शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

‘फेक न्यूज’ची फेकाफेकी..

By सचिन जवळकोटे | Updated: April 5, 2018 00:14 IST

पिंट्या, बंड्या, चिंट्या अन् गण्या काही पत्रकार नव्हते. दिवसभर मोबाईलवर चकाट्या पिटत बसणारे ते ‘पदवीधर बेरोजगार’ होते. न घडलेल्या घटना ‘बे्रकिंग न्यूज’ म्हणून सोशल मीडियावर फिरविण्यात त्यांचा हातखंडा होता. आजपावेतो त्यांनी किती सेलिब्रेटीजना जिवंतपणी स्वर्गलोकी पाठविलेलं, याची गणतीच नव्हती.

पिंट्या, बंड्या, चिंट्या अन् गण्या काही पत्रकार नव्हते. दिवसभर मोबाईलवर चकाट्या पिटत बसणारे ते ‘पदवीधर बेरोजगार’ होते. न घडलेल्या घटना ‘बे्रकिंग न्यूज’ म्हणून सोशल मीडियावर फिरविण्यात त्यांचा हातखंडा होता. आजपावेतो त्यांनी किती सेलिब्रेटीजना जिवंतपणी स्वर्गलोकी पाठविलेलं, याची गणतीच नव्हती. कितीवेळा मंगळावरचे धोकादायक किरण शनी ग्रहामार्गे चंद्रावर परावर्तित होऊन पृथ्वीतलावर आणलेले, हेही त्यांना आठवत नव्हतं. मात्र, अंटार्क्टिकेचा बर्फ आटपाडीच्या माळरानावर टाकून त्यांनी माणदेशाला थेट अटलांटिका खंडावर वसविलेलं, एवढंच आठवत होतं.काल ‘फेक न्यूज कारवाई’चा इराणी आदेश निघताच या चौकडीची थोडीशी तंतरलेली. ‘मात्र, मुळात आपण अधिस्वीकृत नाही. पत्रकार म्हणून तर समाजाकडूनही स्वीकृत नाही,’ असं स्वत:च्या मनाला समजावत त्यांनी या घोषणेकडं दुर्लक्ष केलेलं.असो. सकाळी-सकाळी माहिती अन् प्रसारण खात्याकडनं त्यांना एक धक्कादायक मेसेज येताच चौघेही ताडकन् उडाले. ‘आजपर्यंत आपण सोशल मीडियावर केलेली सत्य पत्रकारिता पाहता आपल्याला ‘सच न्यूज’ पुरस्कार देण्यात येतोय,’ अशा आशयाचा मजकूर वाचताच चौघेही गोंधळले. आपण खऱ्या बातम्या कधी दिल्या, या विचारात त्यांनी ‘स्मृती’लाही ताण दिला. मात्र, काहीच आठवत नव्हतं.तेव्हा चौघेही तत्काळ नेहमीच्या कॉर्नरवरील कॅन्टीनच्या अड्ड्यावर जमले. आजपावेतो आपण कोणती खरीखुरी बातमी दिली, याची चर्चा करू लागले. सर्वप्रथम पिंट्या म्हणाला, ‘मी तर गेल्या आठवड्यात एकच न्यूज अपलोड केलेली यारऽऽ.. केवळ व्यंगचित्रातून अन् सभेतूनच आग ओकणारे ‘राज’ आता प्रत्यक्षात कामाला लागणार. महाराष्ट्राची जुनीपुराणी ब्ल्यू प्रिंट ‘अपडेट’ करून फेसबुकवर ‘अपलोड’ करणार, या माझ्या पोस्टला बाराशे लाईक अन् अडीचशे कमेंटस् पडल्या रेऽऽ.’गण्याही बोलू लागला, ‘थोरले काका बारामतीकर म्हणं यापुढं भावकी-भावकीत भांडणं न लावता एकीचं राजकारण करणार.. ही माझी पोस्ट सातारा, माण अन् अकलूजमंदी तर लई गर ऽऽ गर फिरली बग लगाऽऽ’बंड्या आपला किस्सा सांगू लागला, ‘आगामी अधिवेशनाची तारीख उद्धो फॉरेनहून आल्यानंतरच ठरणार. त्यामुळं सरकार मजबूत होणार. वैयक्तिक कामासाठीच्या भेटीनंतर मातोश्रीवरची भूमिका बदलली, अशी न्यूज मी फिरविताच घाटकोपरपेक्षा दादरमध्ये जास्त आनंद झाला.’चिंट्यानं मात्र शेवटचा बॉम्ब टाकला, ‘मी मात्र ‘नमो’ची पोस्ट टाकली होती बुवाऽऽ. त्यांचे सर्व सहकारी पुढील वर्षभर मौनव्रत धारण करणार असून, एकहीजण आपली भलती-सलती भूमिका जाहीर करणार नाही. सोशल मीडियावरील माझ्या या विरोधी पोस्टला त्यांच्या भक्तांनीही टार्गेट न करता उलट लोकशाहीतील मतांचा आदर केला,’हे सारं ऐकताच चौघांचंही एकमत झालं की आपण सोडलेलं पिल्लू कदाचित खरं वाटलं म्हणून की काय हा पुरस्कार दिला जातोय; पण हाय.. चौघांच्याही मोबाईलवर अकस्मातपणे ‘नमो’ आॅफिसमधून नवा मेसेज धडकला, ‘स्मृतीबार्इंकडून आलेला संदेश म्हणजे ‘फेक न्यूज’ होती बरं काऽऽ.’ 

टॅग्स :Fake Newsफेक न्यूजnewsबातम्याMediaमाध्यमेSocial Mediaसोशल मीडियाGovernmentसरकार