्ऋत्य  मान्सूनचे अपेक्षेहून थोडे आगंतुकच आगमन झाले. मे महिन्यातील मान्सूनपूर्व पावसाने एक महिना अगोदरच सगळीकडे पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. यंदा वार्षिक सरासरीहून थोडा अधिक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. प्रत्यक्षात ढगफुटीसदृश पाऊस झाला. ऑगस्टमध्येच सरासरी ओलांडली. सगळे जलसाठे भरले. नदी-नाले काठोकाठ भरून वाहू लागले. पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला; परंतु अन्नधान्याची नासाडी झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. मुसळधार पावसाने शेतजमीन खरडून गेल्याने जमिनीची सर्जनक्षमताच नष्ट झाली. परतीच्या पावसाचे असे रौद्ररूप यापूर्वी कधी पाहिले नव्हते. धाराशिव जिल्ह्यातील वाशी गावात तर परवा दोन तासांत तब्बल २२० मि.मी. पाऊस झाला! ही ढगफुटी होती. ढगफुटीच्या अशा घटनांची अनेक ठिकाणी पुनरावृत्ती दिसून आली.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा हा परिणाम असल्याचे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे असले, तरी या मायंदाळ पावसाला तेवढे एकच कारण पुरेसे नसावे. जागतिक तापमानवाढीचा हा परिणाम असण्याची शक्यता अधिक आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासाचे दुषपरिणाम आता आपल्या उंबरठ्यावर, शेतीच्या बांधावर येऊन ठेपले आहेत. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या बळीराजाला आता सरकारी मदतीची अपेक्षा आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले असले, तरी काही जिल्ह्यांत पंचनाम्यांची कामे अद्याप सुरूच नाहीत. नुकसानभरपाईसाठी घोषणांचा पाऊस पडतो; पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात एक पैसाही जमा होत नाही.  जाचक अटींमुळे पीकविमा योजनेचाही फारसा फायदा मिळत नाही.

विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी बनवलेल्या गुंतागुंतीच्या अटी शेतकऱ्यांना फक्त निराश करतात. सरकारी यंत्रणेची वेळकाढू भूमिका आता असह्य झाली आहे. मदत देताना राजकीय सोयी, मतदारसंघनिहाय समीकरणे आणि नोकरशाहीची कासवगती यांमुळे खरी मदत लाभार्थ्यांपर्यंत वेळेवर पोहोचत नाही. अनेकदा मदत मिळेपर्यंत शेतकरी आत्महत्येच्या टोकावर पोहोचतो. त्याची जबाबदारी कोण घेणार? राज्य शासनाने आता शब्दांच्या आणि घोषणांच्या पलीकडे जाऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे. वर्ष २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मदतीचे निकष बदलून दुप्पट दराने नुकसानभरपाईचा निर्णय झाला होता. मात्र, तो निर्णय जून २०२५ मध्ये विद्यमान सरकारने बदलला.

आता (मार्च २०२३ च्या) जुन्या निर्णयाप्रमाणेच नुकसानभरपाईचे दर लागू केल्यामुळे यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अत्यल्प नुकसान भरपाई मिळणार आहे. पेरणीसह बियाणे, खतांच्या किमतींमध्ये वाढ झालेली असताना, जुन्या दरामुळे मिळणारी भरपाई तुटपुंजी असेल. तातडीने पंचनामे पूर्ण करून योग्य ती नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे. पीकविमा योजनेच्या त्रुटी दूर करून शेतकऱ्यांसाठी सोपी व प्रभावी प्रणाली उभारली पाहिजे. खरिपाचे पीक पाण्यात गेले. जोपर्यंत शेतातील पाण्याचा निचरा होत नाही, तोपर्यंत रब्बीच्या हंगामाची तयारी करता येत नाही. सणासुदीचे दिवस आहेत. दसरा-दिवाळी हे सण तोंडावर आले आहेत. तेव्हा सरकारने नेहमीचे निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ काही रक्कम जमा करण्याची गरज आहे. सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून मदतीचा हात पुढे करावा. पाऊस बरसून गेला. आता पाळी सरकारची आहे, पावसाने केलेल्या नुकसानाची भरपाई करण्याची!

टॅग्स :RainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी