शहरं
Join us  
Trending Stories
1
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
2
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
3
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
4
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
6
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
7
एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
8
फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
9
भारतीय लष्कराला बूस्ट! अमेरिकेने जेव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीला दिली मंजुरी
10
प्रवाशांसाठी गुड न्यूज! कोकण रेल्वेवरील ‘या’ एक्स्प्रेसचा वेग वाढला; ४० मिनिटे लवकर पोहोचेल
11
Kandivali: कांदिवलीत भरदिवसा तिघांचा दुचाकीने येत इस्टेट एजंटवर गोळीबार!
12
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
13
१७० खोल्या, क्रिकेट ग्राऊंड, गोल्फ कोर्स... बकिंघम पॅलेसपेक्षाही चार पट मोठं आहे भारतातील हे घर
14
"तुम्हाला भाजप आवडत आहे, तर तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला थांबलात?"; माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने शशी थरूर यांना सुनावले
15
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
16
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
17
खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी
18
Sonam Kapoor : सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं फोटोशूट; नवऱ्याची मजेशीर कमेंट
19
कूनोतून आली गुडन्यूज; भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म
20
नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत हाॅकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा यांना वीरमरण, जानेवारीत होणार होतं लग्न
Daily Top 2Weekly Top 5

या सत्तेला सत्य चालत नाही, 'भक्त' लागतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 14:53 IST

‘माझे जीवन हाच माझा संदेश आहे’ असे ते म्हणाले. ही लढाई एकट्याची असो वा समाजाची त्यात सहभागी होणे आणि देशाने परिश्रमाने मिळविलेले स्वातंत्र्य कायम राखणे, ही आपली जबाबदारी आहे. ती आपण शिरावर घ्यायची की नाही, हा आपला प्रश्न आहे.

नयनतारा सहगल या जागतिक कीर्तीच्या पत्रकार महिलेला भाषणाचे निमंत्रण देऊन नंतर ‘तुम्ही येऊ नका’ हे सांगण्याचा हुच्चपणा यवतमाळ येथे भरलेल्या साहित्य संमेलनात अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अर्धवट विद्वानांनी केल्यानंतर मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये प्रसिद्ध अभिनेते, चित्रकार व साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक अमोल पालेकर यांना भाषणासाठी बोलावून तेथील बहुगुणी संचालकांनी त्यांचे भाषण अर्ध्यावर बंद करायला भाग पाडणे ही एक असभ्य, असांस्कृतिक पण नवीन परंपरा आहे. सत्तेला सत्य चालत नाही, तिला नेहमी सोय हवी असते, हे वास्तव आपल्याकडील अनेकांना अजून समजायचे आहे. दिल्लीत संघाचे राज्य आल्यापासून ती सुरू झाली आहे. या परंपरेत अमर्त्य सेन बसत नाहीत, मनमोहन सिंग तिला चालत नाहीत, रघुराम राजन आणि ऊर्जित पटेल तिला नको असतात. तिला अनुपम खेर, स्मृती इराणी आणि संबित पात्रा अशी मोदीभक्तांची मालिका चालत असते.

