शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

आत्मभान जागृत करणारा ‘परिवार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 01:39 IST

लक्ष्मीपूजनाला मोरवड या दीड हजार लोकसंख्येच्या गावात सातपुड्यातून शेकडो आदिवासी बांधव सहकुटुंब यंदा पुन्हा जमले. संत गुलाम महाराज यांच्या समाधीसमोर हातात लाल ध्वज आणि आरती घेऊन ‘आप की जय’ म्हणत परस्परांची आरती ओवाळली.

- मिलिंद कुलकर्णीलक्ष्मीपूजनाला मोरवड या दीड हजार लोकसंख्येच्या गावात सातपुड्यातून शेकडो आदिवासी बांधव सहकुटुंब यंदा पुन्हा जमले. संत गुलाम महाराज यांच्या समाधीसमोर हातात लाल ध्वज आणि आरती घेऊन ‘आप की जय’ म्हणत परस्परांची आरती ओवाळली. गेली ८० वर्षे ही प्रथा सुरू आहे. आदिवासी बांधवांमधील आत्मभान जागृत करणा-या या अबोल चळवळीचे कार्य विस्मयकारी असेच आहे.‘आप की जय’ या परिवाराचे संस्थापक असलेले संत गुलाम महाराज यांचे जीवनकार्य आणि त्यांनी स्थापन केलेला परिवार हा त्यांच्या प्रागतिक व सुधारणावादी विचारांचा अनोखा आविष्कार म्हणायला हवा. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा या तालुक्याच्या शहरापासून अवघ्या ५ कि.मी.वर मोरवड हे गाव आहे. १८९८ ते १९३८ असे अवघे ४० वर्षे आयुर्मान लाभलेले गुलाम महाराज हे निरक्षर होते. सालदारी करणाºया कुटुंबात जन्मलेल्या महाराजांनी स्वत: गुरे राखण्याचे काम केले. पंढरपूरची वारी आणि फैजपूर (जि.जळगाव) येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला लावलेली हजेरी यातून महाराजांची आध्यात्मिक व राष्टÑीयत्वाची जाण लक्षात येते. आदिवासी बांधवांमध्ये आत्मभान जागृत करण्यासाठी या परिवाराची त्यांनी स्थापना केली. या परिवारातील सदस्यांसाठी आचारसंहिता निश्चित केली. ८० वर्षांपूर्वीचा काळ लक्षात घेता या आचारसंहितेचे महत्त्व लक्षात यावे. रोज आंघोळ करा, शौचास जाताना पाणी वापरा, गंध व कुंकू लावा, दारू पिऊ नका, भांग-गांजा घेऊ नका, मांस खाऊ नका, खरे बोला; लबाडी करू नका, फसवू नका, ‘आप’ची आरती करा, परस्परांची आरती करा ही साधी सोपी शिकवण त्यांनी आदिवासी बांधवांना दिली.आपण सर्व परमात्म्याचे अंश आहोत, या भावनेतून त्यांनी ‘आप’ या नवीन शब्दाची योजना केली. क्रांतीचा रंग लाल असल्याने या परिवाराच्या ध्वजाचा रंग तोच निश्चित केला. दर सोमवारी मोरवड गावी एकत्र येऊन सामुदायिक आरती समारंभ त्यांनी सुरू केला. आदिवासी बांधव सहकुटुंब एकत्र येतात. सायंकाळी हातात आरती घेऊन गावातून मिरवणूक काढतात. नंतर महाराजांच्या समाधीस्थळी येऊन ‘आप’ तत्त्वास ओवाळतात. ही प्रथा सुरू करीत असताना महाराजांची काही बंधने परिवाराला घातली. स्वत:ला कधीही त्यांनी ओवाळून घेतले नाही. तसेच केवळ तेलवातीच्या आरतीशिवाय कोणतीही सामुग्री या समारंभास आणू नये, असा दंडक घातला.विशेष म्हणजे या परिवाराची स्थापना झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात महाराजांचे निधन झाले. गावातील चौकात त्यांची समाधी उभारण्यात आली. त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी सीतामाता, बंधू रामदास महाराज आणि पुत्र शंकर महाराज यांनी या परिवाराचा विस्तार केला. रामदास महाराज यांचे पुत्र चंद्रसेन महाराज या परिवाराची सध्या धुरा सांभाळत आहेत. ८० वर्षांपूर्वीच्या शिकवणुकीत कुठेही फरक पडलेला नाही. आश्रम नाही, विश्वस्त संस्था नाही, मंदिर नाही, दुकाने नाही. महाराष्टÑ, गुजरात आणि मध्य प्रदेशात या परिवाराच्या कार्याचा विस्तार झाला आहे. वर्षातून चारवेळा सामुदायिक आरती समारंभ होतात. आता वेगवेगळ्या ठिकाणी समारंभ होऊ लागले आहेत. आदिवासी बांधवांमध्ये आत्मभान, जागृती आली आहे. शिक्षण, शेतीसह प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे.

टॅग्स :Familyपरिवार