शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

‘फेक न्यूज’ची फेकाफेकी..

By सचिन जवळकोटे | Updated: April 5, 2018 00:14 IST

पिंट्या, बंड्या, चिंट्या अन् गण्या काही पत्रकार नव्हते. दिवसभर मोबाईलवर चकाट्या पिटत बसणारे ते ‘पदवीधर बेरोजगार’ होते. न घडलेल्या घटना ‘बे्रकिंग न्यूज’ म्हणून सोशल मीडियावर फिरविण्यात त्यांचा हातखंडा होता. आजपावेतो त्यांनी किती सेलिब्रेटीजना जिवंतपणी स्वर्गलोकी पाठविलेलं, याची गणतीच नव्हती.

पिंट्या, बंड्या, चिंट्या अन् गण्या काही पत्रकार नव्हते. दिवसभर मोबाईलवर चकाट्या पिटत बसणारे ते ‘पदवीधर बेरोजगार’ होते. न घडलेल्या घटना ‘बे्रकिंग न्यूज’ म्हणून सोशल मीडियावर फिरविण्यात त्यांचा हातखंडा होता. आजपावेतो त्यांनी किती सेलिब्रेटीजना जिवंतपणी स्वर्गलोकी पाठविलेलं, याची गणतीच नव्हती. कितीवेळा मंगळावरचे धोकादायक किरण शनी ग्रहामार्गे चंद्रावर परावर्तित होऊन पृथ्वीतलावर आणलेले, हेही त्यांना आठवत नव्हतं. मात्र, अंटार्क्टिकेचा बर्फ आटपाडीच्या माळरानावर टाकून त्यांनी माणदेशाला थेट अटलांटिका खंडावर वसविलेलं, एवढंच आठवत होतं.काल ‘फेक न्यूज कारवाई’चा इराणी आदेश निघताच या चौकडीची थोडीशी तंतरलेली. ‘मात्र, मुळात आपण अधिस्वीकृत नाही. पत्रकार म्हणून तर समाजाकडूनही स्वीकृत नाही,’ असं स्वत:च्या मनाला समजावत त्यांनी या घोषणेकडं दुर्लक्ष केलेलं.असो. सकाळी-सकाळी माहिती अन् प्रसारण खात्याकडनं त्यांना एक धक्कादायक मेसेज येताच चौघेही ताडकन् उडाले. ‘आजपर्यंत आपण सोशल मीडियावर केलेली सत्य पत्रकारिता पाहता आपल्याला ‘सच न्यूज’ पुरस्कार देण्यात येतोय,’ अशा आशयाचा मजकूर वाचताच चौघेही गोंधळले. आपण खऱ्या बातम्या कधी दिल्या, या विचारात त्यांनी ‘स्मृती’लाही ताण दिला. मात्र, काहीच आठवत नव्हतं.तेव्हा चौघेही तत्काळ नेहमीच्या कॉर्नरवरील कॅन्टीनच्या अड्ड्यावर जमले. आजपावेतो आपण कोणती खरीखुरी बातमी दिली, याची चर्चा करू लागले. सर्वप्रथम पिंट्या म्हणाला, ‘मी तर गेल्या आठवड्यात एकच न्यूज अपलोड केलेली यारऽऽ.. केवळ व्यंगचित्रातून अन् सभेतूनच आग ओकणारे ‘राज’ आता प्रत्यक्षात कामाला लागणार. महाराष्ट्राची जुनीपुराणी ब्ल्यू प्रिंट ‘अपडेट’ करून फेसबुकवर ‘अपलोड’ करणार, या माझ्या पोस्टला बाराशे लाईक अन् अडीचशे कमेंटस् पडल्या रेऽऽ.’गण्याही बोलू लागला, ‘थोरले काका बारामतीकर म्हणं यापुढं भावकी-भावकीत भांडणं न लावता एकीचं राजकारण करणार.. ही माझी पोस्ट सातारा, माण अन् अकलूजमंदी तर लई गर ऽऽ गर फिरली बग लगाऽऽ’बंड्या आपला किस्सा सांगू लागला, ‘आगामी अधिवेशनाची तारीख उद्धो फॉरेनहून आल्यानंतरच ठरणार. त्यामुळं सरकार मजबूत होणार. वैयक्तिक कामासाठीच्या भेटीनंतर मातोश्रीवरची भूमिका बदलली, अशी न्यूज मी फिरविताच घाटकोपरपेक्षा दादरमध्ये जास्त आनंद झाला.’चिंट्यानं मात्र शेवटचा बॉम्ब टाकला, ‘मी मात्र ‘नमो’ची पोस्ट टाकली होती बुवाऽऽ. त्यांचे सर्व सहकारी पुढील वर्षभर मौनव्रत धारण करणार असून, एकहीजण आपली भलती-सलती भूमिका जाहीर करणार नाही. सोशल मीडियावरील माझ्या या विरोधी पोस्टला त्यांच्या भक्तांनीही टार्गेट न करता उलट लोकशाहीतील मतांचा आदर केला,’हे सारं ऐकताच चौघांचंही एकमत झालं की आपण सोडलेलं पिल्लू कदाचित खरं वाटलं म्हणून की काय हा पुरस्कार दिला जातोय; पण हाय.. चौघांच्याही मोबाईलवर अकस्मातपणे ‘नमो’ आॅफिसमधून नवा मेसेज धडकला, ‘स्मृतीबार्इंकडून आलेला संदेश म्हणजे ‘फेक न्यूज’ होती बरं काऽऽ.’ 

टॅग्स :Fake Newsफेक न्यूजnewsबातम्याMediaमाध्यमेSocial Mediaसोशल मीडियाGovernmentसरकार