शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

आत्मभान जागृत करणारा ‘परिवार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 01:39 IST

लक्ष्मीपूजनाला मोरवड या दीड हजार लोकसंख्येच्या गावात सातपुड्यातून शेकडो आदिवासी बांधव सहकुटुंब यंदा पुन्हा जमले. संत गुलाम महाराज यांच्या समाधीसमोर हातात लाल ध्वज आणि आरती घेऊन ‘आप की जय’ म्हणत परस्परांची आरती ओवाळली.

- मिलिंद कुलकर्णीलक्ष्मीपूजनाला मोरवड या दीड हजार लोकसंख्येच्या गावात सातपुड्यातून शेकडो आदिवासी बांधव सहकुटुंब यंदा पुन्हा जमले. संत गुलाम महाराज यांच्या समाधीसमोर हातात लाल ध्वज आणि आरती घेऊन ‘आप की जय’ म्हणत परस्परांची आरती ओवाळली. गेली ८० वर्षे ही प्रथा सुरू आहे. आदिवासी बांधवांमधील आत्मभान जागृत करणा-या या अबोल चळवळीचे कार्य विस्मयकारी असेच आहे.‘आप की जय’ या परिवाराचे संस्थापक असलेले संत गुलाम महाराज यांचे जीवनकार्य आणि त्यांनी स्थापन केलेला परिवार हा त्यांच्या प्रागतिक व सुधारणावादी विचारांचा अनोखा आविष्कार म्हणायला हवा. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा या तालुक्याच्या शहरापासून अवघ्या ५ कि.मी.वर मोरवड हे गाव आहे. १८९८ ते १९३८ असे अवघे ४० वर्षे आयुर्मान लाभलेले गुलाम महाराज हे निरक्षर होते. सालदारी करणाºया कुटुंबात जन्मलेल्या महाराजांनी स्वत: गुरे राखण्याचे काम केले. पंढरपूरची वारी आणि फैजपूर (जि.जळगाव) येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला लावलेली हजेरी यातून महाराजांची आध्यात्मिक व राष्टÑीयत्वाची जाण लक्षात येते. आदिवासी बांधवांमध्ये आत्मभान जागृत करण्यासाठी या परिवाराची त्यांनी स्थापना केली. या परिवारातील सदस्यांसाठी आचारसंहिता निश्चित केली. ८० वर्षांपूर्वीचा काळ लक्षात घेता या आचारसंहितेचे महत्त्व लक्षात यावे. रोज आंघोळ करा, शौचास जाताना पाणी वापरा, गंध व कुंकू लावा, दारू पिऊ नका, भांग-गांजा घेऊ नका, मांस खाऊ नका, खरे बोला; लबाडी करू नका, फसवू नका, ‘आप’ची आरती करा, परस्परांची आरती करा ही साधी सोपी शिकवण त्यांनी आदिवासी बांधवांना दिली.आपण सर्व परमात्म्याचे अंश आहोत, या भावनेतून त्यांनी ‘आप’ या नवीन शब्दाची योजना केली. क्रांतीचा रंग लाल असल्याने या परिवाराच्या ध्वजाचा रंग तोच निश्चित केला. दर सोमवारी मोरवड गावी एकत्र येऊन सामुदायिक आरती समारंभ त्यांनी सुरू केला. आदिवासी बांधव सहकुटुंब एकत्र येतात. सायंकाळी हातात आरती घेऊन गावातून मिरवणूक काढतात. नंतर महाराजांच्या समाधीस्थळी येऊन ‘आप’ तत्त्वास ओवाळतात. ही प्रथा सुरू करीत असताना महाराजांची काही बंधने परिवाराला घातली. स्वत:ला कधीही त्यांनी ओवाळून घेतले नाही. तसेच केवळ तेलवातीच्या आरतीशिवाय कोणतीही सामुग्री या समारंभास आणू नये, असा दंडक घातला.विशेष म्हणजे या परिवाराची स्थापना झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात महाराजांचे निधन झाले. गावातील चौकात त्यांची समाधी उभारण्यात आली. त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी सीतामाता, बंधू रामदास महाराज आणि पुत्र शंकर महाराज यांनी या परिवाराचा विस्तार केला. रामदास महाराज यांचे पुत्र चंद्रसेन महाराज या परिवाराची सध्या धुरा सांभाळत आहेत. ८० वर्षांपूर्वीच्या शिकवणुकीत कुठेही फरक पडलेला नाही. आश्रम नाही, विश्वस्त संस्था नाही, मंदिर नाही, दुकाने नाही. महाराष्टÑ, गुजरात आणि मध्य प्रदेशात या परिवाराच्या कार्याचा विस्तार झाला आहे. वर्षातून चारवेळा सामुदायिक आरती समारंभ होतात. आता वेगवेगळ्या ठिकाणी समारंभ होऊ लागले आहेत. आदिवासी बांधवांमध्ये आत्मभान, जागृती आली आहे. शिक्षण, शेतीसह प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे.

टॅग्स :Familyपरिवार