सरकारच्या चुकीच्या धोरणांवरही टीका करू नका, ती कशीही असली तरी तिची तारीफ करा. नपेक्षा तिच्याकडे दुर्लक्ष करा, असा या नवआयोजकांचा आदेश आहे. त्यांना संशोधक, समीक्षक, अभ्यासक व ज्ञानी माणसे नकोत. तिला संघाच्या तालमीत तयार झालेली, शक्यतो त्यांचा तृतीय शिक्षा वर्ग पास केलेली संपृक्त वृत्तीची आणि मागास मनोवृत्तीची माणसे हवी असतात. नवी संशोधने नकोत, त्यापेक्षा रामाचे विमान शोधायचे, कृष्णाचे चक्र आणि अर्जुनाचे गांडीव पाहायचे यात त्यांना अधिक रस आहे. मग त्यांना नयनतारा सहगल चालत नाहीत, पालेकर ओळखता येत नाहीत आणि अमर्त्य सेनही नको असतात. देशाचे ज्ञान व विज्ञान आधुनिकतेच्या व सांस्कृतिक वैविध्याच्या दिशेने होणारी वाटचाल थांबवून त्याला १६-१७ व्या शतकाच्या व इ.स. पूर्वीच्या वातावरणात न्यायची शिकस्त करणारी ही माणसे आहेत. मग यांना पालेकर लागतात कशाला? ते विनोद तावडे आहेत ना? हो शिक्षणमंत्री आहेत आणि प्रियंका गांधींमध्ये शूर्पणखा पाहण्याचा डोळा त्यांना लाभला आहे. जे इतरांना दिसत नाही ते त्यांना दिसते याला काय म्हणावे? या माणसाने सगळ्या सुशिक्षित महाराष्ट्रालाच त्याची मान खाली घालायला लावली आहे. पण त्यांच्या मागेही एक परंपरा आहे. ‘अलेक्झांडरचा पराभव बिहारी लोकांनी केला’ असे म्हणणारे पंतप्रधान असोत वा नेहरू कधी भगतसिंगांना वा चंद्रशेखर आझादांना भेटलेच नाहीत, असे म्हणणारे मोदी अशी ती लांबच लांब परंपरा आहे. या परंपरेचेच देशावर राज्य आहे. या राज्यात स्मृती इराणी या अमर्त्य सेन यांच्याहून वरिष्ठ आहेत आणि अरुण शौरींच्या शब्दात ज्याला तीन ओळीही लिहिता येत नाहीत असा इसम डॉ. राधाकृष्णन यांच्या जागेवर विराजमान आहे. त्यांच्यावर खटले लादायचे आणि तरीही आवरत नसेल तर त्यांचे खून पाडायचे. हे धोरण विद्वानांनाही विचार करायला लावणारे आहे. अशी निमंत्रणे घ्यायची की नाही? आपण भाषण स्वातंत्र्य मागून घ्यायचे की नाही, हे त्यांनाही ठरवावे लागेल. जवाहरलाल नेहरू एकदा श्रीप्रकाशांना म्हणाले, श्रीप्रकाश, आपल्यापुढे मोठी आव्हाने आहेत. त्यांना सामोरे जायचे दोन मार्ग आपल्यापुढे उपलब्ध आहेत. एक त्यांना शरण जाण्याचा व दुसरा त्यांच्याशी लढून त्यावर मात करण्याचा. श्रीप्रकाशांना या प्रश्नाचे नेहरूंचे उत्तर ठाऊक होते. नेहरू शरण जाणारे नव्हते आणि त्यांनी सगळ्या अडचणींवर मातही केली. आताचे संकट सर्वंकष आहे आणि ते सांस्कृतिक आहे. या क्षेत्रातील किती जण पुढे येतात हे देशाला पाहायचे आहे. कारण देश पुढे त्याच्या मार्गाने जाणारा आहे.

राजकारण काही काळ फसवे असू शकते. संस्कृतीच्या मागे श्वाश्वत आहे, त्या मार्गाने जाणे समाजाला हवे आहे. म्हणून प्रश्न आहे तो पालेकरांसोबत राहायचा की बहुलकरांसोबत जायचा? नयनताराचे अभिनंदन करायचे की, महामंडळाच्या अर्धवटपणाचे कौतुक करायचे? देश अशा आपत्तीत असताना आपण काय करायचे ते गांधींनी सांगितले आहे. ‘माझे जीवन हाच माझा संदेश आहे’ असे ते म्हणाले. ही लढाई एकट्याची असो वा समाजाची त्यात सहभागी होणे आणि देशाने परिश्रमाने मिळविलेले स्वातंत्र्य कायम राखणे, ही आपली जबाबदारी आहे. ती आपण शिरावर घ्यायची की नाही, हा आपला प्रश्न आहे.

टॅग्स :Amol Palekarअमोल पालेकर