शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

या सत्तेला सत्य चालत नाही, 'भक्त' लागतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 14:53 IST

‘माझे जीवन हाच माझा संदेश आहे’ असे ते म्हणाले. ही लढाई एकट्याची असो वा समाजाची त्यात सहभागी होणे आणि देशाने परिश्रमाने मिळविलेले स्वातंत्र्य कायम राखणे, ही आपली जबाबदारी आहे. ती आपण शिरावर घ्यायची की नाही, हा आपला प्रश्न आहे.

नयनतारा सहगल या जागतिक कीर्तीच्या पत्रकार महिलेला भाषणाचे निमंत्रण देऊन नंतर ‘तुम्ही येऊ नका’ हे सांगण्याचा हुच्चपणा यवतमाळ येथे भरलेल्या साहित्य संमेलनात अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अर्धवट विद्वानांनी केल्यानंतर मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये प्रसिद्ध अभिनेते, चित्रकार व साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक अमोल पालेकर यांना भाषणासाठी बोलावून तेथील बहुगुणी संचालकांनी त्यांचे भाषण अर्ध्यावर बंद करायला भाग पाडणे ही एक असभ्य, असांस्कृतिक पण नवीन परंपरा आहे. सत्तेला सत्य चालत नाही, तिला नेहमी सोय हवी असते, हे वास्तव आपल्याकडील अनेकांना अजून समजायचे आहे. दिल्लीत संघाचे राज्य आल्यापासून ती सुरू झाली आहे. या परंपरेत अमर्त्य सेन बसत नाहीत, मनमोहन सिंग तिला चालत नाहीत, रघुराम राजन आणि ऊर्जित पटेल तिला नको असतात. तिला अनुपम खेर, स्मृती इराणी आणि संबित पात्रा अशी मोदीभक्तांची मालिका चालत असते.

सरकारच्या चुकीच्या धोरणांवरही टीका करू नका, ती कशीही असली तरी तिची तारीफ करा. नपेक्षा तिच्याकडे दुर्लक्ष करा, असा या नवआयोजकांचा आदेश आहे. त्यांना संशोधक, समीक्षक, अभ्यासक व ज्ञानी माणसे नकोत. तिला संघाच्या तालमीत तयार झालेली, शक्यतो त्यांचा तृतीय शिक्षा वर्ग पास केलेली संपृक्त वृत्तीची आणि मागास मनोवृत्तीची माणसे हवी असतात. नवी संशोधने नकोत, त्यापेक्षा रामाचे विमान शोधायचे, कृष्णाचे चक्र आणि अर्जुनाचे गांडीव पाहायचे यात त्यांना अधिक रस आहे. मग त्यांना नयनतारा सहगल चालत नाहीत, पालेकर ओळखता येत नाहीत आणि अमर्त्य सेनही नको असतात. देशाचे ज्ञान व विज्ञान आधुनिकतेच्या व सांस्कृतिक वैविध्याच्या दिशेने होणारी वाटचाल थांबवून त्याला १६-१७ व्या शतकाच्या व इ.स. पूर्वीच्या वातावरणात न्यायची शिकस्त करणारी ही माणसे आहेत. मग यांना पालेकर लागतात कशाला? ते विनोद तावडे आहेत ना? हो शिक्षणमंत्री आहेत आणि प्रियंका गांधींमध्ये शूर्पणखा पाहण्याचा डोळा त्यांना लाभला आहे. जे इतरांना दिसत नाही ते त्यांना दिसते याला काय म्हणावे? या माणसाने सगळ्या सुशिक्षित महाराष्ट्रालाच त्याची मान खाली घालायला लावली आहे. पण त्यांच्या मागेही एक परंपरा आहे. ‘अलेक्झांडरचा पराभव बिहारी लोकांनी केला’ असे म्हणणारे पंतप्रधान असोत वा नेहरू कधी भगतसिंगांना वा चंद्रशेखर आझादांना भेटलेच नाहीत, असे म्हणणारे मोदी अशी ती लांबच लांब परंपरा आहे. या परंपरेचेच देशावर राज्य आहे. या राज्यात स्मृती इराणी या अमर्त्य सेन यांच्याहून वरिष्ठ आहेत आणि अरुण शौरींच्या शब्दात ज्याला तीन ओळीही लिहिता येत नाहीत असा इसम डॉ. राधाकृष्णन यांच्या जागेवर विराजमान आहे. त्यांच्यावर खटले लादायचे आणि तरीही आवरत नसेल तर त्यांचे खून पाडायचे. हे धोरण विद्वानांनाही विचार करायला लावणारे आहे. अशी निमंत्रणे घ्यायची की नाही? आपण भाषण स्वातंत्र्य मागून घ्यायचे की नाही, हे त्यांनाही ठरवावे लागेल. जवाहरलाल नेहरू एकदा श्रीप्रकाशांना म्हणाले, श्रीप्रकाश, आपल्यापुढे मोठी आव्हाने आहेत. त्यांना सामोरे जायचे दोन मार्ग आपल्यापुढे उपलब्ध आहेत. एक त्यांना शरण जाण्याचा व दुसरा त्यांच्याशी लढून त्यावर मात करण्याचा. श्रीप्रकाशांना या प्रश्नाचे नेहरूंचे उत्तर ठाऊक होते. नेहरू शरण जाणारे नव्हते आणि त्यांनी सगळ्या अडचणींवर मातही केली. आताचे संकट सर्वंकष आहे आणि ते सांस्कृतिक आहे. या क्षेत्रातील किती जण पुढे येतात हे देशाला पाहायचे आहे. कारण देश पुढे त्याच्या मार्गाने जाणारा आहे.

राजकारण काही काळ फसवे असू शकते. संस्कृतीच्या मागे श्वाश्वत आहे, त्या मार्गाने जाणे समाजाला हवे आहे. म्हणून प्रश्न आहे तो पालेकरांसोबत राहायचा की बहुलकरांसोबत जायचा? नयनताराचे अभिनंदन करायचे की, महामंडळाच्या अर्धवटपणाचे कौतुक करायचे? देश अशा आपत्तीत असताना आपण काय करायचे ते गांधींनी सांगितले आहे. ‘माझे जीवन हाच माझा संदेश आहे’ असे ते म्हणाले. ही लढाई एकट्याची असो वा समाजाची त्यात सहभागी होणे आणि देशाने परिश्रमाने मिळविलेले स्वातंत्र्य कायम राखणे, ही आपली जबाबदारी आहे. ती आपण शिरावर घ्यायची की नाही, हा आपला प्रश्न आहे.

टॅग्स :Amol Palekarअमोल पालेकर